शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

दिल्ली–मुंबई कॉरीडोरसाठी दिघी पोर्ट क्षेत्रातील 10 गावांना भूसंपादनाची सक्ती नाही: सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 15:52 IST

रायगड जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई कॉरिडोर अंतर्गत दिघी पोर्ट क्षेत्रातील 78 पैकी 68 गावे सोडता उर्वरित 10 गावांना शासनाची भूसंपादनाची कोणतीही सक्ती होणार नाही

ठळक मुद्देदिघी पोर्ट क्षेत्रातील 78 पैकी 68 गावे सोडता उर्वरित 10 गावांना शासनाची भूसंपादनाची कोणतीही सक्ती होणार नाहीसंमतीपत्रातील भाषा अधिक सौम्य करण्यात येईल आणि ज्या शेतकऱ्यांची संमती असेल त्यांचीच जमीन घेतली जाईलहा प्रकल्प केंद्र सरकार पुरस्कृत असल्याने केंद्राच्या महामंडळाकडे याविषयी राज्य शासनाकडून प्रस्ताव देण्यात येईल

मुंबई, दि. 11 - रायगड जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई कॉरिडोर अंतर्गत दिघी पोर्ट क्षेत्रातील 78 पैकी 68 गावे सोडता उर्वरित 10 गावांना शासनाची भूसंपादनाची कोणतीही सक्ती होणार नाही, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत दिली. संमतीपत्रातील भाषा अधिक सौम्य करण्यात येईल आणि ज्या शेतकऱ्यांची संमती असेल त्यांचीच जमीन घेतली जाईल,असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. शिवसेनेच्या प्रवक्त्या व उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

''हा प्रकल्प केंद्र सरकार पुरस्कृत असल्याने केंद्राच्या महामंडळाकडे याविषयी राज्य शासनाकडून प्रस्ताव देण्यात येईल. त्यांच्याकडून या भागातील जमिनी अधिसूचित न करण्याबाबत संमती आल्यावर याविषयीची अधिसूचना जाहीर करण्यात येईल. मात्र, आजपासून रायगड जिल्ह्यातील या प्रकल्पाअंतर्गत कोणतेही सक्तीचे भूसंपादन केले जाणार नाही. ज्यांची संमती आहे त्यांचेच संपादन केले जाईल. त्यासाठी सक्ती कोणावरही केली जाणार नाही. संमतीपत्रातील मजकूर बदलून ते अधिक सौम्य भाषेत तयार करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. शेतीखाली असलेली जमीन संपादित होणार नाही, असे क्षेत्र नक्कीच वगळण्यात येईल. शेतकऱ्यांवर कसलीही जबरदस्ती होणार नाही. शेतकऱ्यांंना देण्यात येणाऱ्या मोबदल्याचा पाच वर्षांपुर्वीचा दर असल्याने त्याविषयी देखील पुनर्विचार करण्यात येईल. रायगड जिल्ह्यात कोणतेही रासायनिक प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी यावेळी दिली.

याविषयी एक बैठक घेण्याची मागणी नीलम गोऱ्हे यांनी सदनात केली. यावेळी रायगडचे आमदार सुनील तटकरे यांनीही आपली मते मांडली.