शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आता बैठ्या पथकांचा वॉच

By संदीप शिंदे | Updated: February 14, 2023 18:39 IST

लातूर जिल्ह्यात ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला जाणार सामोरे

लातूर : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडाव्यात, गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्रावर बैठ्या पथकांचा वॉच राहणार आहे. तसेच संवेदनशील केंद्रावर विशेष पथक तैनात राहणार आहे.

बारावी परीक्षेसाठी लातूर जिल्ह्यातील ३५ हजार ५१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ९२ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे शाळा तेथे परीक्षा केंद्र होते. मात्र, यंदा सेंटरची संख्या कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना लिखाणाच्या सरावामुळे देण्यात आलेला वाढीव अर्धा तासही कमी करण्यात आला असून, तीन तासांचाच पेपर राहणार आहे. सोबतच १०० टक्के अभ्यासक्रम राहणार असून, केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करणाऱ्या सहायक परीरक्षकांना जीपीएस सुरु ठेवावे लागणार आहे. २१ मार्चपर्यंत बारावीच्या परीक्षा चालणार असून, लातूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

बोर्डाकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर...मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मंडळस्तरावर दोन क्रमांकाची हेल्पलाईन सुरु केली आहे. तसेच बोर्डात सहसचिव एम.सी. फडके, सहायक सचिव ए.आर कुंभार यांच्याशीही संपर्क साधता येणार आहे. विद्यार्थी, शाळा प्रमुखांना आपल्या अडचणी विषयी संपर्क साधता यावा, यासाठी जे.एम. वारद, एम.एस. दानाई, ए.एम. जाधव, एम.एन. वांगस्कर, डी.डी. जाधव यांचे क्रमांक दिले आहेत.

लातूर मंडळात ९१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी...

बारावी परीक्षेसाठी ९२ केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रावर परीक्षेसाठी लागणारे साहित्य, बारकोड, स्टेशनरी, उत्तरपत्रिका केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन वितरीत करण्यात आले आहे. बारावी परीक्षेला विभागीय मंडळातून ९१ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये लातूर ३५५१०, उस्मानाबाद १६३५९ तर नांदेडच्या ३९७७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच लातूर ९२, नांदेड ९२ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ४० केंद्रावर परीक्षा होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूर