शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

११ महिन्यांत १,१०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 07:11 IST

विदर्भातील सहा जिल्ह्यांची स्थिती : दर आठ तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, डोक्यावरील सावकारांचे कर्ज, मुला-मुलींच्या शिक्षण आणि विवाहात त्यामुळे येणारे अडथळे अशा असंख्य विवंचनांमुळे पश्चिम विदर्भ व वर्धासह सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. आतापर्यंतच्या ११ महिन्यांत १,०५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सन २००१ पासून १५ डिसेंबरपर्यंत १६ हजार ९१८ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आर्थिक संकटातून शेतकºयाला बाहेर आणण्यासाठी आधीच्या सरकारने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, अटी, शर्तीच्या गुंत्यांत बहुतांश शेतकरी वंचित राहिले. त्या कर्जमाफीनंतरही विदर्भाच्या सहा जिल्ह्यांतील साडेतीन हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या.यंदा जानेवारीत ८५, फेब्रुवारीत ७८, मार्चमध्ये ९२, एप्रिलमध्ये ७८, मेमध्ये ९८, जूनमध्ये ९५, जुलैमध्ये १०५, आॅगस्टमध्ये ११४, सप्टेंबरात १०६ आॅक्टोबरात ८६, नोव्हेंबरात ९५ आणि १५ डिसेंबरपर्यंत ३५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या.१९ वर्षांत १६,९१८ शेतकरी आत्महत्याया सहा जिल्ह्यांत २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. अमरावती व नागपूर विभागात आतापर्यंत १६ हजार ९१८ आत्महत्या झाल्या आहेत.जाचक निकषामुळे फक्त ७,६६७ प्रकरणे सरकारी मदतीसाठी पात्र, तर८,९५० प्रकरणे अपात्र ठरली. शिवाय२९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबितआहेत. आतापर्यंत ७,६३२ शेतकºयांच्या वारसांना मिळाली.२००५ पासून शासन मदतीत वाढ नाहीकर्जबाजारी, कर्जवसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास २००५च्या आदेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांचे संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरूप आहे.गेल्या १४ वर्षांत त्यात बदल झाला नाही, शिवाय ज्या कर्जासाठी शेतकºयाने आत्महत्या केली ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व व्याज वाढते. त्यामुळे मृत शेतकºयाचा वारस बँकेचा थकबाकीदार ठरून, त्याला कर्ज मिळत नाही आणि तो अन्य लाभांपासून वंचित राहतो.सर्वाधिक आत्महत्या यवतमाळातयवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षांनी शेतकरी आत्महत्या यंदा वाढल्या आहेत. यंदा सर्वाधिक २६० शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. बुलडाणा जिल्ह्यातही आत्महत्या (२५८) वाढल्या. अमरावती २५७, अकोला ११५, वाशीम ९१ व वर्ध्यात ७५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या