शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

१०५० आदिवासी कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली

By admin | Updated: October 31, 2016 04:18 IST

तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून ती १०० टक्के आदिवासी आहे.

हुसेन मेमन,

जव्हार- तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून ती १०० टक्के आदिवासी आहे. या तालुक्यापासून पूर्वेकडे ६० किमी अंतरावर नाशिक आहे. उत्तरेला ७० किमी अंतरावर दादरा नगर हवेलीतील सिल्वासा हे शहर आहे. राज्याची राजधानी आणि सर्वसामान्य जनतेचे निर्णय घेणारे मंत्रालय हे जव्हारपासून अवघ्या १०० किमी अंतरावर आहे. मात्र, आजही या तालुक्यातील १ हजार ५० आदिवासी कुटुंबे दारिद्रयरेषेखालील जीवन जगत आहे. येथील आदिवासी कुटुंबांना शासनाचा विविध योजनांसाठी झगडावे लागत आहे. करोडो रुपयांचा खर्च करूनही येथील गरिबी व दारिद्रय कमी होताना दिसत नाही. त्यामुळे या भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. या तालुक्यातील आदिवासी सुशिक्षित तरुणांतील उद्योजक घडविण्यासाठी १०० टक्के अनुदानावर केंद्रशासनाकडून दरवर्षाला १०० कोटी रुपये येत आहेत. तसेच तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. वन विभागामार्फतही शेतकऱ्यांसाठी अनुदाने दिली जात आहेत. तरीही त्याचा परिणाम दिसून येत नसल्यामुळे शासनाकडून मिळणारे हे अनुदान जाते तरी कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. जव्हार तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद यांचे जिल्ह्याचे कार्यालय जव्हार येथे आहे. परंतु, तालुक्यातील रु ईघर, बोपदरी, झाप, खरोंडा अशा अनेक गावांतील रस्त्यांची समस्या आजही कायम आहे. बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या कामावर दरवर्षाला लाखोंचा खर्च करण्यात येतो. मात्र, तालुक्यातील रस्ते व्यवस्थित होताना दिसत नाहीत. जव्हार तालुका विक्रमगड मतदारसंघात येत असून या विक्रमगड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार विष्णू सवरा हे राज्याचे आदिवासी विकासमंत्री आहेत. मात्र, या आदिवासी विकासमंत्र्यांचा काहीच फायदा नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. आजही येथील गरिबी, दारिद्रय यामुळे कुपोषण अशा समस्या कायम आहेत. जव्हार तालुक्यात शेकडो कुटुंबे दारिद्रयरेषेखालील जीवन जगत आहेत.