शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘१०८ रुग्णवाहिका’ ठरली जीवनदायिनी; एक कोटी रुग्णांना लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 09:04 IST

दहा वर्षात ४०,२१३ प्रसूती या रुग्णवाहिकेत झाल्या, रस्ते अपघात मृत्यूंमध्ये १४ टक्के घट झाली.

मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागाने सार्वजनिक खासगी भागीदारीत राज्यात सुरू केलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवा ही राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरली असून ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास १ कोटी रुग्णांना या रुग्णसेवेचा लाभ झाला आहे.

२६ जानेवारी २०१४ रोजी राज्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) प्रकल्पांतर्गत  ही सेवा सुरू झाली, तेव्हापासून आतापर्यंत १०८ रुग्णवाहिकेने राज्यातील सर्व भागातील १ कोटीहून अधिक रुग्णांना सेवा दिली आहे. कोविड काळात या रुग्णवाहिकेने सहा लाख पेक्षा जास्त रुग्णांना अहोरात्र सेवा दिली. कोविड काळात रुग्णाला बेड मिळणे अडचणीचे होते, या काळात अतिशय कमी वेळामध्ये १०८ कंट्रोल रूममधून खासगी रुग्णवाहिकांबरोबर समन्वय साधून रुग्णालयातील खाटांचे ‘रिअल टाइम’ उपलब्धतेसाठीही मदत करण्यात आली.

दहा वर्षात ४०,२१३ प्रसूती या रुग्णवाहिकेत झाल्या. एमईएमएस प्रकल्पामुळे माता मृत्यू दर ६८ वरून ४६ आणि बालमृत्यू दर २४ वरून १७ पर्यंत कमी झाला. रस्ते अपघात मृत्यूंमध्ये १४ टक्के घट झाली, असा दावा संंबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे.

१२ हजार जणांना रोजगारया प्रकल्पात सध्या राज्यातील सहा हजारपेक्षा जास्त तरुण कार्यरत असून, नवीन निविदेच्या व्याप्तीनुसार, शासन व आरोग्य विभागातर्फे बारा हजारपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय शाळांमध्ये लाइफ सेव्हिंग ट्रेनिंग, ग्रामीण आणि शहरी भागात जीवन वाचवण्याचे प्रशिक्षण आणि १०८ सेवेच्या सक्रियतेबाबत प्रशिक्षण दिले आहे.

कुंभमेळ्यात, वारीत सेवाएमईएमएस प्रकल्पाने नाशिक महाकुंभमेळ्यात एक लाख रुग्ण व साधूंची सेवा केली. पंढरपूर आषाढी वारी दरम्यान ३ लाखाच्या घरात अत्यवस्थ रुग्णांची सेवा केली. भारतातील सर्वोत्तम शासित प्रणाली म्हणून एमईएमएस प्रकल्पाला सन्मानित करण्यात आले असून आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.