शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
2
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
3
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
4
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
5
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
6
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
7
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
8
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
9
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
10
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
11
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
12
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
13
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
14
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
15
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
16
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
17
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
18
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
19
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
20
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...

तरुणांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास, संपूर्ण जगाला भारताचा अभिमान - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 21:25 IST

ग्वाल्हेर किल्ल्यावर असलेल्या सिंधिया शाळेच्या १२५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.

ग्वाल्हेर : देश आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. हे पूर्णपणे अभूतपूर्व आहे. आपल्या देशाचा संपूर्ण जगाला अभिमान आहे. २३ ऑगस्ट रोजी आपला देश चंद्रावरील अशा ठिकाणी पोहोचला, जिथे आजपर्यंत कोणताही देश पोहोचू शकला नव्हता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ग्वाल्हेर किल्ल्यावर असलेल्या सिंधिया शाळेच्या १२५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, "२०१४ मध्ये जेव्हा त्यांना प्रधान सेवकाची जबाबदारी मिळाली, तेव्हा माझ्याकडे दोन पर्याय होते. एकतर केवळ क्षणिक लाभ किंवा दीर्घकालीन विचार करून काम करणे. आमच्या सरकारला १० वर्षे झाली. सरकारने दीर्घकालीन नियोजनाचे निर्णय घेतले. हे निर्णय अभूतपूर्व आहेत. आज देशाचे यश शिखरावर आहे. आपल्या देशाचा संपूर्ण जगाला अभिमान आहे. २३ ऑगस्ट रोजी भारत चंद्रावर अशा ठिकाणी पोहोचला जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचू शकला नव्हता." 

याचबरोबर, याआधी केवळ सॅटेलाइट सरकारद्वारे बनवले जात होते किंवा परदेशातून आणले जात होते, परंतु त्यांच्या सरकारने स्पेस सेक्टरसोबत डिफेन्स सेक्टर तरुणांसाठी खुले केले आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, तरुणांना मेक इन इंडियाचा संकल्प घेऊन पुढे जाण्याचे आणि नेहमी चौकटीबाहेरचा विचार करण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले. याशिवाय, भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी आहे. आज जागतिक फिनटेक अॅडॉप्शन रेटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. गगनयानच्या क्रू एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. आज देशासाठी काहीही अशक्य राहिलेले नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

गरीबी दूर होईल आणि देश विकसित बनेलकेंद्र सरकारच्या योजनांचे कौतुक करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, गरिबीला दूर करुन आपला देश विकसित होईल. आज भारत सर्व काही मोठ्या प्रमाणावर करत आहे. स्वप्ने आणि संकल्प दोन्ही मोठे असली पाहिजे. तुमचे स्वप्न खरंतर माझा संकल्प आहे. जेथे संधींची कमतरता नाही, असे वातावरण निर्माण केले पाहिजे. तरुणांच्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. या सर्वांचा दृढनिश्चय यशाकडे नेईल. येणारी २५ वर्षे प्रत्येकासाठी महत्त्वाची आहेत, तितकीच देशासाठीही महत्त्वाची आहेत. तसेच, आमच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतल्याचेही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेश