शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवाडीत रात्री साडेदहा नंतरही मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:51 IST

शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळवून देतो असे आश्वासन मतदानादिवशी देऊन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसने केली आहे.

लातूर : चाकूर तालुक्यातील आनंदवाडी गावातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळवून देतो असे आश्वासन मतदानादिवशी देऊन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसने केली आहे. दरम्यान, दुपारनंतर बहिष्कार मागे घेतलेल्या आनंदवाडीत रात्री १०.३० नंतरही मतदान सुरू होते.पीकविमा मिळाला नाही म्हणून आनंदवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. दुपारपर्यंत एकानेही मतदान केले नव्हते. भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे गावात पोहोचले. त्यांनी पालकमंत्री निलंगेकर यांच्याशी मोबाईलवर स्पीकर आॅन करून ग्रामस्थांशी संवाद घडवून आणला. त्यावेळी पीकविमा मिळवून देण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत मतदान करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले, या आशयाची तक्रार प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.बहिष्कार मागे घेतल्यानंतर सायंकाळी मतदान केंद्रात पोहोचलेल्या सर्वांचेच मतदान रात्री १०.३० पर्यंत सुरू होते.दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे खाजगी स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनीही सोशल मीडियावर अपलोड करून ‘व्होट फॉर नेशन-व्होट फॉर बीजेपी’ असा संदेश प्रसारित केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्धही तक्रार केली आहे.>आचारसंहितेचा भंग नाही : पालकमंत्रीआचारसंहितेचा भंग होईल, असा एक शब्दही उच्चारलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर आश्वासन दिले होते, त्याच अनुषंगाने त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, हे आपण बोललो. कोणाला मतदान करावे हेही बोललो नाही, असे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019latur-pcलातूर