शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मांजरा प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा संपला; लातूरसह चार शहरांना भेडसावणार समस्या

By हणमंत गायकवाड | Updated: May 27, 2024 16:23 IST

मागील दोन दिवसांपासून मृतसाठ्यातून होतोय पाणीपुरवठा

लातूर : लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब, लातूर एमआयडीसी आदी मोठ्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात जिवंत साठा संपलेला आहे. आता मृतसाठ्यातून प्रस्तुत गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी मांजरा प्रकल्पात ०.१७ टक्के म्हणजे ०.३०४ दलघमी जिवंत पाणीसाठा होता. मात्र आता जिवंत साठा शून्य झालेला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे झाले आहे. 

लातूर शहरासाठी दररोज मांजरा प्रकल्पातून ५० ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. या उचल केलेल्या पाण्यातून पाच दिवसांआड शहरात पाणीपुरवठा होतो. मार्च महिन्यामध्ये आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मृतसाठ्यावर आता पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे लातूरकरांना जपून पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

दोन दिवसांपासून मृतसाठ्यातून पुरवठाशुक्रवारी जिवंत साठ्यातील पाणी उचलले होते. शनिवारी मांजरा प्रकल्प मृतसाठ्यात आला. ४७.१३० दलघमी मृतसाठ्याची क्षमता आहे. आता प्रकल्पात ४६.८२८ दलघमी मृतसाठा आहे. दोन दिवसांत एवढी घट पाण्याची झालेली आहे. प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत पाणी पुरू शकते. तोपर्यंत पावसाळ्याचे तीन महिने संपलेले असतात. त्यातून नवीन पाण्याची आवक झाली तर टंचाई जाणवणार नाही. सद्य:स्थितीत मात्र मृतसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

पाण्याची उचल आणि बाष्पीभवन वाढलेउन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याचा वापरही वाढलेला आहे. शिवाय, बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. एक दलघमी पाणी बाष्पीभवनात जात आहे. तर ५० ते ६० एमएलडी पाणी लातूर शहरासाठी उचलले जात आहे. धरणावर अवलंबून असलेल्या सगळ्या गावांना मिळून एक दलघमी पाणी उचलले जाते, अशी घट दररोजची होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरणWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका