शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

शेतात जाण्यासाठी शेतकऱ्याने सरकारकडे मागितलं थेट हेलिकॉप्टर; कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 15:59 IST

एका शेतकऱ्याने सरकारकडे हेलिकॉप्टर मागितल्याची ही अनोखी घटना आता समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील नीमचमध्ये एका शेतकऱ्याने सरकारकडे हेलिकॉप्टर मागितल्याची ही अनोखी घटना आता समोर आली आहे. नीमचमधील कनावटी येथील शेतकरी विलास चंद्र पाटीदार यांना दोन वर्षांपासून त्यांच्या शेतात जाता आलेलं नाही. खरंतर त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही. या समस्येबाबत विलास हे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांपर्यंत आले होते. याच दरम्यान त्यांनी थेट हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.

नीमच येथील जनसुनावणीत जिल्हा मुख्यालयात पोहोचलेले शेतकरी विलास चंद्र पाटीदार यांनी सांगितलं की, त्यांचं कनवटी गावात शेत आहे. भूमाफियांनी शेताच्या आजूबाजूला शेती खरेदी करून बाऊंड्री केली आहे. या स्थितीत त्याच्या शेतापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. या समस्येबाबत आपण तहसीलच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, मात्र कोणताही तोडगा निघत नसल्याचं पाटीदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं.

शेतकरी पाटीदार सांगतात की आता त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यांनी पर्यायी मार्ग देण्यासाठी तक्रार केली. यासोबतच निवेदनही देण्यात आले, मात्र या समस्येची दखल घेण्यात आलेली नाही. दोन वर्षांपासून त्यांना त्यांच्या शेतात शेती करता आलेली नाही. त्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विलास यांनी केली आहे. हेलिकॉप्टर देता येत नसेल, तर सरकारने उड्डाणपूल बनवावा, जेणेकरून ते आपल्या शेतापर्यंत पोहोचू शकतील, असंही ते म्हणाले.

पत्र पाहून जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेले जिल्हाधिकारी व इतर अधिकारीही आश्चर्यचकित झाले. जिल्हाधिकारी दिनेश जैन यांनी संबंधित तहसीलदारांकडे चौकशी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या समस्येवर तोडगा निघेल, अशी आशा विलास यांनी व्यक्त केली आहे. जागेवर अतिक्रमण झाल्याच्या अनेक तक्रारी जनसुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच अमावली महल गावातील लक्ष्मण सिंह, जावद येथील संतोष बाई, जावद येथील रमेश बोहरा यांनी त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीMadhya Pradeshमध्य प्रदेश