शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

अंत्यसंस्कारासाठी गैरहजर! पण वडिलांची चप्पल मागण्यासाठी करोडपती लेक वृद्धाश्रमात पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 16:29 IST

सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही.

सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. हास्यास्पद तितक्याच संतापजनक घटना समोर येत असतात. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना सर्वांना थक्क करुन जातात. अशीच एक संतापजनक घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली. येथे वृद्धाश्रमात जाण्यासाठी व्यग्र असलेल्या व्यक्तीने जे केले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. आपले पालक वर्षभरापूर्वी मरण पावले असल्याचे माहिती असताना तो अंत्यदर्शनासाठी आला नाही. पण, आता गरज भासताच त्याने वृद्धाश्रमाचा दरवाजा ठोठावला.

दरम्यान, भोपाळच्या आसरा वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापक राधा चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वृद्धाश्रमात दरवर्षी पितृ पक्षाच्या काळात ही परिस्थिती पाहायला मिळते. अनेकजण आपल्या पालकांची आठवण सांगत इथे येत असतात. या १५ दिवसांत लोक मोठ्या थाटामाटात येतात आणि त्यांच्या आई-वडिलांची विचारपूस करतात. त्यांच्या आई-वडिलांची एखादी आठवण असल्यास द्यावी अशी मागणी ते करत असतात.

अंत्यसंस्कारासाठी गैरहजर पण... मृतांच्या आठवणी, निशाणी किंवा एखादी वस्तू त्यांच्या वारसाला दिली जाते. संस्थेतर्फे संबंधित मृत व्यक्तींच्या घरच्यांना तशी कल्पना दिली जाते. मात्र, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे तेच वंशज आहेत जे आपल्या आई-वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी देखील आले नव्हते. त्यावेळी आश्रमातर्फे ज्येष्ठांचे अंतिम संस्कार करण्यात आले. आता इतक्या वर्षांनंतर लोकांना आपल्या आई-वडिलांची आठवण आली आणि ते हे आठवणी सांगत आहेत. एक वर्षापूर्वी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. आता त्यांचा मुलगा इथे चप्पल मागायला आला आहे, असेही राधा चौबे यांनी सांगितले.

माझे वडील स्वप्नात येतात... ते माझ्याकडे चप्पल मागतात, अशी मागणी करत एक व्यक्ती आश्रमात आला. अनेक जण आजारपणाची किंवा मृत्यूची माहिती मिळाल्यावर केवळ अंत्यसंस्कारासाठी पैसे खर्च करावे लागतील म्हणून आपल्या वडिलधाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. किंबहुना त्यांना भीती वाटते की मृत आत्मा त्यांना त्रास देऊ शकतो, असेही वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी सांगितले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSocial Mediaसोशल मीडिया