शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू- मुस्लिम सलोख्यासाठी कोकणात १०० वर्षांचा करार

By admin | Updated: February 9, 2015 12:22 IST

कोकणातील एका गावाने हिंदू व मुस्लिमांदरम्यान सलोखा टिकवण्यासाठी १०० वर्षांचा करार केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - धर्माच्या नावावर देशातील लोक एकमेकांना लक्ष्य करत असल्याचे पाहून गांधीजींना धक्का बसला असता, अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे कान टोचले असतानाच कोकणातील एका गावाने हिंदू व मुस्लिमांदरम्यान  सलोखा टिकवण्यासाठी १०० वर्षांचा करार केला आहे. मुंबईपासून २२८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणातील बुरोंडी गावातील नागरिकांनी जातीय सलोखा टिकवण्यासाठी आपापसांत १०० वर्षांचा करार केला आहे. सुमारे ४००० हजार नागरिकांची वस्ती असलेल्या या गावाने जातीय संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही धर्मांच्या नागरिकांसाठी आचारसंहिताही आखली आहे. 
या तीन पानी करारात अनेक कलमे टाकण्यात आली असून गावातील पवित्र धार्मिक स्थळांजवळून जातानाही ते नियम आचरण्यात आणावे लागतील असे त्यात नमूद करण्यात आले आहे. 'गावातून हिंदू धर्मीयांतील नागरिकांची मिरवणूक निघाली असताना ते मशीदीजवळून जातानाही बँड वाजवू शकतात, मात्र त्याच वेळी नमाज सुरू असेल तर मशिदीपासून थोड्या अंतरावर मिरवमूक थांबवावी व नमाज पूर्ण झाल्यावरच पुढे जावे', असे एक कलम त्यात आले आहे. 
तसेच दहीहंडीदरम्यान गोविंदा पथकातील तरूण गावातील मशिदीच्या परिसरातूनही उत्साहाने जातील आणि त्याचवेळी दर्ग्याला नमनही करतील. गावातील एका ठराविक क्षेत्रात राहणारे हिंदू नागरिक करजागाव दर्ग्याच्या वार्षिक उत्सवादरम्यान मदत करतील, असेही त्यात म्हटले आहे. दोन्ही धर्मांचे नागरिक एकमेकांच्या उत्सवात सहभागी होतील आणि त्यात सर्वांना सामावून घेतील. 
गावातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही धर्मांतील नागरिक मंचावर उपस्थित असले पाहिजेत आणि दोन्ही धर्मांतील ज्येष्ट नागरिकांचा योग्य सत्कार व्हावा, असेही त्या करारात नमूद करण्यात आले आहे. 
सध्या गावातील लोकसंख्येपैकी २० टक्के नागरिक मुस्लिम असून नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी दोन सदस्य हे मुस्लिम आहेत.  कोकणतील  इतर गावांप्रमाणेच बुरोंडीमध्येही जातीय सलोखा टिकून राहिला आहे.  लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान मशिदीजवळून जात असताना गाणी वाजवली गेल्यामुळे दोन्ही धर्मांच्या नागरिकांमध्ये १९८७ साली एकदाच संघर्ष निर्माण झाला होता. 
त्यानंतर बराच काळ गावात शांतता होती. मात्र तीन वर्षांपूर्वी गोविंदा पथकाची मिरवणूक मशिदीसमोरून तीन वेळा गेल्याने पुन्हा एकदा गावात संघर्षाचे ठिणगी पडली होती. त्यानंतर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आम्ही हा १०० वर्षीय करार करण्याचा निर्णय घेतला, असे गावचे सरपंच प्रदीप राणे यांनी सांगितले.