शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

कोरोनाकाळात १६५ दिवसांत आयएएसच्या ११७ बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:46 IST

परदेशी, मुंढेंची बदली ठरली लक्षवेधी : एकाच अधिकाऱ्याच्या तीन-तीन बदल्या

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडी सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कोरोनाच्या महामारीतही सपाटा लावल्याची आकडेवारी समोर आली आहे. ७ एप्रिल ते १८ सप्टेंबर या १६५ दिवसांमध्ये आयएएसच्या तब्बल ११७ बदल्या करण्यात आल्या.

७ एप्रिलपासून बदल्यांचा धडाका सुरू झाला. १८ सप्टेंबरपर्यंत तो सुरू होता. यात एका अधिकाºयाची दोन किंवा तीन वेळा बदली झाल्याचीदेखील उदाहरणे आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आदी अधिकाºयांच्या बदल्या लक्षवेधी ठरल्या.

लॉकडाऊनमुळे शासनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाºयांच्या बदल्यांना सुरुवातीला एक वर्ष स्थगिती देण्यात आली होती. नंतर ती उठवून केवळ १५ टक्के बदल्यांना अनुमती देण्यात आली. बदल्यांचा आर्थिक भार येतो हे कारण दिले गेले. आयएएस अधिकाºयांच्या बदल्यांना कुठलीही स्थगिती नव्हती हे खरे असले तरी, कोरोनाच्या संकटकाळात त्या-त्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रमुख असलेल्या आयएएस अधिकाºयांच्या इतक्या बदल्या कराव्यात का, असा मुद्दा यानिमित्ताने समोर आला आहे. एवढ्या बदल्या केल्यानंतरही अजून जवळपास दीड डझन अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत आणि सहा अधिकारी पोस्टिंग बदलण्यासाठी धडपडत आहेत.

तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेतून पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग; मंत्रालय येथे बदली झाली होती, पण ती रद्द करण्यात आली. आता ते नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विनिता वेद-सिंघल या फिल्मसिटीच्या संचालक होत्या, त्यांची बदली आधी आदिवासी विकास विभागाच्या सचिव तर तीनच महिन्यांत त्यांची बदली कामगार सचिव म्हणून करण्यात आली.

दीपा मुधोळ-मुंडे उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी होत्या, त्यांची बदली आधी लातूर महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली, पण लगेच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आणि त्यानंतर लगेच त्यांची बदली प्रशासक; सिडको औरंगाबाद या पदावर झाली. किशोरराजे निंबाळकर यांची बदली सार्वजनिक बांधकाम खात्यात सचिव म्हणून केली गेली आणि दोनच दिवसांत ती रद्द करून त्यांना मदत व पुनर्वसन विभागातच कायम ठेवण्यात आले.अनुपकुमार यादव यांची राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक पदावरून बदली करून त्यांना विशेष विक्रीकर आयुक्त म्हणून २३ जुलैला पाठविले आणि १३ आॅगस्टला त्यांची बदली आदिवासी विकास विभागाचे सचिव म्हणून झाली. चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावरून कुणाल खेमनार यांची बदली हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली, पण तीनच दिवसांत त्यांना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केले.पुण्यात महापालिका आयुक्तांसह काही अधिकारी बदलले गेले. आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारनेही सातत्याने बदल्या केल्या, पण या सरकारने त्यापुढे पाऊल टाकल्याचे दिसते.मंत्र्यांना हवे मर्जीतील अधिकारीमंत्र्यांना आपल्या मर्जीचे हवे असलेले अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अशी प्रशासनात दोन सत्तास्थाने असणे, तीन पक्षांचे सरकार असणे, क्रीम पोस्टिंगसाठी अधिकाºयांची धडपड, एका शहरातील दोन वा तीन आयएएस अधिकाºयांमध्ये (जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदी) विसंवाद असणे ही वारंवार बदल्यांची प्रमुख कारणे सांगितली जातात.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय