शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पाण्याचा प्रश्न गंभीर! जळकोटमधील १२ साठवण तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली

By संदीप शिंदे | Updated: September 1, 2023 17:39 IST

चार तलावांत पाणीसाठा शून्य : तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर

जळकोट : तालुक्यात १६ साठवण तलाव असून, यातील १२ तलावांत पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. तर चार तलावांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये ढोरसांगवी, हावरगा, जंगमवाडी, सोनवळा साठवण तलावांचा समावेश आहे. दरम्यान, तालुक्यात मागील महिनाभरापासून पाऊस नसल्याने पिके वाळून चालली असून, पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

तालुक्यात महिनाभराच्या पावसाच्या विश्रांतीमुळे व तीव्र उन्हामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. १२ साठवण तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही तर जळकोट तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. तालुक्यातील सोनवळा, जंगमवाडी, ढोरसांगवी, हावरगाव तलावांत शून्य टक्के, हळद वाढवणा ४० टक्के, डोंगरगाव ५९ टक्के, माळहिप्परगा १०० टक्के, रावणकोळा ९४ टक्के, सिंदगी तलावात ३८ टक्के, चेरा क्रमांक एक १८ टक्के, चेरा क्रमांक दोन १८ टक्के, शेलदरा तलावात १० टक्के, वांजरवाडा १० टक्के, धोंडवाडी १२ टक्के, गुत्ती क्रमांक एक १६ टक्के, गुत्ती क्रमांक दोन तलावांत १४ टक्के असा जलसाठा असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता अरुण त्रिपाठी यांनी दिली. तलावांमध्ये कमी पाणीसाठा असल्याने पिण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तालुक्यातील सर्व साठवण तलावांत केवळ २० टक्के पाणीसाठा असून, सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस नाही झाला तर पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. याबाबत अनेक गावांतील नागरिकांनी पाणी आरक्षित करण्याची मागणी केली आहे.

पशुधनाला पाणी कोठून आणणार?तालुक्यात पशुधनाची संख्या ५० हजारांवर आहे. यामध्ये दुग्धव्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या सर्वच प्रकल्पांत केवळ २० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस न पडल्यास पशुधनाला पाणी कोठून आणणार? असा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ उपायोजना राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. प्राध्यान्याने पिण्याचे पाणी, शेती आणि त्यानंतर उद्योगासाठी पाण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. महिनाभरापासून पाऊस नाही. त्यात तीव्र ऊन पडत असल्याने पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा...तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही. केवळ रावणकोळा, मरसांगवी, अतनूर, घोणसी परिसरात जुलै महिन्यात मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे शेतातील पिके, माती वाहून गेली होती. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत पाऊसच झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यातही घट होत असून, पिके वाळून चालली आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसlaturलातूर