शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

लग्नाआधी आपल्या जोडीदाराला हे प्रश्न जरुर विचारा ?... तरच रहाल सुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 12:05 IST

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नासाठी बोहल्यावर चढण्याआधी तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर विचार कितपत जुळतात हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

ठळक मुद्देलग्नानंतर बहुतांश जोडप्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांवरुन मतभेद निर्माण होतात. ही एक सामान्य पण तितकीच गंभीर बाब आहे. मुलांच्या जन्माचे प्लानिंग, त्यांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण याबद्दलच्या विचारात मतभिन्नता असेल तर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.

मुंबई - लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नासाठी बोहल्यावर चढण्याआधी तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर विचार कितपत जुळतात हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.  तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर सुखी, आनंदी आयुष्य घालवायचे असेल तर लग्नाआधी या मुद्यांवर जोडीदाराबरोबर जरुर चर्चा करा. 

- लग्नानंतर बहुतांश जोडप्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांवरुन मतभेद निर्माण होतात. ही एक सामान्य पण तितकीच गंभीर बाब आहे. दोघांपैकी कोणा एकाची कुटुंबासोबत राहण्याची इच्छा असते तर दुस-याला स्वतंत्र संसार हवा असतो. दोघांपैकी कोणी एक जण सासरच्या मंडळींकडून मिळणारा सल्ला महत्वाचा मानतात त्याचवेळी दुस-या जोडीदाराला ते पटत नसते. त्यामुळे लग्नानंतर आपण कुठे, कसं रहायचं या मुद्यांवर जोडीदारांबरोबर जरुर चर्चा करा. 

- लग्नानंतर लैंगिक सुख खूप महत्वाचे असते. त्यामुळे लैंगिक आयुष्याबद्दलही जरुर चर्चा करा. अनेक विवाह मोडण्यामध्ये हे सुद्धा एक महत्वाचे कारण असते. 

- अनेकदा लग्नानंतर जोडीदारांचे मुलांबद्दलचे विचार परस्परांशी जुळत नाहीत. मुलांच्या जन्माचे प्लानिंग, त्यांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण याबद्दलच्या विचारात मतभिन्नता असेल तर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे याबद्दलही जरुर चर्चा करा. 

- आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी अनेकदा स्वत:ची आर्थिक स्थिती लपवली जाते. पण पुढे जाऊन तोच वादाचा मोठा मुद्या बनतो. आयुष्यभर त्यावरुन ऐकून घ्यावे लागते. त्यामुळे लग्न करताना आपल्या जोडीदाराची आर्थिक स्थितीची सर्व माहिती घ्या. कारण आयुष्य जगण्यासाठी प्रेमाबरोबर पैसाही तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळे जोडीदाराची बचत, गुंतवणूक याची जरुर माहिती घ्या. 

- लग्नाआधी दोघांनी परस्परांच्या व्यावसायिक जबाबदा-या समजून घेणे आवश्यक असते. अनेकदा विवाह मोडण्यामध्ये प्रोफेशनल लाइफ खूप मोठे कारण असते.  एखाद्यावेळी नोकरीच्या निमित्ताने बाहेर जावे लागते किंवा घरी यायला उशिर होतो अशावेळी जोडीदाराने समजून घेणे महत्वाचे असते. 

- लग्न करणा-या जोडप्यांनी घराबद्दल भरपूर स्वप्ने रंगवलेली असतात. लग्नानंतर तुम्हाला कशा घरात रहायचे आहे, घराची सजावट कशी हवी ? त्याबद्दल जरुर चर्चा करा.