शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शेतात जाण्यासाठी शेतकऱ्याने सरकारकडे मागितलं थेट हेलिकॉप्टर; कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 15:59 IST

एका शेतकऱ्याने सरकारकडे हेलिकॉप्टर मागितल्याची ही अनोखी घटना आता समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील नीमचमध्ये एका शेतकऱ्याने सरकारकडे हेलिकॉप्टर मागितल्याची ही अनोखी घटना आता समोर आली आहे. नीमचमधील कनावटी येथील शेतकरी विलास चंद्र पाटीदार यांना दोन वर्षांपासून त्यांच्या शेतात जाता आलेलं नाही. खरंतर त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही. या समस्येबाबत विलास हे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांपर्यंत आले होते. याच दरम्यान त्यांनी थेट हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.

नीमच येथील जनसुनावणीत जिल्हा मुख्यालयात पोहोचलेले शेतकरी विलास चंद्र पाटीदार यांनी सांगितलं की, त्यांचं कनवटी गावात शेत आहे. भूमाफियांनी शेताच्या आजूबाजूला शेती खरेदी करून बाऊंड्री केली आहे. या स्थितीत त्याच्या शेतापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. या समस्येबाबत आपण तहसीलच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, मात्र कोणताही तोडगा निघत नसल्याचं पाटीदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं.

शेतकरी पाटीदार सांगतात की आता त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यांनी पर्यायी मार्ग देण्यासाठी तक्रार केली. यासोबतच निवेदनही देण्यात आले, मात्र या समस्येची दखल घेण्यात आलेली नाही. दोन वर्षांपासून त्यांना त्यांच्या शेतात शेती करता आलेली नाही. त्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विलास यांनी केली आहे. हेलिकॉप्टर देता येत नसेल, तर सरकारने उड्डाणपूल बनवावा, जेणेकरून ते आपल्या शेतापर्यंत पोहोचू शकतील, असंही ते म्हणाले.

पत्र पाहून जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेले जिल्हाधिकारी व इतर अधिकारीही आश्चर्यचकित झाले. जिल्हाधिकारी दिनेश जैन यांनी संबंधित तहसीलदारांकडे चौकशी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या समस्येवर तोडगा निघेल, अशी आशा विलास यांनी व्यक्त केली आहे. जागेवर अतिक्रमण झाल्याच्या अनेक तक्रारी जनसुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच अमावली महल गावातील लक्ष्मण सिंह, जावद येथील संतोष बाई, जावद येथील रमेश बोहरा यांनी त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीMadhya Pradeshमध्य प्रदेश