शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

लग्नाआधी आपल्या जोडीदाराला हे प्रश्न जरुर विचारा ?... तरच रहाल सुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 12:05 IST

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नासाठी बोहल्यावर चढण्याआधी तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर विचार कितपत जुळतात हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

ठळक मुद्देलग्नानंतर बहुतांश जोडप्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांवरुन मतभेद निर्माण होतात. ही एक सामान्य पण तितकीच गंभीर बाब आहे. मुलांच्या जन्माचे प्लानिंग, त्यांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण याबद्दलच्या विचारात मतभिन्नता असेल तर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.

मुंबई - लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नासाठी बोहल्यावर चढण्याआधी तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर विचार कितपत जुळतात हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.  तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर सुखी, आनंदी आयुष्य घालवायचे असेल तर लग्नाआधी या मुद्यांवर जोडीदाराबरोबर जरुर चर्चा करा. 

- लग्नानंतर बहुतांश जोडप्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांवरुन मतभेद निर्माण होतात. ही एक सामान्य पण तितकीच गंभीर बाब आहे. दोघांपैकी कोणा एकाची कुटुंबासोबत राहण्याची इच्छा असते तर दुस-याला स्वतंत्र संसार हवा असतो. दोघांपैकी कोणी एक जण सासरच्या मंडळींकडून मिळणारा सल्ला महत्वाचा मानतात त्याचवेळी दुस-या जोडीदाराला ते पटत नसते. त्यामुळे लग्नानंतर आपण कुठे, कसं रहायचं या मुद्यांवर जोडीदारांबरोबर जरुर चर्चा करा. 

- लग्नानंतर लैंगिक सुख खूप महत्वाचे असते. त्यामुळे लैंगिक आयुष्याबद्दलही जरुर चर्चा करा. अनेक विवाह मोडण्यामध्ये हे सुद्धा एक महत्वाचे कारण असते. 

- अनेकदा लग्नानंतर जोडीदारांचे मुलांबद्दलचे विचार परस्परांशी जुळत नाहीत. मुलांच्या जन्माचे प्लानिंग, त्यांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण याबद्दलच्या विचारात मतभिन्नता असेल तर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे याबद्दलही जरुर चर्चा करा. 

- आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी अनेकदा स्वत:ची आर्थिक स्थिती लपवली जाते. पण पुढे जाऊन तोच वादाचा मोठा मुद्या बनतो. आयुष्यभर त्यावरुन ऐकून घ्यावे लागते. त्यामुळे लग्न करताना आपल्या जोडीदाराची आर्थिक स्थितीची सर्व माहिती घ्या. कारण आयुष्य जगण्यासाठी प्रेमाबरोबर पैसाही तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळे जोडीदाराची बचत, गुंतवणूक याची जरुर माहिती घ्या. 

- लग्नाआधी दोघांनी परस्परांच्या व्यावसायिक जबाबदा-या समजून घेणे आवश्यक असते. अनेकदा विवाह मोडण्यामध्ये प्रोफेशनल लाइफ खूप मोठे कारण असते.  एखाद्यावेळी नोकरीच्या निमित्ताने बाहेर जावे लागते किंवा घरी यायला उशिर होतो अशावेळी जोडीदाराने समजून घेणे महत्वाचे असते. 

- लग्न करणा-या जोडप्यांनी घराबद्दल भरपूर स्वप्ने रंगवलेली असतात. लग्नानंतर तुम्हाला कशा घरात रहायचे आहे, घराची सजावट कशी हवी ? त्याबद्दल जरुर चर्चा करा.