शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी १२ चे प्रमाण कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 21:39 IST

जे लोक शाकाहारी आहेत, कधी दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करीत नाही, अशा लोकांमध्ये व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

 - आशपाक पठाण

लातूर - जे लोक शाकाहारी आहेत, कधी दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करीत नाही, अशा लोकांमध्ये व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे चिडचिडेपणा, अशक्तपणा व थकवा जाणवत असून यातून हातपाय दुखणे, नसांचे आजार उद्भवतात़ त्यामुळे रूग्णांणी यावर वेळीच काळजी घेऊन आपल्या आहारात आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहेत, असा सल्ला डॉ. विश्रांत भारती यांनी दिला आहे.अनेकजण सकाळी लवकर उठत नाहीत.  त्यामुळे सकाळचे कोवळ्या उन्हात फिरण्याचा फारसा संबंधही येत नाही. त्यातच पुन्हा खानपानातही काळजी घेतली जात नसल्याने विविध आजार बळावतात. शाकाहारी लोकांमध्ये सध्या व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण कमी होताना दिसत आहे. यामुळे चिडचिडेपणा येत असून थकवाही जाणवत आहे. यापासून बचाव करण्यासाठी शाकाहारी लोकांनी दुध व दुग्धजन्य पदार्थ जास्तीत जास्त खाणे आवश्यक आहे. याशिवाय, महिन्यातून किमान एकवेळा मांसाहार केल्यास  आपल्या शरिरात व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते़ अनेकदा आपण अशक्तपणा किंवा थकवा जाणवल्यास दुर्लक्ष करतो. मात्र, असे न करता वेळीच चाचणी करून घेणे गरजेचे आहे़ शरिरातील बी १२ कमी झाल्यास त्यातून उद्भवणारे आजार हे गंभीर स्वरूपाचेही असू शकतात़ सध्या धावपळीच्या युगात अनेकांना कामातून वेळ मिळत नाही, चिडचिडेपणा आल्यावर त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे डॉ़ विश्रांत भारती म्हणाले.कार्यालयात बसणा-यांना अधिक त्रास  शासकीय, खाजगी कार्यालयात काम करणाºयांमध्येही काम करणा-या व्यक्ती, तसेच जास्तीत जास्त वेळ कार्यालयात बसणाºयांना व्हिटॅमीन डीचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळेच अनेकांना अचानकपणे विविध आजार जडत आहेत़ यापासून बचाव करण्यासाठी वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. मानवी शरिरात व्हिटॅमीनचे योग्य प्रमाण आवश्यक असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही़ व्हिटॅमीन डी साठी सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे गरजेचे आहे. शिवाय, कधीतरी मांसाहारही गरजेचा असल्याचे डॉ़ भारती यांनी सांगितले.काय आहेत लक्षणेशरिरात व्हिटॅमीन बी १२ चे कमी झाल्यास सर्वात प्रथम अशक्तपणा, पायी चालताना लवकर थकवा जाणवतो किंवा चिडचिडेपणा निर्माण होतो. काही दिवसांनी नसांमध्ये कमजोरी, मेंदूवर परिणाम होण्याचा धोका असतो़ त्यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ़ भारती यांनी सांगितले.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य