शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोरोनाकाळात १६५ दिवसांत आयएएसच्या ११७ बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:46 IST

परदेशी, मुंढेंची बदली ठरली लक्षवेधी : एकाच अधिकाऱ्याच्या तीन-तीन बदल्या

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडी सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कोरोनाच्या महामारीतही सपाटा लावल्याची आकडेवारी समोर आली आहे. ७ एप्रिल ते १८ सप्टेंबर या १६५ दिवसांमध्ये आयएएसच्या तब्बल ११७ बदल्या करण्यात आल्या.

७ एप्रिलपासून बदल्यांचा धडाका सुरू झाला. १८ सप्टेंबरपर्यंत तो सुरू होता. यात एका अधिकाºयाची दोन किंवा तीन वेळा बदली झाल्याचीदेखील उदाहरणे आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आदी अधिकाºयांच्या बदल्या लक्षवेधी ठरल्या.

लॉकडाऊनमुळे शासनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाºयांच्या बदल्यांना सुरुवातीला एक वर्ष स्थगिती देण्यात आली होती. नंतर ती उठवून केवळ १५ टक्के बदल्यांना अनुमती देण्यात आली. बदल्यांचा आर्थिक भार येतो हे कारण दिले गेले. आयएएस अधिकाºयांच्या बदल्यांना कुठलीही स्थगिती नव्हती हे खरे असले तरी, कोरोनाच्या संकटकाळात त्या-त्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रमुख असलेल्या आयएएस अधिकाºयांच्या इतक्या बदल्या कराव्यात का, असा मुद्दा यानिमित्ताने समोर आला आहे. एवढ्या बदल्या केल्यानंतरही अजून जवळपास दीड डझन अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत आणि सहा अधिकारी पोस्टिंग बदलण्यासाठी धडपडत आहेत.

तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेतून पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग; मंत्रालय येथे बदली झाली होती, पण ती रद्द करण्यात आली. आता ते नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विनिता वेद-सिंघल या फिल्मसिटीच्या संचालक होत्या, त्यांची बदली आधी आदिवासी विकास विभागाच्या सचिव तर तीनच महिन्यांत त्यांची बदली कामगार सचिव म्हणून करण्यात आली.

दीपा मुधोळ-मुंडे उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी होत्या, त्यांची बदली आधी लातूर महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली, पण लगेच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आणि त्यानंतर लगेच त्यांची बदली प्रशासक; सिडको औरंगाबाद या पदावर झाली. किशोरराजे निंबाळकर यांची बदली सार्वजनिक बांधकाम खात्यात सचिव म्हणून केली गेली आणि दोनच दिवसांत ती रद्द करून त्यांना मदत व पुनर्वसन विभागातच कायम ठेवण्यात आले.अनुपकुमार यादव यांची राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक पदावरून बदली करून त्यांना विशेष विक्रीकर आयुक्त म्हणून २३ जुलैला पाठविले आणि १३ आॅगस्टला त्यांची बदली आदिवासी विकास विभागाचे सचिव म्हणून झाली. चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावरून कुणाल खेमनार यांची बदली हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली, पण तीनच दिवसांत त्यांना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केले.पुण्यात महापालिका आयुक्तांसह काही अधिकारी बदलले गेले. आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारनेही सातत्याने बदल्या केल्या, पण या सरकारने त्यापुढे पाऊल टाकल्याचे दिसते.मंत्र्यांना हवे मर्जीतील अधिकारीमंत्र्यांना आपल्या मर्जीचे हवे असलेले अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अशी प्रशासनात दोन सत्तास्थाने असणे, तीन पक्षांचे सरकार असणे, क्रीम पोस्टिंगसाठी अधिकाºयांची धडपड, एका शहरातील दोन वा तीन आयएएस अधिकाºयांमध्ये (जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदी) विसंवाद असणे ही वारंवार बदल्यांची प्रमुख कारणे सांगितली जातात.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय