शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

पंधरा वर्षे वयाच्या १० लाख गाड्या; फिटनेसची खात्री द्यायची कोणी..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 06:26 IST

मुंबई महानगरात आताच्या घडीला सुमारे ९० लाख वाहनांची नोंदणी झालेली आहे. संपूर्ण प्रदेशातील वाहनांपैकी ३२ लाख वाहने ही पंधरा वर्षे पूर्ण केलेली आहेत.

मुंबई/ठाणे :

मुंबई महानगरात आताच्या घडीला सुमारे ९० लाख वाहनांची नोंदणी झालेली आहे. संपूर्ण प्रदेशातील वाहनांपैकी ३२ लाख वाहने ही पंधरा वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यापैकी किमान १० लाख वाहने रस्त्यावर असून, या वाहनांच्या फिटनेसबाबत खात्री देता येईल, अशी माहिती परिवहन विभागाकडे उपलब्ध नाही. वाहनांच्या फिटनेसबाबत परिवहन विभाग वारंवार तपासणी मोहिमा हाती घेत असले तरी सुरक्षित प्रवासाची हमी देता येईल अशी ठोस माहिती कोणाकडेही उपलब्ध नाही.

मुंबई महानगर क्षेत्रात २००७ मध्ये ३२ लाख १३ हजार वाहनांची नोंद झाली होती. या वाहनांची पंधरा वर्षांची मुदत पूर्ण झाली आहे. त्यापैकी किमान १० लाख वाहने रस्त्यावर असावीत, असा वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. मुंबई-ठाण्यात वाहनांच्या फिटनेसबाबत जागरूकता दिसते. परंतु, उर्वरित महानगर क्षेत्रात, मुदत संपलेली वाहने चालविण्याचे प्रमाण जास्त आहे. सार्वजनिक सेवा देणारी मुदत उलटून गेलेली वाहने मोठ्या प्रमाणावर आहेत. मुदतवाढीसाठी पुनर्नोंदणी शुल्क न भरताच वाहने दामटविण्याकडे वाहनचालक-मालकांचा कल असतो, असे वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्याने सांगितले. पाच वर्षे मिळतात वाढवून...वाहन १५ वर्षे जुने झाले की, पर्यावरण कर भरून ते वाहन आणखी पाच वर्षे चालविता येते. त्यासाठी वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र आरटीओकडून घ्यावे लागते. असे प्रमाणपत्र देताना संबंधित वाहनाची तपासणी आरटीओ अधिकारी करतात. याशिवाय रस्त्यावर धावणारी वाहने तांत्रिकदृष्ट्या सक्षम आाहेत अथवा नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी आरटीओची वायूवेग पथके कार्यरत असतात. वाहने असे प्रमाणपत्र देण्याच्या याेग्यतेची नसतात किंवा अपघातांमुळे जी वाहने दुरुस्त करण्यासारखी नसतात अशी वाहने भंगारात काढली जातात.

कारवाई सुरू आहे...केंद्र सरकारने स्क्रॅप पॉलिसी आणली आहे. तुम्ही स्वेच्छेने वाहने मोडीत काढू शकता. १५ वर्षांनंतर राज्य सरकारचा पर्यावरण कर लागतो. तसेच फिटनेस करणे आवश्यक आहे. फिटनेस शुल्क वाढविण्यात आले आहे.  १५ वर्षे जुन्या गाड्या चांगल्या असतील तर पर्यावरण कर, पुनर्नोंदणी आणि फिटनेस शुल्क भरून वापरता येतात. मात्र, फिटनेसशिवाय गाड्या वापरणाऱ्यांवर कारवाई कायम सुरू असते.

वय नव्हे, फिटनेस महत्त्वाचा !केवळ १५ वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आहेत म्हणून रस्ता सुरक्षेवर परिणाम होत नाही. रस्ते अपघाताला वाहनांची गती हे मुख्य कारण असते. रस्त्यावर नव्या वाहनांची संख्या जास्त असून, जुनी वाहने त्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे, रस्ता सुरक्षेसाठी वाहनाचे वय नव्हे, तर फिटनेस महत्त्वाचा आहे. गतीवर नियंत्रण महत्त्वाचे आहे.  - रणजित गाडगीळ, वाहतूक तज्ज्ञ

वाहन प्रकारमोटारसायकल, स्कुटर, मोपेड, गाड्या, जीप, स्टेशन व्हॅगन, लक्झरी कॅब, रिक्षा, स्टेज कॅरेजेस, मिनी बस, शाळेच्या बसेस, खासगी सेवा वाहने, रुग्णवाहिका, ट्रक-लॉरी, टँकर, चारचाकी डिलिव्हरी वाहने, तीन चाकी डिलिव्हरी वाहने, ट्रॅक्टर, ट्रेलर्स, आदी उपस्थित होते.- अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी