शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

उदगीर तालुक्यात बुधवारी दिवसभर भिज पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

विनायक चाकुरे उदगीर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्‍यातील सर्वच भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी ...

विनायक चाकुरे

उदगीर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्‍यातील सर्वच भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी काही दिवस खंड पडल्यानंतर जुलै महिन्यापासून तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पिकाची परिस्थिती सुधारली आहे. त्यातच बुधवारी तालुक्यात सर्वत्र दिवसभर भिज पाऊस होता. हा पाऊस काही भागात पिकाला पोषक आहे तर काही भागातील शेतात पाणी साचण्याची शक्यता शेतकऱ्याकडून वर्तवली जात आहे. सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने फवारणी करणे गरजेचे बनले आहे.

मागील काही दिवसांपासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरिपाची पिके सावरली आहेत. विशेषत: सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. तालुक्यातील काही मंडळ जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी,नाल्याला पूर आला होता. त्यातच बुधवारी दिवसभर उदगीर शहर व तालुक्यात सर्वच भागात दिवसभर भिज पाऊस होता. तालुक्यातील अनेक भागातील सोयाबीनवर शेतकरी किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणीच्या कामाला लागले आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपाची सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकाची वाढ चांगली होत आहे. मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसून सोयाबीन मोठ्या प्रमाणात डागी होऊन त्यामुळे योग्य दर मिळाला नव्हता. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट व तेलाला असलेली मागणी त्यामुळे यावर्षी सोयाबीनला मागील काही दिवसांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा यंदा सोयाबीनवर अवलंबून आहेत.

उदगीर मंडळात सर्वाधिक पाऊस..

उदगीर ५३६ मि.मी. नागलगाव ४२१, मोघा ४३४, हेर ३६३, वाढवणा ५०६, नळगीर ५८९, देवर्जन ३६८ तर तोंडार महसूल मंडळात ३१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे मशागतीच्या कामांना अडचण...

किनी यलादेवी भागात चांगला पाऊस झाल्यामुळे पिकाची परिस्थिती उत्तम असून, मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत मशागतीच्या कामाला अडचण निर्माण झाली आहे. या भागातील तळे, विहिरी भरल्या असून, मागील काही वर्षापासून आषाढी एकादशीपूर्वी तळे व विहिरी भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. -ज्ञानेश्वर नारगुडे, शेतकरी, किनी यलादेवी.