शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

लातूरसह पन्नास गावांवर पाणीटंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 07:11 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ४५५़३ मि़मी़ पाऊस झाला असला तरी मांजरा प्रकल्पात केवळ ३़४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे लातूर, अंबाजोगाई, कळंब या शहरांसह सुमारे ५० गावांवर पाणी टंचाईचे सावट आले आहे.

लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत ४५५़३ मि़मी़ पाऊस झाला असला तरी मांजरा प्रकल्पात केवळ ३़४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे लातूर, अंबाजोगाई, कळंब या शहरांसह सुमारे ५० गावांवर पाणी टंचाईचे सावट आले आहे.मांजरा प्रकल्प क्षेत्रात केवळ २७७ मि़मी़ पाऊस झाला आहे़ त्यामुळे लातूर, अंबाजोगाई, धारूर, केज, कळंब या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या या प्रकल्पात ३़४ टक्के पाणी आहे़ परतीच्या पावसावरच आता आशा आहे़ पावसाने ताण दिल्यामुळे लातूर महानगरपालिकेने पाणीपुरवठा ८ ऐवजी १० दिवसांआड सुरू केला आहे़ मांजरा प्रकल्प तसेच साई, नागझरीत पाणी नसल्यामुळे महानगपालिकेने आतापासुनच पाणी जपून वापरण्यासाठी ही खबरदारी घेतली आहे.जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात उपयुक्त नव्हे, तर केवळ ३़५०४ दलघमीचा मृतसाठा आहे़ रेणा प्रकल्पात २़६३८ दलघमी उपयुक्त पाणी आहे़ व्हटी मध्यम प्रकल्पातही मृत म्हणजे १़०६० दलघमी पाणी आहे़ तिरू मध्यम प्रकल्पातही ०़०५० दलघमी उपयुक्त पाणी संचित झाले आह़े़ देवर्जन प्रकल्पात मात्र बºयापैकी उपयुक्त पाणीसाठा असून, हा प्रकल्प ४१़७८ टक्के भरला आहे़ साकोळ प्रकल्पातही ६०़४४ टक्के तसेच घरणी मध्यम प्रकल्पात ९५़१८ टक्के आहे़ मसलगा प्रकल्पात ४५़५० टक्के पाण्याचा संचय झाला आहे़ लघु आणि मध्यम असे एकूण १४० आणि २ मोठ्या प्रकल्पांत १६़७९ टक्के पाणीसाठा आहे़ परतीचा पाऊस नाही झाला तर या पाण्यावरच २४ लाख लोकसंख्येला आपली तहान भागवावी लागणार आहे.

टॅग्स :laturलातूरwater shortageपाणीटंचाई