शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लग्नानंतर चुकूनही या पाच गोष्टी लगेच करु नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 13:08 IST

लग्नानंतर जबाबदारी वाढल्यामुळे पती-पत्नीच्या स्वभावामध्ये काही बदल होतात. प्रियकर-प्रेयसी असताना ज्या गोष्टी मस्करीमध्ये घेतल्या जात होत्या. त्याच विषयांवर दोघेही नंतर गंभीर होतात.

मुंबई - लग्नानंतर जबाबदारी वाढल्यामुळे पती-पत्नीच्या स्वभावामध्ये काही बदल होतात. प्रियकर-प्रेयसी असताना ज्या गोष्टी मस्करीमध्ये घेतल्या जात होत्या. त्याच विषयांवर दोघेही नंतर गंभीर होतात. त्यामुळे लग्नानंतर दोघांनीही काही गोष्टींचे भान बाळगणे आवश्यक आहे. लग्नानंतर चुकूनही या विषयांचा आपल्या जोडीदाराजवळ उल्लेख करु नका. अन्यथा नात्यात तणाव निर्माण होईल.

- लग्नामध्ये झालेल्या खर्चाला मुद्दा बनवू नका. लग्नामध्ये झालेल्या खर्चाचा विषय वारंवार उपस्थित करुन त्यावरुन वाद निर्माण होईल अशी स्थिती उत्पन्न करु नका. 

- लग्नानंतर नातेवाईकांना विनोदाचा विषय बनवणे टाळा. मुलाने मुलीला तिच्या नातेवाईकांवरुन टोमणे मारु नये तसेच मुलीनेही मुलाच्या घरच्यांवरुन कोणतीही आपत्तीजनक प्रतिक्रिया देऊ नये. अन्यथा मोठा वाद अटळ आहे. 

-  नवरा-बायको दोघांनीही पूर्व प्रियकर किंवा पूर्व प्रेयसीशी तुलना करु नये. तुमचे नवीन लग्न झालेले असताना लगेचच अशा प्रकारची तुलना करणे घातक ठरु शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात त्यामुळे वादळ येऊ शकते. 

- लग्नातल्या एखाद्या घटनेवरुन पत्नीने पतीला त्याच्या मित्रपिरवारावरुन सुनावणे किंवा पतीने पत्नीला तिच्या मैत्रिणींवरुन बोलण्यामुळे अहंकार दुखावला जातो आणि विनाकारण भांडण सुरु होते. 

-    लग्नानंतर अनेकदा मुली  ते तुझे काम आहे त्यामुळे तूच कर असे मुलांना सांगतात. खरतर ज्याच काम आहे त्यानेच केलं पाहिजे त्यात काहीही चुकीच नाही पण आता तुम्ही पती-पत्नी आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला संपूर्ण आयुष्य एकत्र काढायचं आहे. परस्परांना मदत केल्याशिवाय पुढचा प्रवास कठिण होऊ शकतो. त्यामुळे कोणाच काम आहे यापेक्षा दोघांनीही एकमेकांना त्या कामात मदत करण जास्त महत्वाच आहे.                                   

वरती नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला क्षुल्लक वाटू शकतात. पण काहीवेळा अशा छोटा-छोटा गोष्टी घटस्फोटाला कारण ठरतात. त्यामुळे या गोष्टी टाळल्या तर वैवाहिक जीवन अधिक सुखी आणि समुद्ध होईल. लग्न फक्त दोघांचे नसते ते दोन कुटुंबांचे मनोमिलन असते.