शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

चिंता वाढली : थकीत कर्जवसुलीसाठी बँकेचे कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या दारी! दुष्काळी परिस्थितीत बळीराजा हैराण

By हरी मोकाशे | Updated: September 20, 2023 21:59 IST

यंदा शेती उत्पन्नाची आशा नाही. त्यामुळे आता कर्जाची परतफेड कशी करावी, अशा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

लातूर : यंदा पावसाने ताण दिल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अशा परिस्थितीत थकीत पीककर्ज वसुलीसाठी राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जात आहेत. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यंदा शेती उत्पन्नाची आशा नाही. त्यामुळे आता कर्जाची परतफेड कशी करावी, अशा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

यंदा पाऊस उशिरा झाल्याने खरिपाच्या पेरण्याही विलंबाने झाल्या. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने खरिपाच्या उत्पन्नात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. त्यानंतरही पावसाने उघडीप दिल्यामुळे पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष कसे काढावे, अशी भ्रांत शेतकऱ्यांना पडली आहे. उजाडलेला प्रत्येक दिवस कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून आहेत.

चाकूर येथे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. याअंतर्गत जानवळ, शिवणखेड, शिवणी, रायवाडी, रामवाडी, केंद्रेवाडी, महाळंगी अशी गावे जोडण्यात आली आहे. या गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या वतीने पीककर्जाचे वाटप करण्यात येते. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत कर्ज वाटप करण्यात आले. मात्र, काही शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने आता वसुली मोहीम सुरू केली आहे.

बँक कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत...सध्या शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी, कर्मचारी हे थकीत कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जात आहेत. शेतकऱ्यांना बोलावून घेऊन घरासमोर थांबलेले फोटो घेत आहेत.

तत्काळ वसुली थांबवावी...पाऊस नसल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी थकीत पीककर्ज वसुलीसाठी घरापर्यंत येत आहेत. शासनाने ही वसुली थांबवावी. दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी.- दत्तात्रय पवार, शेतकरी

१० कोटींची थकबाकी...जानवळ परिसरातील जवळपास २ हजार शेतकऱ्यांकडे दोन-तीन वर्षांपासून पीककर्ज थकीत आहे. ते जवळपास १० कोटी आहे. वसुलीसाठी आता प्रयत्न करण्यात येत आहेत. थकबाकीदारांनी तत्काळ पीककर्जाची परतफेड करावी.- सूरज बिडवे, बँक मॅनेजर 

 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक