शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

चिंता वाढली : थकीत कर्जवसुलीसाठी बँकेचे कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या दारी! दुष्काळी परिस्थितीत बळीराजा हैराण

By हरी मोकाशे | Updated: September 20, 2023 21:59 IST

यंदा शेती उत्पन्नाची आशा नाही. त्यामुळे आता कर्जाची परतफेड कशी करावी, अशा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

लातूर : यंदा पावसाने ताण दिल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अशा परिस्थितीत थकीत पीककर्ज वसुलीसाठी राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जात आहेत. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यंदा शेती उत्पन्नाची आशा नाही. त्यामुळे आता कर्जाची परतफेड कशी करावी, अशा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

यंदा पाऊस उशिरा झाल्याने खरिपाच्या पेरण्याही विलंबाने झाल्या. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने खरिपाच्या उत्पन्नात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. त्यानंतरही पावसाने उघडीप दिल्यामुळे पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष कसे काढावे, अशी भ्रांत शेतकऱ्यांना पडली आहे. उजाडलेला प्रत्येक दिवस कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून आहेत.

चाकूर येथे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. याअंतर्गत जानवळ, शिवणखेड, शिवणी, रायवाडी, रामवाडी, केंद्रेवाडी, महाळंगी अशी गावे जोडण्यात आली आहे. या गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या वतीने पीककर्जाचे वाटप करण्यात येते. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत कर्ज वाटप करण्यात आले. मात्र, काही शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने आता वसुली मोहीम सुरू केली आहे.

बँक कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत...सध्या शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी, कर्मचारी हे थकीत कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जात आहेत. शेतकऱ्यांना बोलावून घेऊन घरासमोर थांबलेले फोटो घेत आहेत.

तत्काळ वसुली थांबवावी...पाऊस नसल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी थकीत पीककर्ज वसुलीसाठी घरापर्यंत येत आहेत. शासनाने ही वसुली थांबवावी. दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी.- दत्तात्रय पवार, शेतकरी

१० कोटींची थकबाकी...जानवळ परिसरातील जवळपास २ हजार शेतकऱ्यांकडे दोन-तीन वर्षांपासून पीककर्ज थकीत आहे. ते जवळपास १० कोटी आहे. वसुलीसाठी आता प्रयत्न करण्यात येत आहेत. थकबाकीदारांनी तत्काळ पीककर्जाची परतफेड करावी.- सूरज बिडवे, बँक मॅनेजर 

 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक