शहरं
Join us  
Trending Stories
1
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
2
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
3
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
4
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
5
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
6
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
7
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
8
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
9
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
10
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
11
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
12
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
13
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
14
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
15
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
17
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
18
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
19
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
20
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१० टक्के कृषी विकासाचे उद्दिष्ट गाठणारच -मुख्यमंत्री

By admin | Updated: May 30, 2014 02:35 IST

राज्याच्या कृषी विभागाने २०१४-१५ साठी राज्याने ठरविलेले १० टक्के कृषी विकास दराचे उद्दिष्ट ठेवले असून ते निश्चितच पूर्ण केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला.

मुंबई : या वर्षी राज्याच्या कृषी विभागाने २०१४-१५ साठी राज्याने ठरविलेले १० टक्के कृषी विकास दराचे उद्दिष्ट ठेवले असून ते निश्चितच पूर्ण केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला. कृषी व पणन विभागाने यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातील जवळजवळ दीड लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम पीक घेतले जाते. कृषी नियोजनासाठी हा हंगाम सर्वात महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे या हंगामाचे पूर्ण नियोजन होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, विभागवार बैठकीत अशा पद्धतीचे नियोजन करण्यात काही अडचणी येत होत्या. म्हणून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर खरीप हंगाम पूर्व बैठक घेण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला. तो फलदायी ठरत असल्याचे निदर्शनास आले. हवामान बदलामुळे अनेकदा राज्यावर दुष्काळाचे सावट येते. गेल्या एकाच वर्षात आपल्याला दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी यांना सामोरे जावे लागले. गेल्या शंभर वर्षांत अशी गारपीट कधीच झाली नव्हती. त्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले. अर्थात शेतकर्‍यांसाठी मदत व पुनर्वसन विभागामार्फत ६६३५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली. टोल फ्री क्रमांक, भरारी पथके यामुळे काळाबाजार रोखण्यात यश आले असून, खत आणि बियाणे यांचा काळाबाजार करणार्‍या १० हजार विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ठिबक सिंचनाचे १३०० कोटी रुपयंचे अनुदान त्वरित वितरित करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीज जोडण्यांना प्राधान्य दिले जाईल. कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खरीप आढावा बैठकीचे प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)