शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आता बैठ्या पथकांचा वॉच

By संदीप शिंदे | Updated: February 14, 2023 18:39 IST

लातूर जिल्ह्यात ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला जाणार सामोरे

लातूर : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडाव्यात, गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्रावर बैठ्या पथकांचा वॉच राहणार आहे. तसेच संवेदनशील केंद्रावर विशेष पथक तैनात राहणार आहे.

बारावी परीक्षेसाठी लातूर जिल्ह्यातील ३५ हजार ५१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ९२ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे शाळा तेथे परीक्षा केंद्र होते. मात्र, यंदा सेंटरची संख्या कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना लिखाणाच्या सरावामुळे देण्यात आलेला वाढीव अर्धा तासही कमी करण्यात आला असून, तीन तासांचाच पेपर राहणार आहे. सोबतच १०० टक्के अभ्यासक्रम राहणार असून, केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करणाऱ्या सहायक परीरक्षकांना जीपीएस सुरु ठेवावे लागणार आहे. २१ मार्चपर्यंत बारावीच्या परीक्षा चालणार असून, लातूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

बोर्डाकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर...मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मंडळस्तरावर दोन क्रमांकाची हेल्पलाईन सुरु केली आहे. तसेच बोर्डात सहसचिव एम.सी. फडके, सहायक सचिव ए.आर कुंभार यांच्याशीही संपर्क साधता येणार आहे. विद्यार्थी, शाळा प्रमुखांना आपल्या अडचणी विषयी संपर्क साधता यावा, यासाठी जे.एम. वारद, एम.एस. दानाई, ए.एम. जाधव, एम.एन. वांगस्कर, डी.डी. जाधव यांचे क्रमांक दिले आहेत.

लातूर मंडळात ९१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी...

बारावी परीक्षेसाठी ९२ केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रावर परीक्षेसाठी लागणारे साहित्य, बारकोड, स्टेशनरी, उत्तरपत्रिका केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन वितरीत करण्यात आले आहे. बारावी परीक्षेला विभागीय मंडळातून ९१ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये लातूर ३५५१०, उस्मानाबाद १६३५९ तर नांदेडच्या ३९७७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच लातूर ९२, नांदेड ९२ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ४० केंद्रावर परीक्षा होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूर