शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर तालुक्यात बुधवारी दिवसभर भिज पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

विनायक चाकुरे उदगीर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्‍यातील सर्वच भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी ...

विनायक चाकुरे

उदगीर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्‍यातील सर्वच भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी काही दिवस खंड पडल्यानंतर जुलै महिन्यापासून तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पिकाची परिस्थिती सुधारली आहे. त्यातच बुधवारी तालुक्यात सर्वत्र दिवसभर भिज पाऊस होता. हा पाऊस काही भागात पिकाला पोषक आहे तर काही भागातील शेतात पाणी साचण्याची शक्यता शेतकऱ्याकडून वर्तवली जात आहे. सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने फवारणी करणे गरजेचे बनले आहे.

मागील काही दिवसांपासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरिपाची पिके सावरली आहेत. विशेषत: सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. तालुक्यातील काही मंडळ जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी,नाल्याला पूर आला होता. त्यातच बुधवारी दिवसभर उदगीर शहर व तालुक्यात सर्वच भागात दिवसभर भिज पाऊस होता. तालुक्यातील अनेक भागातील सोयाबीनवर शेतकरी किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणीच्या कामाला लागले आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपाची सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकाची वाढ चांगली होत आहे. मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसून सोयाबीन मोठ्या प्रमाणात डागी होऊन त्यामुळे योग्य दर मिळाला नव्हता. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट व तेलाला असलेली मागणी त्यामुळे यावर्षी सोयाबीनला मागील काही दिवसांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा यंदा सोयाबीनवर अवलंबून आहेत.

उदगीर मंडळात सर्वाधिक पाऊस..

उदगीर ५३६ मि.मी. नागलगाव ४२१, मोघा ४३४, हेर ३६३, वाढवणा ५०६, नळगीर ५८९, देवर्जन ३६८ तर तोंडार महसूल मंडळात ३१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे मशागतीच्या कामांना अडचण...

किनी यलादेवी भागात चांगला पाऊस झाल्यामुळे पिकाची परिस्थिती उत्तम असून, मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत मशागतीच्या कामाला अडचण निर्माण झाली आहे. या भागातील तळे, विहिरी भरल्या असून, मागील काही वर्षापासून आषाढी एकादशीपूर्वी तळे व विहिरी भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. -ज्ञानेश्वर नारगुडे, शेतकरी, किनी यलादेवी.