शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दिल्ली–मुंबई कॉरीडोरसाठी दिघी पोर्ट क्षेत्रातील 10 गावांना भूसंपादनाची सक्ती नाही: सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 15:52 IST

रायगड जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई कॉरिडोर अंतर्गत दिघी पोर्ट क्षेत्रातील 78 पैकी 68 गावे सोडता उर्वरित 10 गावांना शासनाची भूसंपादनाची कोणतीही सक्ती होणार नाही

ठळक मुद्देदिघी पोर्ट क्षेत्रातील 78 पैकी 68 गावे सोडता उर्वरित 10 गावांना शासनाची भूसंपादनाची कोणतीही सक्ती होणार नाहीसंमतीपत्रातील भाषा अधिक सौम्य करण्यात येईल आणि ज्या शेतकऱ्यांची संमती असेल त्यांचीच जमीन घेतली जाईलहा प्रकल्प केंद्र सरकार पुरस्कृत असल्याने केंद्राच्या महामंडळाकडे याविषयी राज्य शासनाकडून प्रस्ताव देण्यात येईल

मुंबई, दि. 11 - रायगड जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई कॉरिडोर अंतर्गत दिघी पोर्ट क्षेत्रातील 78 पैकी 68 गावे सोडता उर्वरित 10 गावांना शासनाची भूसंपादनाची कोणतीही सक्ती होणार नाही, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत दिली. संमतीपत्रातील भाषा अधिक सौम्य करण्यात येईल आणि ज्या शेतकऱ्यांची संमती असेल त्यांचीच जमीन घेतली जाईल,असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. शिवसेनेच्या प्रवक्त्या व उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

''हा प्रकल्प केंद्र सरकार पुरस्कृत असल्याने केंद्राच्या महामंडळाकडे याविषयी राज्य शासनाकडून प्रस्ताव देण्यात येईल. त्यांच्याकडून या भागातील जमिनी अधिसूचित न करण्याबाबत संमती आल्यावर याविषयीची अधिसूचना जाहीर करण्यात येईल. मात्र, आजपासून रायगड जिल्ह्यातील या प्रकल्पाअंतर्गत कोणतेही सक्तीचे भूसंपादन केले जाणार नाही. ज्यांची संमती आहे त्यांचेच संपादन केले जाईल. त्यासाठी सक्ती कोणावरही केली जाणार नाही. संमतीपत्रातील मजकूर बदलून ते अधिक सौम्य भाषेत तयार करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. शेतीखाली असलेली जमीन संपादित होणार नाही, असे क्षेत्र नक्कीच वगळण्यात येईल. शेतकऱ्यांवर कसलीही जबरदस्ती होणार नाही. शेतकऱ्यांंना देण्यात येणाऱ्या मोबदल्याचा पाच वर्षांपुर्वीचा दर असल्याने त्याविषयी देखील पुनर्विचार करण्यात येईल. रायगड जिल्ह्यात कोणतेही रासायनिक प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी यावेळी दिली.

याविषयी एक बैठक घेण्याची मागणी नीलम गोऱ्हे यांनी सदनात केली. यावेळी रायगडचे आमदार सुनील तटकरे यांनीही आपली मते मांडली.