शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

आई सुरक्षित तर देश सुरक्षित !

By admin | Updated: April 12, 2017 15:08 IST

सुरक्षित मातृत्त्व ही नुसती संकल्पना नसून प्रत्येक आईचा तो अधिकार आहे. 11 एप्रिल हा दिवस प्रत्येक स्त्रीपर्यतं आणि आईपर्यंत हाच संदेश पोहोचवू पाहत आहोत.

‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस’ प्रत्येक आईला आपल्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागृत करत आहे. सुरक्षित मातृत्त्व ही नुसती संकल्पना नसून प्रत्येक आईचा तो अधिकार आहे. 11 एप्रिल हा दिवस प्रत्येक स्त्रीपर्यंत आणि आईपर्यंत हाच संदेश पोहोचवू पाहत आहोत. 11एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात अजूनही प्रसुतीदरम्यान, प्रसुतीनंतर माता मृत्यूचं, अर्भक मृत्यूचं प्रमाण लक्षणीय आहे. त्या पार्शभूमीवर या दिवसाचं महत्त्व म्हणूनच आहे. या दिवसाचं महत्त्व भारतीय समाजात, जनमानसात, गर्भवती स्त्रियांमध्ये रूजावं म्हणून ‘व्हाइट रिबन अलायन्स आॅफ इंडिया’ ही संघटना चळवळीसारखं काम करत आहे.

बाळाच्या जन्माच्या वेळेस स्त्रीची सुरक्षा  हा तिचा मुलभूत हक्क आहे हे ठासून सांगण्याचं काम ही संघटना करत आहे. या संघटनेत जवळजवळ 1800 संस्था एकत्र आलेल्या आहेत आणि मातृत्व सुरक्षेचं महत्त्व समाजात रूजण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करता आहेत. या संघटनेच्या आग्रहास्तव सरकारनं 2003 मध्ये 11 एप्रिल कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्त्व दिवस’म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित केला.

मूल जन्माला घालण्याआधी आणि जन्माला घातल्यानंतर बाईचं सुरक्षित आणि सुदृढ आरोग्य हा तिचा अधिकार आहे, हे प्रत्येकीच्या मनात बिंबवणं हाच "व्हाइट रिबन्स अलायन्स आॅफ इंडिया"चा मूळ उद्देश आहे. त्यासाठी मातोच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सुविधांच्या बळकटीकरणाचं काम ही संघटना करते. आरोग्य सेविकांचा क्षमता विकास करणं, मातृ सुरक्षेच्या योजनांमध्ये वाढ करणं, यासाठी तंत्रज्ञान विकसित करणं, वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रशिक्षण आयोजित करणं यासारखे उपक्रम संपूर्ण देशभरात या संघटेनेमार्फत राबवले जातात.

एकीकडे देशात मातामृत्यूचं प्रमाण आजही जास्त आहे तरीही गर्भवती स्त्रियांपर्यंत, मातांपर्यंत किफायतशीर दरात पुरेशा आरोग्य सेवा, माहिती, तंत्रज्ञान पोहोचवलं, त्यांना आपल्या आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्याविषयी जागृत आणि शिक्षित केलं तर हे प्रमाण नक्कीच कमी होवू शकतं. गर्भावस्थेत सकस आहार घेणं, प्रसुती झाल्यानंतर लगेच अर्ध्या तासात बाळाला स्तनपान करणं या गोष्टी तिच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनं, नवजात बाळाला रोगांपासून दूर ठेवणाऱ्या त्याच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी किती महत्त्वाच्या आहेत हे स्त्रियांना पटवून देण्यासाठी ही संघटना कार्य करते आहे.

मातामृत्यू म्हणजे केवळ एका व्यक्तीचं आणि एका कुटुंबाचं नुकसान नसतं. संपूर्ण देश ते नुकसान सोसत असतं. देश ती स्त्री देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात करू शकणाऱ्या योगदानाला मुकतो. समाज तिच्या सल्ला मसलतीला मुकतो. आणि तिचं स्वत:चं कुटुंब तिच्या प्रेमाला, काळजीला, तिच्या पोषणाला आणि उत्पादनक्षमतेला मुकतो आणि म्हणूनच प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीपश्चात स्त्रीचं आरोग्य सुरक्षित राहाणं खूप महत्त्वाचं आहे हा व्यापक विचार घेऊन व्हाइट रिबन अलायन्स आॅफ इंडिया काम करत आहे.

या संघटनेच्या मते मातामृत्यू रोखण्याचे महत्त्वाचे मार्ग म्हणजे * प्रत्येक गर्भवती स्त्रीची प्रसुती ही दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होणं. * किशोरवयीन आणि मातावयीन मुलींमधलं अ‍ॅनेमियाचं प्रमाण कमी करणं.* गर्भावस्थेत सकस आहार घेण्याच्या महत्त्वाबद्दल स्त्रियांना माहिती शिक्षण देणं. * कुटुंबनियोजनाचं महत्त्वं आणि त्याचे सुरक्षित उपाय याबद्दल स्त्रियांमध्ये जनजागृती करणं. * गर्भावस्थेत प्रत्येक स्त्रीनं आपली पुरेपूर काळजी घेणं. * बाळाला स्तनपान करण्याचं महत्त्व प्रत्येक स्त्रीला पटणं. * प्रसूतीनंतर मातेच्या वेदना, अतिरक्तस्त्राव, संसर्ग रोखणारे औषधं, वैद्यकीय सेवा प्रत्येक स्त्रीला उपलब्ध असणं* बालविवाह रोखणं* प्रसूतीदरम्यान येवू शकणाऱ्या अडचणींची जाणीव खूप आधीच होणं. * प्रसूतीदरम्यान, प्रसूतीनंतर स्त्रीची योग्य काळजी घेणं* लैंगिक आजार रोखणं आणि नियंत्रित करणं* मातेला आणि तिच्या बाळाला प्राथमिक आरोग्य सुविधा मिळणं आणि सर्वात