शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळे मी गप्प आहे, मंत्रिपद न मिळाल्याने ९ निवडणुका जिंकणाऱ्या भाजपा नेत्याची खदखद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 16:16 IST

Gopal Bhargav: मध्य प्रदेशमधील सर्वात ज्येष्ठ आमदार गोपाल भार्गव यांना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील जाणकार आणि भार्गव यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.

मध्य प्रदेशमधील सर्वात ज्येष्ठ आमदार गोपाल भार्गव यांना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील जाणकार आणि भार्गव यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. आता पुढे काय होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर आता गोपाळ भार्गव यांनी स्वत: पुढे येत दिलं आहे. तसेच पुढील रणनीतीही सांगितली आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये नवव्यांदा आमदार बनल्याचा उल्लेख केला आहे. तसेच राज्यभरात समाजाला संघटित केल्याचाहऊ उल्लेख केला आहे.

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील रहली विधानसभा मतदारसंघातील आमदार गोपाल भार्गव यांनी फेसबूकवरून आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, आज मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळाची घोषणा झाली. मी नवनियुक्त मंत्र्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो. आज राज्यभरातील माझे समर्थक माझा मंत्रिमंडळात  समावेश का झाला नाही, अशी विचारणा करत  आहेत. मी त्यांना सांगितलं की, ४० वर्षांच्या दीर्घ राजकीय प्रवासात आतापर्यंत पक्षाने ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्यांचं समर्पिक भावनेने निर्वहन केलं आहे. तसेच पुढेही ते करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या स्थापनेबाबत पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. पद येत जात राहतं. पण जनतेचा विश्वास कायम असतो. एवढी वर्षे मी माझ्या मतदारसंघात आणि राज्यात जी सेवा केली आहे, तो माझा ठेवा आणि वारसा आहे. माझ्या मतदारसंघाने मला सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे. ही बाब देशात दुर्मीळ आहे. यावेळी मतदारांनी मला ७० टक्के मतं आणि ७३ हजारांच्या मताधिक्यासह विजय मिळवून दिला. हे माझ्यावर ऋण आहे. मी जोपर्यंत या मतदारसंघाचा आमदार आहे, तोपर्यंत मी या भागासाठी काही कमी पडू देणार नाही. राजकीय पक्षांचे स्वत:चे फॉर्म्युले असतात. सामाजिक, प्रादेशिक कारणं असतात. त्याच्या खोलात जाण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे मी गप्प आहे. आता मोकळ्या वेळाचा वापर मी समाजाला संघटित करून समाजोद्धारासाठी करणार आहे. दरम्यान, काही वेळातच भार्गव यांनी मूळ पोस्ट एडिट केली होती.

मध्य प्रदेशच्या सोळाव्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असलेल्या गोपाल भार्गव यांनी सागर जिल्ह्यातील रहली मतदारसंघातून सलग नवव्यांदा विजय मिळवला आहे. भार्गव हे १९८५ पासून सातत्याने विजय मिळवून विधानसभेत पोहोचत आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा