शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

औकात विचारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला हटविले; मध्य प्रदेश सरकारची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 09:48 IST

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, अवमानकारक वक्तव्य आमचे सरकार अजिबात खपवून घेणार नाही.

भोपाळ : काय औकात आहे तुझी, असा ट्रकचालकाला उद्दाम प्रश्न विचारणारे मध्य प्रदेशातील शाजापूरचे जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांना त्या पदावरून हटविण्यात आले आहे.  

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, अवमानकारक वक्तव्य आमचे सरकार अजिबात खपवून घेणार नाही. त्यामुळे यादव यांच्या आदेशावरून किशोर कन्याल यांना जिल्हाधिकारी पदावरून त्यांची बदली राज्याच्या उपसचिवपदावर करण्यात आली. नरसिंगपूरच्या जिल्हाधिकारी रिजू बाफना यांना शाजापूरच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

नेमके काय झाले होते?शोर कन्याल यांनी ट्रकचालकांबरोबर एक बैठक घेतली. त्यात कन्याल यांनी सभ्य भाषेत बोलावे, असे ट्रकचालक संघटनेच्या एका प्रतिनिधीने सांगितले. त्यावर कन्याल भडकले. त्यांनी त्या प्रतिनिधीला विचारले की काय करणार तुम्ही? काय औकात आहे तुमची? ट्रकचालक व अन्य लोकांनी कायदा हातात घेऊ नये, असा इशाराही कन्याल यांनी दिला. या संभाषणाची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

कितीही मोठा अधिकारी असो..- वाहनचालकाच्या लायकीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्यावर बैठकीला उपस्थित असलेल्या लोकांनी निषेध व्यक्त केला. - आपण काही तरी चुकीचे बोललो आहे याची जाणीव झाल्याने कन्याल यांनी दिलगिरी व्यक्त केली.- या प्रकाराबाबत मुख्यमंत्री यादव म्हणाले की, गरीब वर्गातील माणसांच्या उत्थानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारेजण काम करत आहोत. - कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याने आपल्या कामाबद्दल व गरिबांविषयी आदर बाळगला पाहिजे. कन्याल यांनी वापरलेली भाषा आमचे सरकार कधीही सहन करणार नाही.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीcollectorजिल्हाधिकारी