शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षांत आदिवासींच्या ११००० कोटीला कात्री; सरकारला उपरती, आता लोकसंख्येच्या अनुपातात निधी देण्याचा निर्णय

By यदू जोशी | Updated: October 14, 2023 14:33 IST

बोगस आदिवासी रोखण्यासाठी लवकरच कायदा...

यदु जोशी -

मुंबई : आदिवासींच्या विकासासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातातच निधी मिळायला हवा, असा नियम असताना तो धाब्यावर बसवून गेल्या सात वर्षांत तब्बल ११ हजार १५४ कोटी रुपये कमी देण्यात आल्याची अधिकृत आकडेवारी हाती आली आहे. आता सरकारला उपरती आली असून लोकसंख्येनुसारच निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी मुंबईत राज्य जनजाती सल्लागार परिषदेची ५१वी बैठक झाली. या बैठकीत अधिकृतपणे सादर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. आदिवासींच्या हक्काच्या निधीत सरकार कपात करत असल्याबद्दल आदिवासी आमदारांनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. तेव्हा, यापुढे २०११ च्या जनगणनेनुसार आदिवासींच्या विकासासाठी ९.३५ टक्के निधी खर्च केला जाईल, अशी हमी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. 

आदिवासी प्रकल्पांकडे दुर्लक्ष; आमदारांची तक्रार  राज्यात ३० आदिवासी प्रकल्प कार्यालये आहेत.तेथील प्रकल्प अधिकारी हे आयएएस असतात. मात्र, आदिवासी कल्याणाच्या योजनांकडे पुरेसे लक्ष देऊ शकले नाहीत, अशी तक्रार आमदारांनी बैठकीत केली 

बोगस आदिवासी रोखण्यासाठी लवकरच कायदाबोगस कागदपत्रे सादर करून आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी या बैठकीत करण्यात आली. अशा प्रकरणांमध्ये आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यासाठी लवकरच कायदा केला जाणार आहे.   

आकांक्षित तालुके तयार करणारकेंद्र सरकारने मानव निर्देशांकाच्या आधारे नंदुरबार व गडचिरोली हे आकांक्षित जिल्हे निश्चित केले आहेत. त्या धर्तीवर आदिवासी विकास विभाग आकांक्षित तालुके तयार करणार आहे. त्यांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्र