शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लातुरात १९,५०३ घरकुलांची कामे अपूर्ण; लाभार्थ्यांच्या जाणून घेतल्या जाणार व्यथा !

By हरी मोकाशे | Updated: February 8, 2023 18:35 IST

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० हजार ८५४ घरकुले मंजूर असून त्यापैकी ९ हजार ५२३ पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उद्या मेळावा

हरी मोकाशे

लातूर : गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री, रमाई आवास योजना राबविण्यात येतात. मात्र, जिल्ह्यातील १९ हजार ५०३ घरकुले अपूर्ण आहेत. ही घरकुले पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांचा शुक्रवारी प्रत्येक ग्रामपंचायतीत मेळावा घेण्यात येऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० हजार ८५४ घरकुले मंजूर असून त्यापैकी ९ हजार ५२३ पूर्ण झाली आहेत. अद्यापही ११ हजार ३३१ अपूर्ण आहेत. तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत २४ हजार ५३२ घरकुले मंजूर असून १६ हजार ३६० पूर्ण आहेत. तर ८ हजार १७२ अपूर्ण आहेत. ही घरकुले पूर्ण करण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांनी बैठक घेऊन काही सूचना केल्या आहेत. शुक्रवारी लाभार्थ्यांचा प्रत्येक ग्रामपंचायतीत मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात समुपदेश करून, घरांचे महत्त्व, अनुदानाची माहिती दिली जाणार आहे. या कामास गती देण्यासाठी पंचायत समिती गणांना नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समुपदेशन केले जाणार...

घरकुलांच्या कामास गती देण्यासाठी जिल्ह्यातील ७८६ ग्रामपंचायतींत शुक्रवारी लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात त्यांच्या समस्या जाणून घेऊन समुपदेशन केले जाणार आहे. या मेळाव्यास लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.

- कल्पना क्षीरसागर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.

घरकुल पूर्ण केलेल्यांचा सत्कार...

घरकुलांच्या कामास गती देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शुक्रवारी लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. मुदतीत घरकुल पूर्ण केलेल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच घरकुलासाठी जागा नाही, अशांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.

- तुकाराम भालके, गटविकास अधिकारी. 

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना