शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायासाठी शेतकऱ्याचे लोटांगण, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 21:51 IST

या व्हिडीओमध्ये दिसत असलेला शेतकरी न्यायाची याचना करत असून जमीन बळकावणाऱ्या स्थानिक माफियांविरोधात आपली बाजू मांडत आहे.

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक वृद्ध शेतकरी हात जोडून जिल्हाधिकारी कार्यालयात लोटांगण घालत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेला शेतकरी न्यायाची याचना करत असून जमीन बळकावणाऱ्या स्थानिक माफियांविरोधात आपली बाजू मांडत आहे.

शंकरलाल असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शंकरलाल यांनी आपल्या समस्या सांगताना सांगितले की, भूमाफियांनी जगणे कठीण केले आहे. तहसीलदार चूक करतात, पण शेतकऱ्याला शिक्षा होते. त्यांच्याकडून चुका होतात आणि आम्हाला त्रास होतो.

या शेतकऱ्याने सरकार आणि प्रशासनावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तसेच, येथील अधिकारी भ्रष्ट आहेत, असा आरोप करत आमची अवस्था फार वाईट आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असेही शेतकऱ्याने म्हटले आहे. दरम्यान, जनसुनावणीत येणाऱ्या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येते, असे जिल्हाधिकारी दिलीप यादव यांनी सांगितले. मंगळवारी जनसुनावणीला अनेक जण आले होते, त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवल्या गेल्याचे दिलीप यादव यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या जमिनीबाबत तक्रार होती, ती जागा अजूनही शंकरलाल यांच्या ताब्यात असल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या ही जमीन फक्त शंकरलाल आणि त्यांच्या कुटुंबाकडे आहे. खरेदीदाराने अद्याप अर्धीही जमीन घेतलेली नाही, जी पूर्वी जमीन कसणाऱ्यांनी विकली होती, असेही स्थानिक प्रशासनाने सांगितले.

सरकारी तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, सुखड गावात ६०४ आणि ६२५ असे दोन सर्व्हे क्रमांक असल्याचे समोर आले आहे. सर्व्हे क्रमांक ६०४ मध्ये २.५ हेक्टर आणि सर्व्हे क्रमांक ६२५ मध्ये १.०१ हेक्टर जमीन आहे. ही जमीन शंकरलाल आणि त्यांचे कुटुंबियांच्या मालकीची आहे. ज्यामध्ये फुलचंद यांचा मुलगा अनोखिलाल, भगवान भाई आणि रेशम भाई, तसेच घाटी येथील बाबा घाशीराम, कारू लाल, रामलाल, प्रभु लाल, मांगी बाई आणि पार्वती बाई यांचा समावेश आहे.

या जमिनीचा अर्धा हिस्सा ३१ डिसेंबर २०१२ च्या विक्री करारानुसार, मंदसौरचे रहिवासी नारायण राव यांचा मुलगा अश्विन याला विकली गेली. २०१०-११ मध्ये सीतामऊच्या तत्कालीन तहसीलदारांनी या जमिनीच्या हस्तांतरणास मान्यता दिली होती. पण, विकलेली जमीन अजूनही कारूलाल, रामलाल, प्रभुलाल, मांगीबाई आणि पार्वतीबाई यांच्या ताब्यात आहे. ही जमीन ते अश्विनला देण्यास तयार नाहीत. 

टॅग्स :FarmerशेतकरीMadhya Pradeshमध्य प्रदेश