शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नेहमीच्या पिकनिक स्पॉटला कंटाळला असाल, तर एकदा भेट द्या या स्वप्नवत ठिकाणांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 12:09 IST

आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथे तुम्हाला शांतताही मिळेल आणि आपण दस-या जगात आलो की, काय असंही तुम्हाला वाटेल. 

आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा स्ट्रेस घालवण्यासाठी प्रत्येकालाच शांतता हवी असते. त्यासाठी अनेकजण कुठेतरी बाहेर जाऊन वेळ घालवण्याचा प्लॅन आखतात. पण त्याच त्याच ठिकाणांवर जाऊन अनेकांना ना शांतता मिळत ना त्यांचा स्ट्रेस दूर होत. पण आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथे तुम्हाला शांतताही मिळेल आणि आपण दुस-या जगात आलो की, काय असंही तुम्हाला वाटेल. 

1) जर तुम्ही कधी स्वप्न पाहिलं असेल की, तुम्ही हिरव्यागार डोंगरातून चालत आहात. तुमच्याकडे त्रास द्यायला फोनही नाहीये. कारण तिथे सिग्नल नाहीये. तर ते ठिकाण नागालॅंडमधील झुकोवू व्हॅली असू शकतं. इथे सगळीकडेच हिरवीगार डोंगरं आहेत. त्यामुळे इथली सफर तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरु शकते. 

2) हिमाचल प्रदेशातील तोश हे गावही तुमच्यासाठी ड्रीम ट्रीप ठरु शकतं. कारण इथे तुम्हाला हवी असलेली शांतता नक्की मिळेल. हे ठिकाण नक्कीच तुम्हाला स्वप्नवत वाटणारंच असणार आहे. त्यामुळे पुढच्यावेळी तुम्ही इथेही जाण्याचा प्लॅन करु शकता. 

3) जर तुम्हाला निळ्या पाण्याच्या शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. हे ठिकाण आहे कर्नाटकातील गोकरणा. इथे तुम्हाला कधीही न पाहिला इतका स्वच्छ समुद्र बघायला मिळेत. 

4) जर तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणी जाण्याची आवड असेल आणि शांतता हवी असेल जर मध्यप्रदेशातील ओर्चा हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य ठरेल. इतिहासाची माहिती मिळण्यासोबतच इथे तुम्हाला वेगळीच शांतता अनुभवायला मिळणार आहे. 

5) लक्षद्वीप या ठिकाणाला भेट देणा-यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच वाढली आहे. त्यामुळे दुसरीकडे जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा या ठिकाणाला भेट दिलेली कधीही फायद्याची ठरेल.

6) सुंदर रस्ते, सुंदर घरं आणि सुंदर समुद्र यासाठी पॉंडेचेरी प्रसिद्ध आहे. त्यामुळे नेहमीच्या कंटाळलेल्या ठिकाणांना स्किप करुन हे ठिकाण तुम्हाला वेगळा आनंद देऊ शकतं. 

7) कर्नाटकातील हंपी या ठिकाणाला एकदा भेट दिल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा इथे याल. कारण इथे सुंदर मंदिरं, खळखळणारी नदी, हिरवीगार जंगलं तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. त्यामुळे इथे न चुकता एकदा तरी भेट द्यायला हवी.

टॅग्स :Travelप्रवास