शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

"१२-१२ जागा घ्याव्यात म्हणजे आम्हाला १२ वाजवता येतील", रामदास आठवलेंचा महाविकास आघाडीला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 16:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आले आहेत. मात्र, सर्व पैलवानांना आम्ही चितपट करू, असा इशारा सुद्धा रामदास आठवले यांनी दिला.

सांगली :  राज्यात वंचितने १२-१२ जागांचा प्रस्ताव दिला आहे, हा प्रस्ताव चांगला आहे, त्यामुळे चारही पक्षांनी १२-१२ जागा घ्याव्यात, म्हणजे आम्हाला त्यांचे १२ वाजवता येतील, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आले आहेत. मात्र, सर्व पैलवानांना आम्ही चितपट करू, असा इशारा सुद्धा रामदास आठवले यांनी दिला. ते सांगली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

प्रकाश आंबडेकर सक्षम नेते आहेत, ते महायुतीसोबत येणार नाहीत. पण ते महाविकास आघाडीत जाणार आहेत, 12 जागांचा प्रकाश आंबेडकर यांचा मविआला प्रस्ताव आहे. त्या जागा त्यांना द्यावात म्हणजे आम्हाला त्याचे बारा वाजवणे सोपे जाईल. बाबासाहेब आंबडेकर यांनी काढलेल्या पक्षाचे अध्यक्षपद आणि माझे मंत्रिपद मी प्रकाश आंबेडकर यांना द्यायला तयार आहे, त्यांनी त्याचा पक्ष विसर्जित करून आरपीआयमध्ये यावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. 

मराठा समाजातील गरीब घटकाला आरक्षण मिळायलाच हवे. ज्यांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा घटकाचा यासाठी विचार व्हावा. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. सरकार त्यावर सध्या कामही करत आहे. हे आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. सर्व मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून न घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण दिल्यासही तोडगा मिळू शकतो, असे रामदास आठवले म्हणाले.

याचबरोबर, सध्या सुरू असलेला ओबीसी-मराठा वादही मिटणे आवश्यक आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातीलही मतभेद मिटवले, तर आरक्षणाच्या मागणीवर सरकारला काम करता येणार आहे. २० जानेवारीपासून जरांगे पाटील मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत. मात्र, ती वेळ येणार नाही. त्या अगोदरच शासन यावर निर्णय घेईल. मराठा समाजातील गरिबांना आरक्षणासाठी स्वतंत्र १५ टक्क्यांचे आरक्षण देण्याबाबतही विचार करण्यात येईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

शरद पवार यांना अजित पवार यांनी निवृत्ती घेण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरून रामदास आठवले यांनी भाष्य केले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने आता लगेच शरद पवार निवृत्ती घेतील, असे वाटत नाही. तसेच, अजित पवार आता लगेच मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती नाही, आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरु आहे, असे रामदास आठवले म्हणाले. याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रमध्येच गरज असून दिल्लीत फडणवीस यांनी येण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. शिर्डीमधून निवडणूक लढवू इच्छित असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSangliसांगली