शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

"मी कुठेही जात नाही, नवीन सरकारला सदैव सहकार्य करेन", शिवराज सिंह चौहान यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 14:40 IST

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भोपाळ : मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिवराज सिंह चौहान यांनी मोठे विधान केले आहे. मी कुठेही जात नाही. येथेच राहणार आहे आणि नवीन सरकारला नेहमीच पाठिंबा देईल, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी पहिल्यांदा लाडली बहिणींची भेट घेतली. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अतिशय भावूक दिसले. तसेच, काही बहिणींनी त्यांना मिठी मारली आणि रडू लागल्या.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "मी राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. नूतन विधानसभा अध्यक्षांचेही अभिनंदन. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा झपाट्याने विकास होईल, अशी मला पूर्ण आशा आहे. मी त्याला नेहमीच पाठिंबा देईन." दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आणले नाही. मात्र, यादरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार केला होता.

शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले, "आज माझ्या मनात समाधानाची भावना आहे. २००३ मध्ये उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. मी त्याच सरकारला पुढे नेले. २००८ आणि २०१३ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने आमचे सरकार स्थापन झाले. २०१८ मध्येही आमची मतांची टक्केवारी जास्त होती, जागा नक्कीच कमी होत्या. तसेच, २०२३ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार स्थापन झाले आहे. यावर मी समाधानी आहे. आज मी येथून निरोप घेत आहे."

दरम्यान, मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर आता राज्यात शपथविधीची तयारी सुरू आहे. या सगळ्या दरम्यान शिवराज सिंह चौहान म्हणाले, "आम्हाला बिमारू राज्य मिळाले होते. माझ्यात जेवढे सामर्थ्य होते, तेवढेच मी या राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. उत्तम रस्ते, वीज व्यवस्था आणि कृषी क्षेत्राचा वेगवान विकास केला. मेट्रो-ट्रेनपर्यंत प्रवास केला. तसेच, मेडिकल कॉलेज आणि सीएम रायझ स्कूल बांधण्याचे काम केले. पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी प्रयत्न केले. आम्ही जनतेच्या विश्वासावर टिकू शकलो आहोत असे वाटते."

याचबरोबर, शिवराज सिंह चौहान म्हणाले, "माझ्यासाठी महिला सक्षमीकरण हे आता मत मिळवण्याचे साधन राहिलेले नाही. महिलांच्या उत्थानाचा विषय नेहमीच माझ्या मनात राहिला आहे. लाडली लक्ष्मी योजनेमुळे एमपीमध्ये लिंग गुणोत्तर सुधारले आहे. ही जबाबदारी चांगल्या सरकार आणि चांगल्या नेतृत्वावर सोपवून आम्ही पुढे जाऊ. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या उन्नतीसाठी मी काम करत राहीन. माझे आणि जनतेचे नाते कधीच मुख्यमंत्र्यांचे राहिले नाही, तर ते मामा-भावाचे राहिले आहे. मी श्वास असेपर्यंत प्रेम आणि विश्वासाचे नाते तुटू देणार नाही."

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा