शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
3
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
4
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
5
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
6
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
7
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
8
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
9
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
10
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
11
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
12
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
13
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
14
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
15
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
16
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
17
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
18
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
19
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
20
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश

उन्हाळा, टंचाईमुळे पाणी साठवताय, डेंग्यूची डासोत्पत्ती तर होत नाही ना?

By हरी मोकाशे | Updated: May 16, 2024 10:35 IST

कोरडा दिवस पाळा अन् डेंग्यू टाळा, कोणतेही पाणी ८ दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यात डासोत्पत्ती हाेते.

लातूर : सध्या उन्हाळा अन् टंचाईमुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांत पाण्याची समस्या आहे. पाणी साठविण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, साठवलेल्या पाण्यात डेंग्यू आजारास कारणीभूत असलेल्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे पाणीसाठे घट्ट झाकून ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे आवश्यक आहे.

१६ मे राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा केला जातो. डेंग्यूचा प्रसार हा एडिस एजिप्त नावाच्या डासांमुळे होताे. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी ८ दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यात डासोत्पत्ती हाेते. ती कमी करण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. दरम्यान, जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने जनजागृती करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

साडेचार वर्षांमध्ये १५८ डेंग्यूचे रुग्ण...वर्ष - संशयितांचे रक्तजल नमुने - रुग्ण२०२० - १६ - ०२२०२१ - २१७ - ३९२०२२ - २३३ - २७२०२३ - ४६१ - ७५२०२४ एप्रिलअखेर - २१० - १५एकूण - ११३७ - १५८

डेंग्यू तापाच्या आजाराची लक्षणे...तीव्र स्वरूपाचा ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, जुलाब रक्तमिश्रित होणे (१५ वर्षांखालील मुलांना जास्त त्रास होतो)

प्रतिबंधात्मक उपाययोजना...आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावेत, डबकी व पाण्याच्या टाक्यांमध्ये डासअळी भक्षक गप्पीमासे सोडावेत. पाणी वाहते करा, डबके बुजवा, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, साठलेल्या डबक्यात, नाल्यात तेल वंगण टाकावे, रात्री विश्रांती घेताना अगरबत्ती, मच्छरदाणीचा वापर करावा, अंगभर कपडे घालावेत, आवश्यकतेनुसार घरात ॲबेटिंग, धूर फवारणी करुन घ्यावी.

रोग प्रसारक डासांची उत्पत्ती...डासाच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोष व प्रौढ डास अशा चार अवस्था असतात. तीन अवस्था ह्या पाण्यातील असतात. पाण्यातील अवस्था नष्ट केल्यास डासोत्पत्ती रोखणे शक्य होईल. अंडीपासून डास तयार होण्यासाठी साधारणत: ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. हौद, माठ, रांजण, रिकामे टायर्स, नारळाच्या करवंट्या, कूलरमधील ओव्हरहेड टँक, भंगार सामान, घर व परिसरात पाणीसाठ्यांत आठवडाभरापेक्षा अधिक काळ पाणी साठल्यास डासोत्पत्ती होते.

लक्षणे दिसताच तात्काळ उपचार घ्यावेत..ताप आल्यास तसेच डेंग्यू तापाची लक्षणे दिसताच तात्काळ रक्त तपासणी करुन घ्यावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निदान व उपचाराची साेय आहे. ताप अंगावर काढू नये.- डॉ. संतोष हिंडोळे, जिल्हा हिवताप अधिकारी.

टॅग्स :dengueडेंग्यूlaturलातूरHealthआरोग्य