शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"केंद्रीय मंत्री, खासदारांना विधानसभेचे तिकीट, मग आमदारांना सरपंच बनवणार का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:31 IST

सतना जिल्ह्यातील ४ वेळा आमदार राहिलेले नारायण त्रिपाठी यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारून नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.

नवी दिल्ली – मध्य प्रदेशच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात सत्ताधारी भाजपा पक्षाकडून निवडणुकीच्या घोषणेआधीच उमेदवारांच्या ३ याद्या जाहीर झाल्यात. त्यात ८० जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात अनेक नावे धक्कादायक आहेत. पक्षाने ३ केंद्रीय मंत्री, ४ खासदार आणि संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे भाजपात नाराजी आणि बंडखोरीचे संकेत मिळत आहेत.

सतना जिल्ह्यातील ४ वेळा आमदार राहिलेले नारायण त्रिपाठी यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारून नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. नाराज त्रिपाठी म्हणाले की, जर इतके वरिष्ठ खासदार, नेते आणि मंत्र्यांना भाजपा निवडणुकीत उभे करू शकते तर मुरली मनोहर जोशीजी, लालकृष्ण अडवाणी यांचा गुन्हा काय होता? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता खासदार, मंत्री विधानसभेची निवडणूक लढवणार मग आमदारांनी सरपंचाची निवडणूक लढवायची का? युवा राष्ट्रची संकल्पना असणाऱ्या भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना विधानसभेचे तिकीट दिले आहे. त्रिपाठी यांनी मैहर जागेवरून आतापर्यंत ४ वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

'तिकीट कापल्यानं आमदार संतापले!

भाजपाने आणखी एक आमदार केदारनाथ शुक्ला यांचेही तिकीट कापले. शुक्ला हे चार वेळा आमदार राहिलेत. ते सिधी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. केदारनाथ शुक्ला यांच्या जागी पक्षाने खासदार रीती पाठक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. सीधी येथील लघवी प्रकरणाच्या घटनेनंतर भाजपाचे नेतृत्व शुक्ला यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. या घटनेतील आरोपीचे नाव शुक्ला यांच्या जवळचे असल्याचे समोर आले होते.

भाजपाने कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-१ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विजयवर्गीय यांना तिकीट दिल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. मंगळवारी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, तुम्हा सर्वांना कैलाश विजयवर्गीय बनून काम करावे लागेल. येथे विक्रमी विजय मिळावा हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. मला लढण्याची एक टक्काही इच्छा नव्हती. लढण्याची एक मानसिकता असते आता मोठे नेते झालोय. हातपाय जोडायला कुठे जमणार? मला जाऊन भाषण करावे लागेल. मग निघावे लागेल. असे मला वाटले असं विजयवर्गीय यांनी सांगितले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाElectionनिवडणूक