शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा प्रश्न गंभीर! जळकोटमधील १२ साठवण तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली

By संदीप शिंदे | Updated: September 1, 2023 17:39 IST

चार तलावांत पाणीसाठा शून्य : तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर

जळकोट : तालुक्यात १६ साठवण तलाव असून, यातील १२ तलावांत पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. तर चार तलावांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये ढोरसांगवी, हावरगा, जंगमवाडी, सोनवळा साठवण तलावांचा समावेश आहे. दरम्यान, तालुक्यात मागील महिनाभरापासून पाऊस नसल्याने पिके वाळून चालली असून, पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

तालुक्यात महिनाभराच्या पावसाच्या विश्रांतीमुळे व तीव्र उन्हामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. १२ साठवण तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही तर जळकोट तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. तालुक्यातील सोनवळा, जंगमवाडी, ढोरसांगवी, हावरगाव तलावांत शून्य टक्के, हळद वाढवणा ४० टक्के, डोंगरगाव ५९ टक्के, माळहिप्परगा १०० टक्के, रावणकोळा ९४ टक्के, सिंदगी तलावात ३८ टक्के, चेरा क्रमांक एक १८ टक्के, चेरा क्रमांक दोन १८ टक्के, शेलदरा तलावात १० टक्के, वांजरवाडा १० टक्के, धोंडवाडी १२ टक्के, गुत्ती क्रमांक एक १६ टक्के, गुत्ती क्रमांक दोन तलावांत १४ टक्के असा जलसाठा असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता अरुण त्रिपाठी यांनी दिली. तलावांमध्ये कमी पाणीसाठा असल्याने पिण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तालुक्यातील सर्व साठवण तलावांत केवळ २० टक्के पाणीसाठा असून, सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस नाही झाला तर पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. याबाबत अनेक गावांतील नागरिकांनी पाणी आरक्षित करण्याची मागणी केली आहे.

पशुधनाला पाणी कोठून आणणार?तालुक्यात पशुधनाची संख्या ५० हजारांवर आहे. यामध्ये दुग्धव्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या सर्वच प्रकल्पांत केवळ २० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस न पडल्यास पशुधनाला पाणी कोठून आणणार? असा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ उपायोजना राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. प्राध्यान्याने पिण्याचे पाणी, शेती आणि त्यानंतर उद्योगासाठी पाण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. महिनाभरापासून पाऊस नाही. त्यात तीव्र ऊन पडत असल्याने पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा...तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही. केवळ रावणकोळा, मरसांगवी, अतनूर, घोणसी परिसरात जुलै महिन्यात मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे शेतातील पिके, माती वाहून गेली होती. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत पाऊसच झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यातही घट होत असून, पिके वाळून चालली आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसlaturलातूर