शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी १२ चे प्रमाण कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 21:39 IST

जे लोक शाकाहारी आहेत, कधी दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करीत नाही, अशा लोकांमध्ये व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

 - आशपाक पठाण

लातूर - जे लोक शाकाहारी आहेत, कधी दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करीत नाही, अशा लोकांमध्ये व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे चिडचिडेपणा, अशक्तपणा व थकवा जाणवत असून यातून हातपाय दुखणे, नसांचे आजार उद्भवतात़ त्यामुळे रूग्णांणी यावर वेळीच काळजी घेऊन आपल्या आहारात आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहेत, असा सल्ला डॉ. विश्रांत भारती यांनी दिला आहे.अनेकजण सकाळी लवकर उठत नाहीत.  त्यामुळे सकाळचे कोवळ्या उन्हात फिरण्याचा फारसा संबंधही येत नाही. त्यातच पुन्हा खानपानातही काळजी घेतली जात नसल्याने विविध आजार बळावतात. शाकाहारी लोकांमध्ये सध्या व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण कमी होताना दिसत आहे. यामुळे चिडचिडेपणा येत असून थकवाही जाणवत आहे. यापासून बचाव करण्यासाठी शाकाहारी लोकांनी दुध व दुग्धजन्य पदार्थ जास्तीत जास्त खाणे आवश्यक आहे. याशिवाय, महिन्यातून किमान एकवेळा मांसाहार केल्यास  आपल्या शरिरात व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते़ अनेकदा आपण अशक्तपणा किंवा थकवा जाणवल्यास दुर्लक्ष करतो. मात्र, असे न करता वेळीच चाचणी करून घेणे गरजेचे आहे़ शरिरातील बी १२ कमी झाल्यास त्यातून उद्भवणारे आजार हे गंभीर स्वरूपाचेही असू शकतात़ सध्या धावपळीच्या युगात अनेकांना कामातून वेळ मिळत नाही, चिडचिडेपणा आल्यावर त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे डॉ़ विश्रांत भारती म्हणाले.कार्यालयात बसणा-यांना अधिक त्रास  शासकीय, खाजगी कार्यालयात काम करणाºयांमध्येही काम करणा-या व्यक्ती, तसेच जास्तीत जास्त वेळ कार्यालयात बसणाºयांना व्हिटॅमीन डीचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळेच अनेकांना अचानकपणे विविध आजार जडत आहेत़ यापासून बचाव करण्यासाठी वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. मानवी शरिरात व्हिटॅमीनचे योग्य प्रमाण आवश्यक असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही़ व्हिटॅमीन डी साठी सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे गरजेचे आहे. शिवाय, कधीतरी मांसाहारही गरजेचा असल्याचे डॉ़ भारती यांनी सांगितले.काय आहेत लक्षणेशरिरात व्हिटॅमीन बी १२ चे कमी झाल्यास सर्वात प्रथम अशक्तपणा, पायी चालताना लवकर थकवा जाणवतो किंवा चिडचिडेपणा निर्माण होतो. काही दिवसांनी नसांमध्ये कमजोरी, मेंदूवर परिणाम होण्याचा धोका असतो़ त्यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ़ भारती यांनी सांगितले.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य