शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

बाल संगोपनाची कला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 23:39 IST

अभ्यास न करता कुठलीही गोष्ट मान्य करणे आणि चुकीचा विचार मनात रुजविणे, या गोष्टी दीर्घकालीन दु:ख निर्माण करत राहतात. लहान मुलांच्या बाबतीत नेमकं हेच घडत आलयं.

- विजयराज बोधनकरअभ्यास न करता कुठलीही गोष्ट मान्य करणे आणि चुकीचा विचार मनात रुजविणे, या गोष्टी दीर्घकालीन दु:ख निर्माण करत राहतात. लहान मुलांच्या बाबतीत नेमकं हेच घडत आलयं. अगदी पाच-सहा महिन्याच्या बाळापासून ते आठ-नऊ वर्षांच्या मुलापर्यंत आपण विचार केला, तर एक मोठं रहस्य उलगडू शकतं. मूल जन्माला येताना तो एक लख्ख मेंदू सोबत घेऊन येतो. तो सर्व निरीक्षण करीत असतो. आपली सर्व भाषा त्याला समजत असते. कारण आईच्या पोटात असेपर्यंत आईचे विचार तो ग्रहण करीत असतो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच अनेक घरात आजही छोट्याशा बालकाला उचलून घेऊन त्याच्याशी गप्पा मारीत असतात. नक्कीच त्याला बोलता येत नसतं, पण ते बालक हुंकारातून मात्र उत्तमपणे प्रतिसाद देत असते.याच सुंदर प्रक्रियेत ते बाळ जी भाषा तुम्ही बोलत असाल ती आपल्या मेंदूच्या कप्प्यात साठवून ठेवत असतो. साधारण जन्म झाल्यानंतर एकदीड वर्षात त्याला काहीतरी बोलावेसे वाटत असते. कारण वर्षभरात त्याने जे जे ऐकलेलं असतं, ते तो व्यक्त करण्याच्या प्रयत्नात असते. मम पप अशा शब्दांनी किंवा त्याला भावेल त्या स्वरभाषेतून ते बाळ बोलतांना घरच्यांनाही त्याचे कौतुक वाटत असतं. हळूहळू त्याची बोलण्याची शक्ती वाढतच जाते. त्यामुळे ज्या घरात छोट्या बाळाशी घरातली मंडळी सतत काहीना काही बोलत राहतात, त्या घरातली मुले लवकर बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत राहतात.या उलट ज्या घरात, त्याला काय कळतं म्हणून घर गप्प असतं. त्या मुलांच्या कानावर जी भाषा किंवा भावना मनात निर्माण व्हायला पाहिजे त्यांची स्पंदने निर्माणच होत नाहीत. त्यामुळे त्याला व्यक्त व्हायला दुसरा मार्गच मिळत नसतो. आजही घराघरात अगदी छोट्या बाळांच्या देखत टीव्ही चालू असतो. त्यातली चांगली-वाईट दृष्ये त्याच्या मन-बुद्धी पटलावर जाऊन बसण्याची शक्यता असते. त्या टीव्हीवर जशी दृश्यं दिसतील, जशी भाषा ऐकायला येईल तशा भावनेचा बंध त्या बाळाच्या मनात निर्माण होत जातो.बरीच मुलं चित्रविचित्र वागण्यामागचं हे ही एक कारण असू शकतं. आईच्या पोटात असल्यापासून ते पाच-सहा वर्षांपर्यंत ते बाळ निरीक्षण आणि साठवणूक करत राहते आणि म्हणून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे पालक उत्तमरित्या काळजी घेतात, ती मुलं खरोखरच उत्तम संस्कारांनी वाढतात. त्यांच्या वर्तणूकीचा त्रास न होता पूर्ण घराला आनंदच होत राहतो. छोट्या मुलांना काय कळतं या गैरसमजात जी घरे राहतात, त्या घरातल्या मुलांचे भविष्य प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असू शकते. त्या उलट लहान मुलांच्या जडणघडणींचा अभ्यास करून मुलांच सक्षम संगोपन केल्यास त्यांच भविष्य उज्ज्वल ठरेल आणि पालकही भाग्यवंत ठरू शकतील. त्यामुळे बाल संगोपन ही कलासुद्धा महत्त्वाची आहे. मुलांना सर्वच कळत असतं. आपण त्यांच्यासमोर आणि त्यांच्याशी सतत उत्तम वागलं पाहिजे, बोललं पाहिजे याची काळजी घेणारं घर राष्टÑाला तेजस्वी तरुण आणि तरुणी देऊ शकतील.