शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून नवनवीन कारणे, 5 दिवसांत आले 500 अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 20:03 IST

या कर्मचाऱ्यांकडून अर्जामध्ये अशी एकापेक्षा एक कारणे दिली जात आहेत की, ती पाहून वाचकांचीही करमणूक होत आहे.

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच निवडणूक ड्युटीपासून लांब राहण्यास प्राध्यान्य देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात अर्ज प्रशासनाकडे पोहोचू लागले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून अर्जामध्ये अशी एकापेक्षा एक कारणे दिली जात आहेत की, ती पाहून वाचकांचीही करमणूक होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच निवडणूक ड्युटीतून वगळण्यासाठी अनके कर्मचाऱ्यांचे अर्ज प्रशासनाकडे येऊ लागले आहेत. यामध्ये विविध कारणे नमूद करण्यात आली आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमधील व्यवस्थापक स्तरावरील एका अधिकाऱ्याने तर अजबच कारण दिले आहे. या अधिकाऱ्याने आपल्या अर्जात "माझी अचानक स्मरणशक्ती कमी झाली असून दोन तास येत नाही. अशा स्थितीत निवडणूक कर्तव्य कसे पार पाडता येईल? असा सवाल केला आहे. दरम्यान, प्रशासनाने त्यांचा अर्ज मेडिकल बोर्डाकडे पाठवला आहे.

दुसरीकडे, लष्कर सर्कलमधील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने निवडणूक ड्युटी लावली जाऊ नये, यासाठी आपल्या अर्जात म्हटले आहे की, "माझे हिमोग्लोबिन कमी आहे. जेव्हा ते अप-डाऊन होते, तेव्हा मला कधीही चक्कर येते. यामुळे मी 30 ते 40 मिनिटे बेशुद्ध होते. अशा परिस्थितीत मी निवडणूक ड्युटी कशी करू शकते?".

5 दिवसांत 500 हून अधिक अर्ज गेल्या 9 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून अवघ्या 5 दिवसांत असे 500 हून अधिक अर्ज प्रशासनाकडे पोहोचले आहेत. त्यापैकी एकूण 130 अर्ज असे आहेत की, त्यात निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी अजब कारणे देण्यात आली आहेत. तसेच, 60 अर्ज शिक्षण विभागाचे असून, ते निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी देण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या अर्जामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच हे अर्ज निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे.

अनेकजण थेट अर्जच घेऊन येत आहेत...विधानसभा निवडणुकीत ड्युटीतून दिलासा मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी ग्वाल्हेर यांनी जिल्हा पंचायत सीईओंना निवडणूक ड्युटीतून सूट देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. निवडणूक ड्युटीतून मुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. अनेकजण थेट अर्ज घेऊन येत आहेत. निवडणुकीत असे अर्ज देत असताना उरलेल्या दिवसांत कोणते सरकारी काम ते करू शकणार, याचाही गांभीर्याने विचार अधिकारी करत आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशEmployeeकर्मचारी