शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

राज्यात अतिवृष्टीचे १०८ बळी; विदर्भात मात्र पूरस्थिती कायम, २८ जिल्हे आणि २८९ गावे प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 06:03 IST

आतापर्यंत १२ हजार २३३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात आतापर्यंत झालेल्या  मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीत  १०८ जणांचा बळी गेला आहे. कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कोकणातील परिस्थिती यंदा नियंत्रित असून विदर्भात मात्र पूरस्थिती कायम आहे.

पुरामुळे २८ जिल्हे आणि २८९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत १२ हजार २३३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे १८९ प्राणी दगावले आहेत. पावसामुळे ४४ घरांचे पूर्णत: तर १ हजार ३६८ घरांचे अशंत: नुकसान झाले आहे.

कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ३० जुलैपर्यंत सायंकाळी ०७ ते सकाळी ०६ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच राजापूर कोल्हापूरला  जोडणारा अनुस्कुरा घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात २ एनडीआरएफ  टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

२६ गावांना पुराचा वेढा

नागपूर : आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी यवतमाळ जिल्ह्यातील ११ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १५ अशी २६ गावे पुराने वेढली आहेत. यवतमाळच्या वणी तालुक्यातील  तीन गावांची स्थिती गंभीर आहे. या भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी वर्धा येथून राज्य आपत्ती निवारण दलाचे पथक वणीकडे निघाले आहे. सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यातच बेंबळा प्रकल्पासह जिल्ह्यातील आठ प्रकल्पातून पाणी सोडल्याने बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव, कळंब आणि वणी या पाच तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. वर्धा व वैनगंगा नदीला पूर आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, बल्लारपूर व पोंभूर्णा तालुक्यातील गावे सर्वाधिक बाधित आहेत.

बुलडाणा, अकोल्यात पूरपरस्थिती कायम

बुलडाणा : जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये पावसाने मंगळवारी उसंत घेतली. तरीही पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे नांदुरा-जळगाव जामोद मार्गावरील येरळी पुलावर पाच ते सहा फूट पाणी मंगळवारीही वाहत होते. मलकापूर तालुक्यात विश्वगंगा नदीच्या पुरामुळे काळेगाव, वान नदीच्या पुरामुळे कोलद, वडगाव वान, दानापूर या गावांचा संपर्क तुटलेलाच होता. पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून भरपाई देण्याची मागणी होत आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदीचा पूर कायम आहे. यामुळे अकोट-अकोला मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. देवरी-अंदुरा व शेगाव रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तेल्हारा तालुक्यातील पूर्णा, गौतमा, विद्रुपा नद्यांना पूर असल्याने नेर, पिवंदळ, सांगवी, उमरी या गावांचा संपर्क तुटला आहे.

वणी येथे ११ गावांमध्ये पूरस्थिती ‘जैसे थे’ 

अमरावती : अमरावती जिल्ह्यात २४ तासांत सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. शहानूर नदीला पूर आल्याने एक जण वाहून गेला, तर चांदूरबाजार तालुक्यात भिंत कोसळून माय-लेकीचा मृत्यू झाला आहे. येवदा गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात येरड येथील बेंबळा व मिलमिली नदीला पूर आल्याने नदीकाठालगतची पिके वाहून गेली. वर्धा जिल्ह्यातील शेकडो एकर शेती अजूनही पाण्याखालीच असून अनेक गावांतील शेतावरील विद्युत पुरवठा पूर्ववत झालेला नाही.

टॅग्स :Rainपाऊस