शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

दहावी, बारावीचा निकाल वेळेवरच!, उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 06:33 IST

दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीसह पहिली ते नववी व अकरावी-बारावीचे वर्ग नियमित सुरू झाले असून शालेय कामकाजाला सुरुवात झाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली आहे.

मुंबई : दहावी, बारावीच्या निकालावर संपामुळे असलेली टांगती तलवार दूर झाली असून मंगळवारपासून उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली आहे. यामुळे बारावीसह दहावीचे विद्यार्थी आणि पालकांनी निकाल वेळेत लागणार असल्याचा सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 

दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीसह पहिली ते नववी व अकरावी-बारावीचे वर्ग नियमित सुरू झाले असून शालेय कामकाजाला सुरुवात झाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली आहे. वार्षिक नियोजित वेळापत्रकाप्रमाणे वार्षिक परीक्षांची तयारी, मूल्यमापन, निकाल या सगळ्या गोष्टी वेळेत होतील, असेही त्यांनी सांगितले.

सोमवारी दुपारनंतर बेमुदत संप मागे घेतल्याचे जाहीर होताच मंगळवारपासून शिक्षण निरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालयेही नियमित सुरू झाली आहेत. मुंबईत शालेय शिक्षण विभागाचे सर्वात महत्त्वाचे असलेले शिक्षण उपसंचालक कार्यालय मागील सात दिवसांपासून पूर्णपणे बंद होते. त्यामुळे तेथेही अनेक प्रशासकीय कामकाज ठप्प होऊन अनेक प्रस्ताव, धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी रखडली होती. मात्र मंगळवारपासून तेथील नियमित कामकाजाला सुरुवात झाली आहे. 

उत्तरपत्रिका तपासणी जलद गतीने शिक्षक संघटनांनी मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी संपात सहभाग घेतल्याने दहावीच्या विविध पेपरच्या ७० लाखांहून अधिक तर बारावीच्या २० लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्या तातडीने तपासण्यासाठी शिक्षक कामाला लागणार आहेत, त्यासाठी सर्व काम वेळेत केले जाणार असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली. दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी सर्व शिक्षक प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या आहेत. अधिक वेळ देऊन त्या तपासण्याची तयारी शिक्षकांनी ठेवली असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण