शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भाजपविरोधातील '५० टक्के कमिशन' ट्विट काँग्रेस नेत्यांना भोवणार? प्रियांका गांधींसह तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 16:11 IST

एका वर्तमानपत्रातील वृत्ताचा दाखला देत प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर ५० टक्के कमिशनचा आरोप ट्विटद्वारे केला होता.

इंदूर : मध्य प्रदेशात ५० टक्के कमिशनचा वाद वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी, राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्येष्ठ नेते अरुण यादव यांच्या ट्विटरवरील एका पोस्टविरोधात भाजप नेत्यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार, इंदूरमधील संयोगितागंज पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ४६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, पोलिसांनी ज्ञानेंद्र अवस्थी नावाच्या व्यक्तीविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे. 

एका वर्तमानपत्रातील वृत्ताचा दाखला देत प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर ५० टक्के कमिशनचा आरोप ट्विटद्वारे केला होता. त्या म्हणाल्या की, "मध्य प्रदेशातील कंत्राटदारांच्या संघटनेने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून तक्रार केली आहे की, त्यांना ५० टक्के कमिशन दिल्यानंतरच पैसे मिळतात. कर्नाटकातील भ्रष्ट भाजप सरकार ४० टक्के कमिशन घेत होते. मध्य प्रदेशात भाजपाने भ्रष्टाचाराचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. कर्नाटकच्या जनतेने ४० टक्के कमिशन सरकारची हकालपट्टी केली, आता मध्य प्रदेशातील जनता ५० टक्के कमिशन सरकारला सत्तेवरून हटवेल," असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला होता.

या ट्विटवरून भाजपा कायदेशीर सेलचा कार्यकर्ता निमेश पाठक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शनिवारी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. इंदूरमधील संयोगितागंज येथे भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) आणि ४६९ (प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने खोटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, याप्रकरणी भाजपच्या इतर नेत्यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  निमेश पाठक यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, "काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या वृत्तपत्राच्या एका वृत्ताबद्दल त्यांना माहिती मिळाली. एका खासदाराने काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून ५० टक्के कमिशन मागितल्याबाबत कंत्राटदार संघटनेने उच्च न्यायालयात पत्र लिहिले होते. हे पत्र ज्ञानेंद्र अवस्थी यांनी लिहिले होते. परंतु, त्यांनी अवस्थीबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना अशा कोणत्याही संघटनेबद्दल किंवा व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही". 

याचबरोबर, "मध्य प्रदेश सरकार आणि भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसकडून दिशाभूल करणारे आरोप करून हे पत्र नियोजनबद्ध पद्धतीने विविध सोशल मीडिया साइट्सवर व्हायरल केले जात असल्याचा संशय आहे . जर ते खरे असेल आणि ज्ञानेंद्र अवस्थी प्रत्यक्षात उपलब्ध असतील तर मध्य प्रदेश सरकारच्या धोरणानुसार आणि नियमांनुसार कठोर कारवाई केली जावी," असेही तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, डोक्यापासून पायापर्यंत घोटाळ्यांनी घेरलेल्या शिवराज सिंह चौहान सरकारच्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांतील भाजप नेत्यांनी प्रियांका गांधी, जयराम रमेश आणि माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढे कमलनाथ म्हणाले की, ज्या सरकारला मध्य प्रदेशमधील सर्वजण कमिशन राज सरकार म्हणतात, ते सरकार भ्रष्टाचाराची चौकशी करू शकत नाही. उलट भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांना छळू शकते. मी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहण्याचे आणि हा ५० टक्के कमिशनचा नियम उखडून टाकण्याचे आवाहन करतो.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस