शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धक्कादायक! 'या' जिल्ह्यात महिन्याभरात ११८ बालकांचा मृत्यू; तरीही प्रशासनाला जाग नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 07:30 IST

सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील १२ प्रकल्पांतर्गत एकूण दोन हजार ९९२ बालकांचा जन्म झाला, तर शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाला आहे.

- रमाकांत पाटीलनंदुरबार : राज्यात सर्वाधिक कुपोषित बालके असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. हा मृत्यूदर राज्याच्या सरासरी दरापेक्षा दुप्पट असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरला आहे. सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील १२ प्रकल्पांतर्गत एकूण दोन हजार ९९२ बालकांचा जन्म झाला, तर शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यात शून्य ते २८ दिवसांचे ३७, एक महिना ते एक वर्ष वयोगटातील ३८, एक वर्ष ते पाच वर्षे वयोगटातील २० आणि उपजत २३ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सहा मातांचाही मृत्यू झाला आहे. राज्यात एकीकडे शून्य ते सहा वयोगटातील बालकांचा मृत्यूदर सरासरी हजारी २१ आहे. मात्र, जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात या प्रमाणानुसार मृत्यूदर दुप्पट झाल्याचे चित्र समोर आले आहे. मृत्यू झालेल्या बालकांमध्ये नवापूर बालविकास प्रकल्पात सर्वाधिक म्हणजे २२ बालकांचा मृत्यू झाला आहे, तर तोरणमाळ प्रकल्पात १६, अक्कलकुवा प्रकल्पात १५ बालकांचा मृत्यू झाला आहे.कुपोषित बालकांची संख्या कागदावरच घटवली जात असल्याची ओरड नेहमीचीच आहे. सर्वेक्षण होते तेव्हा बालकांची संख्या वाढते. ती दर महिन्याला कमी होत जाते. असा प्रकार आता पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्यपालांच्या दत्तक गावातच तक्रारराज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भगदरी (ता. अक्कलकुवा) गावात चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविका येत नसल्याची, तसेच पोषण आहारही वितरित झाला नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. आरोग्य तपासणीच्या वेळेसही त्या अनुपस्थित असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भातील चौकशीसाठी स्थानिक अधिकारी गावात जाऊनही कुठलीही कार्यवाही झाली नाही.