शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संतापजनक! बहिणीची काढली छेड, भावाची बेदम मारहाण करून हत्या, वाचवायला धावलेल्या आईला केलं विवस्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 14:23 IST

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही गावगुंडांनी छेडछाडीच्या प्रकरणात तडजोड करण्यास नकार दिल्याने एका दलित कुटुंबातील तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे.

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही गावगुंडांनी छेडछाडीच्या प्रकरणात तडजोड करण्यास नकार दिल्याने एका दलित कुटुंबातील तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच या आरोपींनी तरुणास वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या आईलाही विवस्त्र केल्याचा आरोप आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सागर जिल्ह्यातील खुरई देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरोदिया नौनागिर येथे घडली आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींनी मृत तरुणाच्या बहिणीची छेड काढली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. मात्र आरोपी याबाबतची तक्रार मागे घेऊन तडजोड करण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव आणत होते. दरम्यान, या तरुणीचा भाऊ गुरुवारी रात्री बाजारात गेला असता या गावगुंडांनी त्याला अडवले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई धावली असता तिलाही विवस्त्र करून मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ९ आणि इतर ४ आरोपींविरोधात हत्येसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी मुख्य  आरोपीसह ८ अन्य आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेमागे असलेले गावातील सरपंच पतीसह फरार आहेत. 

मृत तरुणाच्या बहिणीने सांगितले की, गावामधील विक्रम सिंह, कोमल सिंह आणि आझाद सिंह हे आमच्या घरी आले होते. तसेच तडजोड करण्यासाठी दबाव आणत होते. तेव्हा आईने जेव्हा कोर्टात सुनावणी होईल तेव्हा राजीनामा करू असे सांगितले. तेव्हा आरोपींनी तुम्हाला तुमच्या मुलांचा जीव नको आहे का? अशी धमकी दिली. तसेच तो आम्हाला जिथे भेटेल तिथे त्याला संपवू असे सांगितले. माझा धाकटा भाऊ बस स्टँडजवळ भाजी घेण्यासाठी गेला होता. तिथून तो येत होता. तेव्हा रस्त्यात आरोपींनी त्याला मारहाण केली. तो पळू लागला तेव्हा काही लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी मुख्य आरोपी विक्रम सिंह याच्यासह आझाद ठाकूर, इस्लाम खान, सुशील कुमार सोनी, अनीश खान, फरीम खान, अभिषेक रैकवार, अरबाझ खान यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण बरौदिया नौनागिर येथील रहिवासी आहेत. आता आरोपी कोमल सिंह ठाकूर यांच्यासह इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.  

या घटनेनंतर राजकारणालाही तोंड फुटले आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दलितांवरील अत्याचारावरून मध्य प्रदेश सरकारवर टीका केली आहे. मध्य प्रदेश दलित अत्याचाराची प्रयोगशाळा बनली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश