शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

हिंदू- मुस्लिम सलोख्यासाठी कोकणात १०० वर्षांचा करार

By admin | Updated: February 9, 2015 12:22 IST

कोकणातील एका गावाने हिंदू व मुस्लिमांदरम्यान सलोखा टिकवण्यासाठी १०० वर्षांचा करार केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - धर्माच्या नावावर देशातील लोक एकमेकांना लक्ष्य करत असल्याचे पाहून गांधीजींना धक्का बसला असता, अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे कान टोचले असतानाच कोकणातील एका गावाने हिंदू व मुस्लिमांदरम्यान  सलोखा टिकवण्यासाठी १०० वर्षांचा करार केला आहे. मुंबईपासून २२८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणातील बुरोंडी गावातील नागरिकांनी जातीय सलोखा टिकवण्यासाठी आपापसांत १०० वर्षांचा करार केला आहे. सुमारे ४००० हजार नागरिकांची वस्ती असलेल्या या गावाने जातीय संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही धर्मांच्या नागरिकांसाठी आचारसंहिताही आखली आहे. 
या तीन पानी करारात अनेक कलमे टाकण्यात आली असून गावातील पवित्र धार्मिक स्थळांजवळून जातानाही ते नियम आचरण्यात आणावे लागतील असे त्यात नमूद करण्यात आले आहे. 'गावातून हिंदू धर्मीयांतील नागरिकांची मिरवणूक निघाली असताना ते मशीदीजवळून जातानाही बँड वाजवू शकतात, मात्र त्याच वेळी नमाज सुरू असेल तर मशिदीपासून थोड्या अंतरावर मिरवमूक थांबवावी व नमाज पूर्ण झाल्यावरच पुढे जावे', असे एक कलम त्यात आले आहे. 
तसेच दहीहंडीदरम्यान गोविंदा पथकातील तरूण गावातील मशिदीच्या परिसरातूनही उत्साहाने जातील आणि त्याचवेळी दर्ग्याला नमनही करतील. गावातील एका ठराविक क्षेत्रात राहणारे हिंदू नागरिक करजागाव दर्ग्याच्या वार्षिक उत्सवादरम्यान मदत करतील, असेही त्यात म्हटले आहे. दोन्ही धर्मांचे नागरिक एकमेकांच्या उत्सवात सहभागी होतील आणि त्यात सर्वांना सामावून घेतील. 
गावातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही धर्मांतील नागरिक मंचावर उपस्थित असले पाहिजेत आणि दोन्ही धर्मांतील ज्येष्ट नागरिकांचा योग्य सत्कार व्हावा, असेही त्या करारात नमूद करण्यात आले आहे. 
सध्या गावातील लोकसंख्येपैकी २० टक्के नागरिक मुस्लिम असून नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी दोन सदस्य हे मुस्लिम आहेत.  कोकणतील  इतर गावांप्रमाणेच बुरोंडीमध्येही जातीय सलोखा टिकून राहिला आहे.  लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान मशिदीजवळून जात असताना गाणी वाजवली गेल्यामुळे दोन्ही धर्मांच्या नागरिकांमध्ये १९८७ साली एकदाच संघर्ष निर्माण झाला होता. 
त्यानंतर बराच काळ गावात शांतता होती. मात्र तीन वर्षांपूर्वी गोविंदा पथकाची मिरवणूक मशिदीसमोरून तीन वेळा गेल्याने पुन्हा एकदा गावात संघर्षाचे ठिणगी पडली होती. त्यानंतर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आम्ही हा १०० वर्षीय करार करण्याचा निर्णय घेतला, असे गावचे सरपंच प्रदीप राणे यांनी सांगितले.