शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
2
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
3
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
4
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
5
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
6
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
7
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
8
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
9
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
10
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
11
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
12
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
13
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
14
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
15
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
16
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
18
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
19
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
20
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

११ महिन्यांत १,१०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 07:11 IST

विदर्भातील सहा जिल्ह्यांची स्थिती : दर आठ तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, डोक्यावरील सावकारांचे कर्ज, मुला-मुलींच्या शिक्षण आणि विवाहात त्यामुळे येणारे अडथळे अशा असंख्य विवंचनांमुळे पश्चिम विदर्भ व वर्धासह सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. आतापर्यंतच्या ११ महिन्यांत १,०५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सन २००१ पासून १५ डिसेंबरपर्यंत १६ हजार ९१८ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आर्थिक संकटातून शेतकºयाला बाहेर आणण्यासाठी आधीच्या सरकारने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, अटी, शर्तीच्या गुंत्यांत बहुतांश शेतकरी वंचित राहिले. त्या कर्जमाफीनंतरही विदर्भाच्या सहा जिल्ह्यांतील साडेतीन हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या.यंदा जानेवारीत ८५, फेब्रुवारीत ७८, मार्चमध्ये ९२, एप्रिलमध्ये ७८, मेमध्ये ९८, जूनमध्ये ९५, जुलैमध्ये १०५, आॅगस्टमध्ये ११४, सप्टेंबरात १०६ आॅक्टोबरात ८६, नोव्हेंबरात ९५ आणि १५ डिसेंबरपर्यंत ३५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या.१९ वर्षांत १६,९१८ शेतकरी आत्महत्याया सहा जिल्ह्यांत २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. अमरावती व नागपूर विभागात आतापर्यंत १६ हजार ९१८ आत्महत्या झाल्या आहेत.जाचक निकषामुळे फक्त ७,६६७ प्रकरणे सरकारी मदतीसाठी पात्र, तर८,९५० प्रकरणे अपात्र ठरली. शिवाय२९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबितआहेत. आतापर्यंत ७,६३२ शेतकºयांच्या वारसांना मिळाली.२००५ पासून शासन मदतीत वाढ नाहीकर्जबाजारी, कर्जवसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास २००५च्या आदेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांचे संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरूप आहे.गेल्या १४ वर्षांत त्यात बदल झाला नाही, शिवाय ज्या कर्जासाठी शेतकºयाने आत्महत्या केली ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व व्याज वाढते. त्यामुळे मृत शेतकºयाचा वारस बँकेचा थकबाकीदार ठरून, त्याला कर्ज मिळत नाही आणि तो अन्य लाभांपासून वंचित राहतो.सर्वाधिक आत्महत्या यवतमाळातयवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षांनी शेतकरी आत्महत्या यंदा वाढल्या आहेत. यंदा सर्वाधिक २६० शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. बुलडाणा जिल्ह्यातही आत्महत्या (२५८) वाढल्या. अमरावती २५७, अकोला ११५, वाशीम ९१ व वर्ध्यात ७५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या