शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा संपला; लातूरसह चार शहरांना भेडसावणार समस्या

By हणमंत गायकवाड | Updated: May 27, 2024 16:23 IST

मागील दोन दिवसांपासून मृतसाठ्यातून होतोय पाणीपुरवठा

लातूर : लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब, लातूर एमआयडीसी आदी मोठ्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात जिवंत साठा संपलेला आहे. आता मृतसाठ्यातून प्रस्तुत गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी मांजरा प्रकल्पात ०.१७ टक्के म्हणजे ०.३०४ दलघमी जिवंत पाणीसाठा होता. मात्र आता जिवंत साठा शून्य झालेला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे झाले आहे. 

लातूर शहरासाठी दररोज मांजरा प्रकल्पातून ५० ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. या उचल केलेल्या पाण्यातून पाच दिवसांआड शहरात पाणीपुरवठा होतो. मार्च महिन्यामध्ये आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मृतसाठ्यावर आता पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे लातूरकरांना जपून पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

दोन दिवसांपासून मृतसाठ्यातून पुरवठाशुक्रवारी जिवंत साठ्यातील पाणी उचलले होते. शनिवारी मांजरा प्रकल्प मृतसाठ्यात आला. ४७.१३० दलघमी मृतसाठ्याची क्षमता आहे. आता प्रकल्पात ४६.८२८ दलघमी मृतसाठा आहे. दोन दिवसांत एवढी घट पाण्याची झालेली आहे. प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत पाणी पुरू शकते. तोपर्यंत पावसाळ्याचे तीन महिने संपलेले असतात. त्यातून नवीन पाण्याची आवक झाली तर टंचाई जाणवणार नाही. सद्य:स्थितीत मात्र मृतसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

पाण्याची उचल आणि बाष्पीभवन वाढलेउन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याचा वापरही वाढलेला आहे. शिवाय, बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. एक दलघमी पाणी बाष्पीभवनात जात आहे. तर ५० ते ६० एमएलडी पाणी लातूर शहरासाठी उचलले जात आहे. धरणावर अवलंबून असलेल्या सगळ्या गावांना मिळून एक दलघमी पाणी उचलले जाते, अशी घट दररोजची होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरणWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका