शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

"मी कुठेही जात नाही, नवीन सरकारला सदैव सहकार्य करेन", शिवराज सिंह चौहान यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 14:40 IST

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भोपाळ : मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिवराज सिंह चौहान यांनी मोठे विधान केले आहे. मी कुठेही जात नाही. येथेच राहणार आहे आणि नवीन सरकारला नेहमीच पाठिंबा देईल, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी पहिल्यांदा लाडली बहिणींची भेट घेतली. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अतिशय भावूक दिसले. तसेच, काही बहिणींनी त्यांना मिठी मारली आणि रडू लागल्या.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "मी राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. नूतन विधानसभा अध्यक्षांचेही अभिनंदन. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा झपाट्याने विकास होईल, अशी मला पूर्ण आशा आहे. मी त्याला नेहमीच पाठिंबा देईन." दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आणले नाही. मात्र, यादरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार केला होता.

शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले, "आज माझ्या मनात समाधानाची भावना आहे. २००३ मध्ये उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. मी त्याच सरकारला पुढे नेले. २००८ आणि २०१३ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने आमचे सरकार स्थापन झाले. २०१८ मध्येही आमची मतांची टक्केवारी जास्त होती, जागा नक्कीच कमी होत्या. तसेच, २०२३ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार स्थापन झाले आहे. यावर मी समाधानी आहे. आज मी येथून निरोप घेत आहे."

दरम्यान, मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर आता राज्यात शपथविधीची तयारी सुरू आहे. या सगळ्या दरम्यान शिवराज सिंह चौहान म्हणाले, "आम्हाला बिमारू राज्य मिळाले होते. माझ्यात जेवढे सामर्थ्य होते, तेवढेच मी या राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. उत्तम रस्ते, वीज व्यवस्था आणि कृषी क्षेत्राचा वेगवान विकास केला. मेट्रो-ट्रेनपर्यंत प्रवास केला. तसेच, मेडिकल कॉलेज आणि सीएम रायझ स्कूल बांधण्याचे काम केले. पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी प्रयत्न केले. आम्ही जनतेच्या विश्वासावर टिकू शकलो आहोत असे वाटते."

याचबरोबर, शिवराज सिंह चौहान म्हणाले, "माझ्यासाठी महिला सक्षमीकरण हे आता मत मिळवण्याचे साधन राहिलेले नाही. महिलांच्या उत्थानाचा विषय नेहमीच माझ्या मनात राहिला आहे. लाडली लक्ष्मी योजनेमुळे एमपीमध्ये लिंग गुणोत्तर सुधारले आहे. ही जबाबदारी चांगल्या सरकार आणि चांगल्या नेतृत्वावर सोपवून आम्ही पुढे जाऊ. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या उन्नतीसाठी मी काम करत राहीन. माझे आणि जनतेचे नाते कधीच मुख्यमंत्र्यांचे राहिले नाही, तर ते मामा-भावाचे राहिले आहे. मी श्वास असेपर्यंत प्रेम आणि विश्वासाचे नाते तुटू देणार नाही."

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा