शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

"मी कुठेही जात नाही, नवीन सरकारला सदैव सहकार्य करेन", शिवराज सिंह चौहान यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 14:40 IST

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भोपाळ : मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिवराज सिंह चौहान यांनी मोठे विधान केले आहे. मी कुठेही जात नाही. येथेच राहणार आहे आणि नवीन सरकारला नेहमीच पाठिंबा देईल, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी पहिल्यांदा लाडली बहिणींची भेट घेतली. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अतिशय भावूक दिसले. तसेच, काही बहिणींनी त्यांना मिठी मारली आणि रडू लागल्या.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "मी राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. नूतन विधानसभा अध्यक्षांचेही अभिनंदन. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा झपाट्याने विकास होईल, अशी मला पूर्ण आशा आहे. मी त्याला नेहमीच पाठिंबा देईन." दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आणले नाही. मात्र, यादरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार केला होता.

शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले, "आज माझ्या मनात समाधानाची भावना आहे. २००३ मध्ये उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. मी त्याच सरकारला पुढे नेले. २००८ आणि २०१३ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने आमचे सरकार स्थापन झाले. २०१८ मध्येही आमची मतांची टक्केवारी जास्त होती, जागा नक्कीच कमी होत्या. तसेच, २०२३ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार स्थापन झाले आहे. यावर मी समाधानी आहे. आज मी येथून निरोप घेत आहे."

दरम्यान, मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर आता राज्यात शपथविधीची तयारी सुरू आहे. या सगळ्या दरम्यान शिवराज सिंह चौहान म्हणाले, "आम्हाला बिमारू राज्य मिळाले होते. माझ्यात जेवढे सामर्थ्य होते, तेवढेच मी या राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. उत्तम रस्ते, वीज व्यवस्था आणि कृषी क्षेत्राचा वेगवान विकास केला. मेट्रो-ट्रेनपर्यंत प्रवास केला. तसेच, मेडिकल कॉलेज आणि सीएम रायझ स्कूल बांधण्याचे काम केले. पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी प्रयत्न केले. आम्ही जनतेच्या विश्वासावर टिकू शकलो आहोत असे वाटते."

याचबरोबर, शिवराज सिंह चौहान म्हणाले, "माझ्यासाठी महिला सक्षमीकरण हे आता मत मिळवण्याचे साधन राहिलेले नाही. महिलांच्या उत्थानाचा विषय नेहमीच माझ्या मनात राहिला आहे. लाडली लक्ष्मी योजनेमुळे एमपीमध्ये लिंग गुणोत्तर सुधारले आहे. ही जबाबदारी चांगल्या सरकार आणि चांगल्या नेतृत्वावर सोपवून आम्ही पुढे जाऊ. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या उन्नतीसाठी मी काम करत राहीन. माझे आणि जनतेचे नाते कधीच मुख्यमंत्र्यांचे राहिले नाही, तर ते मामा-भावाचे राहिले आहे. मी श्वास असेपर्यंत प्रेम आणि विश्वासाचे नाते तुटू देणार नाही."

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा