शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

१०० कोटींचा तंबाखूजन्य माल जप्त

By admin | Updated: April 6, 2017 05:43 IST

वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी सरकारतर्फे गुटखा, तंबाखू, पानमसाला व सुगंधित सुपारी विक्रीवर बंदी घालण्यात आली.

स्नेहा मोरे,मुंबई- वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी सरकारतर्फे गुटखा, तंबाखू, पानमसाला व सुगंधित सुपारी विक्रीवर बंदी घालण्यात आली. मात्र, तरीही राज्यभरात त्याची छुपी विक्री होत असते. ती रोखण्यासाठी वेळोवेळी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यानुसार, गेल्या सव्वाचार वर्षांत महाराष्ट्र राज्याच्या या अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत, गुटखा, तंबाखूसह सुगंधी सुपारी, पानमसाला आदी तब्बल १०० कोटी १३ लाखांचा माल जप्त केला आहे. २०१२ ते २०१७ दरम्यान एफडीएने गुटखा, तंबाखूसह सुगंधी सुपारी व पानमसाला व तत्सम पदार्थांवर केलेल्या कारवाईत सर्वात मोठी कारवाई २०१५-१६ या वर्षात केली आहे. या विभागाने गेल्या वर्षात २४ कोटी ३७ लाख २० हजार ९८१ रुपयांचा माल जप्त केला आहे, तर २०१३-१४ या वर्षात १ हजार ११५ आस्थापने आणि व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, २०१२-१३ या कालावधीत सर्वाधिक ९७२ खटले दाखल करण्यात आले आहेत.२० जुलै २०१६ ते २६ मार्च २०१७ या कालावधीत ३ हजार ७५३ आस्थापनांची तपासणी केली असून, त्यामध्ये १ हजार १४ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यातील ८६ आस्थापनांवर एफआयआर दाखल करण्यात आले. या कारवाईत २१ कोटी ८१ लाख ९२ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला, तर २४८ आस्थापनांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. २०१२ ते २०१७ या काळात १०० कोटी १३ लाख ५६ हजार ४४ कोटी रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती, अन्न व औषध प्रशासन विभागाने ‘लोकमत’ला दिली.>आजारांचे वाढते प्रमाणग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वेक्षण २०१० नुसार, भारतातील ३५ टक्के प्रौढ व्यक्ती तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. म्हणजेच आकडेवारीनुसार देशात २७.५ कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. यातील १६.३७ कोटी व्यक्ती धूरमुक्त तंबाखूचे सेवन करतात. ६.९ कोटी धूम्रपान करत असून, ४.२३ कोटी व्यक्ती धूम्रपान आण धूरमुक्त तंबाखूचे सेवन करतात. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०११ मध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांवर, भारताला १ लाख ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करावे लागले होते.गुटखा, तंबाखू, पानमसाला या पदार्थांची विक्री आणि अवैध साठ्यावर धाड टाकून एफडीएने वेळोवेळी सतर्कता दाखविली आहे. गेल्या काही वर्षांतील अशा प्रकारच्या धडक कारवायांमुळे या विभागाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. भविष्यात या विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देणार आहे.- डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग