शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

लग्नानंतर चुकूनही या पाच गोष्टी लगेच करु नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 13:08 IST

लग्नानंतर जबाबदारी वाढल्यामुळे पती-पत्नीच्या स्वभावामध्ये काही बदल होतात. प्रियकर-प्रेयसी असताना ज्या गोष्टी मस्करीमध्ये घेतल्या जात होत्या. त्याच विषयांवर दोघेही नंतर गंभीर होतात.

मुंबई - लग्नानंतर जबाबदारी वाढल्यामुळे पती-पत्नीच्या स्वभावामध्ये काही बदल होतात. प्रियकर-प्रेयसी असताना ज्या गोष्टी मस्करीमध्ये घेतल्या जात होत्या. त्याच विषयांवर दोघेही नंतर गंभीर होतात. त्यामुळे लग्नानंतर दोघांनीही काही गोष्टींचे भान बाळगणे आवश्यक आहे. लग्नानंतर चुकूनही या विषयांचा आपल्या जोडीदाराजवळ उल्लेख करु नका. अन्यथा नात्यात तणाव निर्माण होईल.

- लग्नामध्ये झालेल्या खर्चाला मुद्दा बनवू नका. लग्नामध्ये झालेल्या खर्चाचा विषय वारंवार उपस्थित करुन त्यावरुन वाद निर्माण होईल अशी स्थिती उत्पन्न करु नका. 

- लग्नानंतर नातेवाईकांना विनोदाचा विषय बनवणे टाळा. मुलाने मुलीला तिच्या नातेवाईकांवरुन टोमणे मारु नये तसेच मुलीनेही मुलाच्या घरच्यांवरुन कोणतीही आपत्तीजनक प्रतिक्रिया देऊ नये. अन्यथा मोठा वाद अटळ आहे. 

-  नवरा-बायको दोघांनीही पूर्व प्रियकर किंवा पूर्व प्रेयसीशी तुलना करु नये. तुमचे नवीन लग्न झालेले असताना लगेचच अशा प्रकारची तुलना करणे घातक ठरु शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात त्यामुळे वादळ येऊ शकते. 

- लग्नातल्या एखाद्या घटनेवरुन पत्नीने पतीला त्याच्या मित्रपिरवारावरुन सुनावणे किंवा पतीने पत्नीला तिच्या मैत्रिणींवरुन बोलण्यामुळे अहंकार दुखावला जातो आणि विनाकारण भांडण सुरु होते. 

-    लग्नानंतर अनेकदा मुली  ते तुझे काम आहे त्यामुळे तूच कर असे मुलांना सांगतात. खरतर ज्याच काम आहे त्यानेच केलं पाहिजे त्यात काहीही चुकीच नाही पण आता तुम्ही पती-पत्नी आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला संपूर्ण आयुष्य एकत्र काढायचं आहे. परस्परांना मदत केल्याशिवाय पुढचा प्रवास कठिण होऊ शकतो. त्यामुळे कोणाच काम आहे यापेक्षा दोघांनीही एकमेकांना त्या कामात मदत करण जास्त महत्वाच आहे.                                   

वरती नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला क्षुल्लक वाटू शकतात. पण काहीवेळा अशा छोटा-छोटा गोष्टी घटस्फोटाला कारण ठरतात. त्यामुळे या गोष्टी टाळल्या तर वैवाहिक जीवन अधिक सुखी आणि समुद्ध होईल. लग्न फक्त दोघांचे नसते ते दोन कुटुंबांचे मनोमिलन असते.