शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

कोरोनाकाळात १६५ दिवसांत आयएएसच्या ११७ बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:46 IST

परदेशी, मुंढेंची बदली ठरली लक्षवेधी : एकाच अधिकाऱ्याच्या तीन-तीन बदल्या

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडी सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कोरोनाच्या महामारीतही सपाटा लावल्याची आकडेवारी समोर आली आहे. ७ एप्रिल ते १८ सप्टेंबर या १६५ दिवसांमध्ये आयएएसच्या तब्बल ११७ बदल्या करण्यात आल्या.

७ एप्रिलपासून बदल्यांचा धडाका सुरू झाला. १८ सप्टेंबरपर्यंत तो सुरू होता. यात एका अधिकाºयाची दोन किंवा तीन वेळा बदली झाल्याचीदेखील उदाहरणे आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आदी अधिकाºयांच्या बदल्या लक्षवेधी ठरल्या.

लॉकडाऊनमुळे शासनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाºयांच्या बदल्यांना सुरुवातीला एक वर्ष स्थगिती देण्यात आली होती. नंतर ती उठवून केवळ १५ टक्के बदल्यांना अनुमती देण्यात आली. बदल्यांचा आर्थिक भार येतो हे कारण दिले गेले. आयएएस अधिकाºयांच्या बदल्यांना कुठलीही स्थगिती नव्हती हे खरे असले तरी, कोरोनाच्या संकटकाळात त्या-त्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रमुख असलेल्या आयएएस अधिकाºयांच्या इतक्या बदल्या कराव्यात का, असा मुद्दा यानिमित्ताने समोर आला आहे. एवढ्या बदल्या केल्यानंतरही अजून जवळपास दीड डझन अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत आणि सहा अधिकारी पोस्टिंग बदलण्यासाठी धडपडत आहेत.

तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेतून पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग; मंत्रालय येथे बदली झाली होती, पण ती रद्द करण्यात आली. आता ते नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विनिता वेद-सिंघल या फिल्मसिटीच्या संचालक होत्या, त्यांची बदली आधी आदिवासी विकास विभागाच्या सचिव तर तीनच महिन्यांत त्यांची बदली कामगार सचिव म्हणून करण्यात आली.

दीपा मुधोळ-मुंडे उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी होत्या, त्यांची बदली आधी लातूर महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली, पण लगेच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आणि त्यानंतर लगेच त्यांची बदली प्रशासक; सिडको औरंगाबाद या पदावर झाली. किशोरराजे निंबाळकर यांची बदली सार्वजनिक बांधकाम खात्यात सचिव म्हणून केली गेली आणि दोनच दिवसांत ती रद्द करून त्यांना मदत व पुनर्वसन विभागातच कायम ठेवण्यात आले.अनुपकुमार यादव यांची राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक पदावरून बदली करून त्यांना विशेष विक्रीकर आयुक्त म्हणून २३ जुलैला पाठविले आणि १३ आॅगस्टला त्यांची बदली आदिवासी विकास विभागाचे सचिव म्हणून झाली. चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावरून कुणाल खेमनार यांची बदली हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली, पण तीनच दिवसांत त्यांना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केले.पुण्यात महापालिका आयुक्तांसह काही अधिकारी बदलले गेले. आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारनेही सातत्याने बदल्या केल्या, पण या सरकारने त्यापुढे पाऊल टाकल्याचे दिसते.मंत्र्यांना हवे मर्जीतील अधिकारीमंत्र्यांना आपल्या मर्जीचे हवे असलेले अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अशी प्रशासनात दोन सत्तास्थाने असणे, तीन पक्षांचे सरकार असणे, क्रीम पोस्टिंगसाठी अधिकाºयांची धडपड, एका शहरातील दोन वा तीन आयएएस अधिकाºयांमध्ये (जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदी) विसंवाद असणे ही वारंवार बदल्यांची प्रमुख कारणे सांगितली जातात.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय