शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बापरे! आंबा खाणं महिलेच्या जीवावर बेतलं, तीव्र डोकेदुखी अन्...; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 15:06 IST

अर्चनाने जेवणानंतर आंबे खाल्ले होते. यानंतर अचानक तिची प्रकृती ढासळू लागली.

मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबा खाणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. आंबा खाल्ल्यानंतर एका महिलेची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इंदूरच्या राजेंद्र नगर पोलीस स्टेशनच्या बिजलपूरची आहे. अर्चनाने जेवणानंतर आंबे खाल्ले होते. यानंतर अचानक तिची प्रकृती ढासळू लागली. डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या. बराच वेळ होऊनही तिचा त्रास कमी न झाल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. जिथे तिचा मृत्यू झाला.

अर्चनाचे सासरे बन्सीलाल अटेरिया यांनी सांगितलं की, आंबे खाल्ल्यानंतर अर्चनाचं डोकं खूप दुखायला लागलं होतं. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिचं बीपी सतत कमी होत होतं. याचदरम्यान अचानक तिचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, यापूर्वी गावातील अनेक लोक आंबे खाल्ल्याने आजारी पडत होते.

पोलीस अधिकारी राघवेंद्र सिंह चौहान यांनी सांगितलं की, अर्चना आंबे खाल्ल्यानंतर आजारी पडली होती. यानंतर कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMangoआंबा