शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

लग्नाआधी आपल्या जोडीदाराला हे प्रश्न जरुर विचारा ?... तरच रहाल सुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 12:05 IST

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नासाठी बोहल्यावर चढण्याआधी तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर विचार कितपत जुळतात हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

ठळक मुद्देलग्नानंतर बहुतांश जोडप्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांवरुन मतभेद निर्माण होतात. ही एक सामान्य पण तितकीच गंभीर बाब आहे. मुलांच्या जन्माचे प्लानिंग, त्यांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण याबद्दलच्या विचारात मतभिन्नता असेल तर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.

मुंबई - लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नासाठी बोहल्यावर चढण्याआधी तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर विचार कितपत जुळतात हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.  तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर सुखी, आनंदी आयुष्य घालवायचे असेल तर लग्नाआधी या मुद्यांवर जोडीदाराबरोबर जरुर चर्चा करा. 

- लग्नानंतर बहुतांश जोडप्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांवरुन मतभेद निर्माण होतात. ही एक सामान्य पण तितकीच गंभीर बाब आहे. दोघांपैकी कोणा एकाची कुटुंबासोबत राहण्याची इच्छा असते तर दुस-याला स्वतंत्र संसार हवा असतो. दोघांपैकी कोणी एक जण सासरच्या मंडळींकडून मिळणारा सल्ला महत्वाचा मानतात त्याचवेळी दुस-या जोडीदाराला ते पटत नसते. त्यामुळे लग्नानंतर आपण कुठे, कसं रहायचं या मुद्यांवर जोडीदारांबरोबर जरुर चर्चा करा. 

- लग्नानंतर लैंगिक सुख खूप महत्वाचे असते. त्यामुळे लैंगिक आयुष्याबद्दलही जरुर चर्चा करा. अनेक विवाह मोडण्यामध्ये हे सुद्धा एक महत्वाचे कारण असते. 

- अनेकदा लग्नानंतर जोडीदारांचे मुलांबद्दलचे विचार परस्परांशी जुळत नाहीत. मुलांच्या जन्माचे प्लानिंग, त्यांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण याबद्दलच्या विचारात मतभिन्नता असेल तर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे याबद्दलही जरुर चर्चा करा. 

- आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी अनेकदा स्वत:ची आर्थिक स्थिती लपवली जाते. पण पुढे जाऊन तोच वादाचा मोठा मुद्या बनतो. आयुष्यभर त्यावरुन ऐकून घ्यावे लागते. त्यामुळे लग्न करताना आपल्या जोडीदाराची आर्थिक स्थितीची सर्व माहिती घ्या. कारण आयुष्य जगण्यासाठी प्रेमाबरोबर पैसाही तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळे जोडीदाराची बचत, गुंतवणूक याची जरुर माहिती घ्या. 

- लग्नाआधी दोघांनी परस्परांच्या व्यावसायिक जबाबदा-या समजून घेणे आवश्यक असते. अनेकदा विवाह मोडण्यामध्ये प्रोफेशनल लाइफ खूप मोठे कारण असते.  एखाद्यावेळी नोकरीच्या निमित्ताने बाहेर जावे लागते किंवा घरी यायला उशिर होतो अशावेळी जोडीदाराने समजून घेणे महत्वाचे असते. 

- लग्न करणा-या जोडप्यांनी घराबद्दल भरपूर स्वप्ने रंगवलेली असतात. लग्नानंतर तुम्हाला कशा घरात रहायचे आहे, घराची सजावट कशी हवी ? त्याबद्दल जरुर चर्चा करा.