शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात १९,५०३ घरकुलांची कामे अपूर्ण; लाभार्थ्यांच्या जाणून घेतल्या जाणार व्यथा !

By हरी मोकाशे | Updated: February 8, 2023 18:35 IST

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० हजार ८५४ घरकुले मंजूर असून त्यापैकी ९ हजार ५२३ पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उद्या मेळावा

हरी मोकाशे

लातूर : गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री, रमाई आवास योजना राबविण्यात येतात. मात्र, जिल्ह्यातील १९ हजार ५०३ घरकुले अपूर्ण आहेत. ही घरकुले पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांचा शुक्रवारी प्रत्येक ग्रामपंचायतीत मेळावा घेण्यात येऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० हजार ८५४ घरकुले मंजूर असून त्यापैकी ९ हजार ५२३ पूर्ण झाली आहेत. अद्यापही ११ हजार ३३१ अपूर्ण आहेत. तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत २४ हजार ५३२ घरकुले मंजूर असून १६ हजार ३६० पूर्ण आहेत. तर ८ हजार १७२ अपूर्ण आहेत. ही घरकुले पूर्ण करण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांनी बैठक घेऊन काही सूचना केल्या आहेत. शुक्रवारी लाभार्थ्यांचा प्रत्येक ग्रामपंचायतीत मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात समुपदेश करून, घरांचे महत्त्व, अनुदानाची माहिती दिली जाणार आहे. या कामास गती देण्यासाठी पंचायत समिती गणांना नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समुपदेशन केले जाणार...

घरकुलांच्या कामास गती देण्यासाठी जिल्ह्यातील ७८६ ग्रामपंचायतींत शुक्रवारी लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात त्यांच्या समस्या जाणून घेऊन समुपदेशन केले जाणार आहे. या मेळाव्यास लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.

- कल्पना क्षीरसागर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.

घरकुल पूर्ण केलेल्यांचा सत्कार...

घरकुलांच्या कामास गती देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शुक्रवारी लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. मुदतीत घरकुल पूर्ण केलेल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच घरकुलासाठी जागा नाही, अशांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.

- तुकाराम भालके, गटविकास अधिकारी. 

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना