शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

पोलिसांची १२ हजारांवर पदे रिक्त !

By admin | Published: August 17, 2015 12:56 AM

राज्य पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. मात्र दुसरीकडे प्रत्यक्षात मंजूर असलेली पदे भरण्याकडे गृहविभागाचे

जमीर काझी, मुंबईराज्य पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. मात्र दुसरीकडे प्रत्यक्षात मंजूर असलेली पदे भरण्याकडे गृहविभागाचे दुर्लक्ष असल्याचे उपलब्ध मनुष्यबळावरुन स्पष्ट होत आहे. राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेच्या संरक्षण आणि कायदा व सुव्यस्थेसाठी दोन लाखांवर पोलिसांचा फौजफाटा मंजूर आहे. मात्र पैकी तब्बल १२ हजार २८ पदे रिक्त आहेत. ही संख्या प्रत्यक्ष तपासकाम व बंदोबस्तासाठी असलेल्यांची असून त्याशिवाय तांत्रिक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजारावर पदेही भरण्यात आलेली नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकाराबाबतच्या धोरणांची गेल्या वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरी देखील प्रत्यक्षात गृह विभागाचा कारभार पूर्वीप्रमाणचे ‘सोयीनुसार’ सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. रखडलेल्या बढती आणि रिक्तपदे भरण्याला कधी ‘मुहूर्त’ मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यापार्श्वभूमीवर उपलब्ध मनुष्यबळाबाबत आढाव्यासाठी ३१ जुलैपर्यंतची आकडेवारी ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. पोलीस महासंचालक (डीजीपी) पासून कॉन्स्टेबलपर्यंत विविध १३ दर्जाची पदे आहेत. पैकी डीजी वगळता एकूण वरिष्ठ दर्जाच्या १९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या जागा भरलेल्या नाहीत. त्यामध्ये अप्पर महासंचालकांची ३० पैकी २६ पदे भरलेली आहेत. विशेष महानिरीक्षक ४२ पैकी ३७ जागा तर उपमहानिरीक्षकाच्या ३६ पैकी २८ तर उपायुक्त/ अधीक्षकाच्या २६६ पैकी २३३ पदावर अधिकारी कार्यरत आहेत. नि:शस्त्र विभागातील एसीपी/डीवायएसपीच्या ६८६ पदे मंजूर असून तेथे ४८२ अधिकारी आहेत. हत्यारी, बिनतारी संदेश, परिवहन व श्वान पथकातील सहाय्यक आयुक्तांची मिळून एकूण १३६ पदे असताना केवळ ५५ अधिकारी कार्यरत आहेत. विविध विभागातील निरीक्षक दर्जाच्या ३४६६पैकी ३४१४ जागा भरल्या आहेत. एपीआयच्या ४४४७ पैकी केवळ ३९४७ कार्यरत आहेत. तर पीएसआयचे देखील ९६८७ पैकी ५०० पदे रिक्त आहेत. काही गुन्ह्याच्या तपास कामाचे अधिकार असलेल्या सहाय्यक फौजदार व हवालदाराची अनुक्रमे १८ हजार ८०४ व ४२ हजार९६४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १७,४१८ व ४०,१४९ जागाच भरण्यात आल्या आहेत. नाईक व शिपाईसाठी अनुक्रमे ४१ हजार ४३५ व ९६ हजार २४० जागा आहेत. त्यापैकी फक्त ३७ हजार ६०० व ९२ हजार ४०२ पोलीस कार्यरत आहेत.