शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

रक्त तपासणीमुळे ७० महिन्यांच्या कालावधीत १११ जणांचे प्राण वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 16:30 IST

महाराष्ट्रातील सर्व रक्तपेंढीमध्ये नॅट चाचणीसारख्या आधुनिक रक्त तपासणीची गरज आहे..

ठळक मुद्देनॅटच्या मदतीने रक्त तपासणी : १३०० हून अधिक लोकंना एचआयव्ही संसर्गमहाराष्ट्रात एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या केसेसमध्ये हे प्रमाण १३ टक्के रक्त देण्यापूर्वी आवश्यक काळजी घेतली नसल्यास ' हे ' आजारही रुग्णाला होण्याची शक्यता

पुणे : राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेच्या नव्या अहवालानुसार मध्ये भारतात २०१८-१९ मध्ये संक्रमण संक्रमित संसर्ग (टीटीआय) प्रक्रियेत १३०० हून अधिक लोकंना एचआयव्ही संसर्ग झाला. महाराष्ट्रात एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या केसेसमध्ये हे प्रमाण १३ टक्के होते व १६९ जणांना संसर्ग झाला. जनकल्याण रक्तपेढीने नॅटच्या मदतीने रक्त तपासणीमुळे ७० महिन्यांच्या कालावधीत १११ जणांचे प्राण वाचवले आहेत. जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.     यावेळी रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रवण सुब्रमण्यम व  रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे मेडिकल व सायण्टिफिक अफेअर्स हेड डॉ. संदीप सेवलीकर उपस्थित होते.महाराष्ट्रातील रक्तविषयक सुरक्षितता यावरील अहवालाच्या मते टीटीआयचा धोका कमी केला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील सर्व रक्तपेंढीमध्ये नॅट चाचणीसारख्या आधुनिक रक्त तपासणीची गरज आहे. भारतात अंदाजे २५०० रक्तपेढया आहेत.  त्यातील केवळ २/३ टक्के नॅट चाचणी  करतात. देशातील व राज्यातील अनेक रुग्णालये/रक्तपेढी  यांनी नॅट तपासणी प्रक्रिया राबवलेली नाही.डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, रक्त संक्रमण हा इमर्जन्सी मेडिकल केअरचा महत्त्वाचा घटक आहे. इमर्जन्सीच्या वेळी पुरेसा रक्तपुरवठा होण्यासाठी सुनियोजित रक्त संक्रमण सेवेची गरज असते. यासाठी हे संपूर्ण क्षेत्र व विनामूल्य ऐच्छिक रक्तदानाची तयारी असणारे डोनर यांच्या वर्षभरातील सहयोगामुळेच हे केवळ शक्य होऊ शकते. सर्वांना सर्वंकष आरोग्यसेवा द्यायची असले तर प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित व दर्जेदार रक्ताचा पुरवठा होणे गरजेचे असते.

नॅट म्हणजे कायएचआयव्ही, हिपेटायटिस-बी, हिपेटायटिस-सी, मलेरिया, सिफिलिस (गुप्तरोग) हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याचे जे विविध मार्ग आहेत. त्यातील रक्त हा एक प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे रक्त देण्यापूर्वी आवश्यक काळजी घेतली नसल्यास रक्ताबरोबर हे आजारही रुग्णाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एखादा व्यक्ती रक्तदान करण्याअगोदर त्याच्या रक्ताची तपासणी केली जाते. त्याच्या रक्तातून काही विषाणू आढळले. तर त्याला रक्तदान करून दिले जात नाही. व त्या व्यक्तीला रक्तातील दोषाबद्दल कळवले जाते. हे  नॅट चाचणी तपासणीचे माध्यम आहे. 

टॅग्स :PuneपुणेHIV-AIDSएड्सHealthआरोग्यdoctorडॉक्टर