शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

उदगीर तालुक्यात बुधवारी दिवसभर भिज पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

विनायक चाकुरे उदगीर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्‍यातील सर्वच भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी ...

विनायक चाकुरे

उदगीर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्‍यातील सर्वच भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी काही दिवस खंड पडल्यानंतर जुलै महिन्यापासून तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पिकाची परिस्थिती सुधारली आहे. त्यातच बुधवारी तालुक्यात सर्वत्र दिवसभर भिज पाऊस होता. हा पाऊस काही भागात पिकाला पोषक आहे तर काही भागातील शेतात पाणी साचण्याची शक्यता शेतकऱ्याकडून वर्तवली जात आहे. सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने फवारणी करणे गरजेचे बनले आहे.

मागील काही दिवसांपासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरिपाची पिके सावरली आहेत. विशेषत: सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. तालुक्यातील काही मंडळ जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी,नाल्याला पूर आला होता. त्यातच बुधवारी दिवसभर उदगीर शहर व तालुक्यात सर्वच भागात दिवसभर भिज पाऊस होता. तालुक्यातील अनेक भागातील सोयाबीनवर शेतकरी किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणीच्या कामाला लागले आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपाची सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकाची वाढ चांगली होत आहे. मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसून सोयाबीन मोठ्या प्रमाणात डागी होऊन त्यामुळे योग्य दर मिळाला नव्हता. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट व तेलाला असलेली मागणी त्यामुळे यावर्षी सोयाबीनला मागील काही दिवसांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा यंदा सोयाबीनवर अवलंबून आहेत.

उदगीर मंडळात सर्वाधिक पाऊस..

उदगीर ५३६ मि.मी. नागलगाव ४२१, मोघा ४३४, हेर ३६३, वाढवणा ५०६, नळगीर ५८९, देवर्जन ३६८ तर तोंडार महसूल मंडळात ३१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे मशागतीच्या कामांना अडचण...

किनी यलादेवी भागात चांगला पाऊस झाल्यामुळे पिकाची परिस्थिती उत्तम असून, मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत मशागतीच्या कामाला अडचण निर्माण झाली आहे. या भागातील तळे, विहिरी भरल्या असून, मागील काही वर्षापासून आषाढी एकादशीपूर्वी तळे व विहिरी भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. -ज्ञानेश्वर नारगुडे, शेतकरी, किनी यलादेवी.