शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

घाेटभर पाण्याच्या शोधात वन्यजीवांची भटकंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST

निलंगा तालुक्यातील केळगाव येथील वनविभागाच्या जंगलात दहा पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या सर्व पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. दिवसभरात ...

निलंगा तालुक्यातील केळगाव येथील वनविभागाच्या जंगलात दहा पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या सर्व पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. दिवसभरात वन्य जीवाला पाण्याची गरज भासत असते. मात्र, एवढ्या मोठ्या जंगलामध्ये एकाही पानवठ्यात पाणी नसल्याने या जंगलातून दुसऱ्या जंगलात वन्यजीवांना पाण्याच्या शाेधात भटकंती करावी लागत आहे. जंगलात अन्न, पाणी मिळत नसल्याने जंगलातील हरीण गावकुसाला येत आहेत. शिवारातील शेतात, रस्त्यावर वावरताना दिसून येत आहेत.

पावसाळ्याचे पाणी जंगलातील लहान मोठ्या तळ्यांत, खड्ड्यांमध्ये साठलेले असते. ते पाणी जानेवारी अखेरपर्यंत वन्य प्राणी आाणि पशू-पक्ष्यांच्या उपयाेगात येते. मात्र, जानेवारीनंतर हा जलसाठा संपला की, उन्हाळ्याची चाहूल लागते, पाण्यासाठी या वन्य प्राण्यांची, जिवांची भटकंती सुरु राहते. उन्हाचा पारा दिवसेंदिव वाढत आहे. या महिन्यात वन्यजिवांना पाण्याची गरज आहे. याकडे अद्यापही वनविभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. शासनाचे लाखो रुपये वन्यजीवांसाठी प्राप्त हाेतात. सध्याला जंगलातील दहाही पानवठे काेरडेठाक पडली आहेत. परिणामी, वन्यप्राणी हरीण, रानडुक्कर, लांडगा, माकड, मोर, लांडोर हे जंगल साेडून राठोडा, लंबोटा, झरी, केळगावच्या गावकुसाला येत आहेत. त्यांची पाण्याच्या भटकंती सुरुच आहे. काही हरीण केळगाव ते निलंगा मार्गावर पाण्यासाठी शाेधात भटकंती करताना दिसून येत आहेत. त्यामुळे मोकार कुत्रे त्यावर हल्ला करत आहेत. अद्याप निधी उपलब्ध न झाल्याने जंगलातील पाणवठे कोरडेठाक आहेत, असे निलंगा येथील वनपरिमंडळ अधिकारी एस.आर. बन म्हणाले.