शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

ड्रायव्हरची लायकी काढणारे जिल्हाधिकारी अडचणीत, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी कारवाई   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 12:45 IST

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील शाजापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी, ड्रायव्हर आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या वादावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकाची लायची काढल्याने प्रकरण चिघळले होते.

केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात देशभरातील ट्रकचालकांनी संप पुकारला होता. त्याचा परिणाम देशातील बहुतांश मालाच्या दळणवळणावर झाला होता. दरम्यान,  मध्य प्रदेशमधील शाजापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी, ड्रायव्हर आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या वादावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकाची लायची काढल्याने प्रकरण चिघळले होते. दरम्यान, या जिल्ह्याधिकाऱ्यांवर आता मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री मोहन यादव यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

शाजापूर येथे घडलेल्या या घटनेबाबत कारवाई करताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांन संबंधित जिल्ह्याधिकारी किशोर कन्याल यांना पदावरून हटवले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं की, हे सरकार गरिबांचं आहे. सर्वांच्या कामाचा सन्मान झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गरिबांची सेवा करत आहोत. मानवतेच्या भावनेतून अशी भाषा आमचं सरकार सहन करणार नाही. मी स्वत: मजूर कुटुंबातील मुलगा आहे. अशी भाषा वापरणं योग्न नाही. अधिकाऱ्यांना भाषा आणि व्यवहारावर लक्ष ठेवावं.

काल झालेल्या बैठकीवेळी   जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच, नीट समजावून सांगा, असेही तो म्हणाला. त्यावर, जिल्हाधिकाऱ्यांना राग अनावर झाला. त्यांनी ड्रायव्हरला सुनावले. यामध्ये चुकीचं काय आहे?, समजतो काय स्वत:ला, काय करणार तू, तुझी लायकी काय? असं विधान त्यांनी केलं होतं.

त्यानंतर ड्रायव्हरनेही तितकंच परखड उत्तर दिलं. तो म्हणाला. हीच तर आमची लढाई आहे की, आमची काहीच लायकी नाही. त्यावर, कलेक्टर म्हणाले की, लढाई अशी असू शकत नाही. कृपया तुम्ही कायदा हातात घेऊ नका, तुमच्या सर्व अडचणी ऐकण्यासाठीच तुम्हाला इथं बोलावलं आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रागावल्याने बैठक काही वेळेसाठी स्थगित करण्यात आली. त्यानंतर, ड्रायव्हरने माफीही मागितली. तर, जिल्हा प्रशासनानेही आंदोलन शांतीपूर्ण पद्धतीने करा, कुठलाही हिंसाचार करू नका, असे आवाहन ड्रायव्हर्संना केले होते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीGovernmentसरकार