शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

पाण्याचा प्रश्न गंभीर! जळकोटमधील १२ साठवण तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली

By संदीप शिंदे | Updated: September 1, 2023 17:39 IST

चार तलावांत पाणीसाठा शून्य : तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर

जळकोट : तालुक्यात १६ साठवण तलाव असून, यातील १२ तलावांत पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. तर चार तलावांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये ढोरसांगवी, हावरगा, जंगमवाडी, सोनवळा साठवण तलावांचा समावेश आहे. दरम्यान, तालुक्यात मागील महिनाभरापासून पाऊस नसल्याने पिके वाळून चालली असून, पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

तालुक्यात महिनाभराच्या पावसाच्या विश्रांतीमुळे व तीव्र उन्हामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. १२ साठवण तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही तर जळकोट तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. तालुक्यातील सोनवळा, जंगमवाडी, ढोरसांगवी, हावरगाव तलावांत शून्य टक्के, हळद वाढवणा ४० टक्के, डोंगरगाव ५९ टक्के, माळहिप्परगा १०० टक्के, रावणकोळा ९४ टक्के, सिंदगी तलावात ३८ टक्के, चेरा क्रमांक एक १८ टक्के, चेरा क्रमांक दोन १८ टक्के, शेलदरा तलावात १० टक्के, वांजरवाडा १० टक्के, धोंडवाडी १२ टक्के, गुत्ती क्रमांक एक १६ टक्के, गुत्ती क्रमांक दोन तलावांत १४ टक्के असा जलसाठा असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता अरुण त्रिपाठी यांनी दिली. तलावांमध्ये कमी पाणीसाठा असल्याने पिण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तालुक्यातील सर्व साठवण तलावांत केवळ २० टक्के पाणीसाठा असून, सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस नाही झाला तर पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. याबाबत अनेक गावांतील नागरिकांनी पाणी आरक्षित करण्याची मागणी केली आहे.

पशुधनाला पाणी कोठून आणणार?तालुक्यात पशुधनाची संख्या ५० हजारांवर आहे. यामध्ये दुग्धव्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या सर्वच प्रकल्पांत केवळ २० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस न पडल्यास पशुधनाला पाणी कोठून आणणार? असा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ उपायोजना राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. प्राध्यान्याने पिण्याचे पाणी, शेती आणि त्यानंतर उद्योगासाठी पाण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. महिनाभरापासून पाऊस नाही. त्यात तीव्र ऊन पडत असल्याने पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा...तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही. केवळ रावणकोळा, मरसांगवी, अतनूर, घोणसी परिसरात जुलै महिन्यात मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे शेतातील पिके, माती वाहून गेली होती. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत पाऊसच झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यातही घट होत असून, पिके वाळून चालली आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसlaturलातूर