शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तरुणांनी रेशीम शेतीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST

रेशीम उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारित उद्योग असून त्यात रोजगाराची मोठी क्षमता आहे. प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या क्षेत्रामध्ये ...

रेशीम उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारित उद्योग असून त्यात रोजगाराची मोठी क्षमता आहे. प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या क्षेत्रामध्ये या उद्योगास पोषक वातावरण असल्याने रेशीम उत्पादन करण्यास भरपूर वाव आहे. त्यातून ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यामुळे तरुणांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी तीर्थकर यांनी केले.

पोखरा योजनेंतर्गत आणि महारेशीम अभियानांतर्गत दीनानाथ नागरगोजे यांच्या बागेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, मंडळ शेतकरी देवनाथ नागरगोजे, विठ्ठल भांगे, नईम सय्यद, शाबुद्दीन सय्यद, दादाराव नागरगोजे, सतीश नाईक आदी उपस्थित होते. तसेच सोनवळा व लाळी (बु.) येथील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी तीर्थकर म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यात येत आहे. हवामानातील बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने रेशीमवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे या घटकाचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.