शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या; सहा जणांवर गुन्हा, आराेपींना तीन दिवसांची पाेलिस काेठडी

By राजकुमार जोंधळे | Updated: June 8, 2024 21:09 IST

पाेलिसांनी सर्व आराेपींना अटक केली असून, त्यांना साेमवारपर्यंत पाेलिस काेठडी मिळाली आहे. तपास पाेउपनि. अनिल कांबळे करीत आहेत.

लातूर : तक्रार देण्यासाठी ठाण्यात गेलेल्या महिलेला तक्रार न घेता अवमानकारक वागणूक दिली. यातून महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी सर्व आराेपींना अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पाेलिस काेठडी मिळाली आहे.

पाेलिसांनी सांगितले, अनिता बालाजी लष्करे (वय ३० रा. विठ्ठल नगर, वैशालीनगर, लातूर) यांच्यासह पतीला सहा जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली हाेती. याबाबतची तक्रार त्या विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात देण्यासाठी गेल्या असता, तेथील पाेलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना अवमानकारक वागणूक देत, तक्रार न घेता हाकलून दिले. हा अवमान सहन न झाल्याने अनिता लष्करे यांनी बाभळगाव राेड, वैशालीनगर परिसरातील एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात मृत अनिताचे वडील तुकाराम चिमा इटकर (वय ५०, रा. सिकंदरपूर, ता. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सुभाष गंगाराम लष्करे, बाळू गंगाराम लष्करे, रावसाहेब गंगाराम लष्करे, राजू गंगाराम लष्करे, सुरेश मारोती लष्करे, राहुल बाळू लष्करे (सर्व रा. विठ्ठल नगर, लातूर) यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी सर्व आराेपींना अटक केली असून, त्यांना साेमवारपर्यंत पाेलिस काेठडी मिळाली आहे. तपास पाेउपनि. अनिल कांबळे करीत आहेत.

दाेषी पाेलिस कर्मचारी निलंबित...

विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात मृत महिला अनिता लष्करे आल्या हाेत्या. दरम्यान, कर्तव्यावर हजर असलेल्या पाेलिस कर्मचाऱ्याने कर्तव्यात कसूर केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणात पाेलिस कर्मचारी रतन शेख यास निलंबित करण्यात आले आहे.  - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर