शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

अवकाळीने लातूरातील १३ मंडळांना झोडपले; ऊस-ज्वारीस फटका, पिकांवर रोगाची भीती

By हरी मोकाशे | Updated: November 29, 2023 17:55 IST

तूर, हरभरा, फळबागा, भाजीपाल्यावर रोगाच्या प्रादुर्भावाची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

लातूर : जिल्ह्यातील १३ महसूल मंडळांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे ऊसासह ज्वारीच्या पिकास फटका बसला आहे. तसेच तूर, हरभरा, फळबागा, भाजीपाल्यावर रोगाच्या प्रादुर्भावाची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ३१.४ मिमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान विभागानेही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. मंगळवारी पहाटे काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी व रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने ऊसासह ज्वारीचे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच तूर, हरभरा या पिकांसह भाजीपाला, फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील औसा, मुरुड, भादा, भेटा, चापोली, डिगोळ, किनगाव, केळगाव या भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, बुधवारी सकाळी ८ वा. पर्यंत गेल्या २४ तासांत ३१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात लातूर तालुक्यात ३५ मिमी, औसा- ४८.७, अहमदपूर- १०.९, निलंगा - १४.९, उदगीर- ३१.३, चाकूर- ३८.७, रेणापूर- ३२.७, देवणी- ६९.५, शिरुर अनंतपाळ २७.२, जळकोट तालुक्यात १२.८ मिमी पाऊस झाला आहे.

भादा मंडळात सर्वाधिक पाऊस...औसा तालुक्यातील भादा महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला असून ९२.३ मिमी अशी नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ देवणी- ८२.३, पानचिंचोली- ७४, आष्टा- ६७.५, बोरोळ- ७७.३ मिमी पाऊस होत अतिवृष्टी झाली आहे. शिवाय, कासारखेडा मंडळात ५१.८, तांदुळजा- ५४.३, औसा- ६०, किनीथोट- ४९.५, उजनी- ५५.३, नळेगाव- ५२.५, मोघा- ५२.५, झरी मंडळात ५५.५ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

अवकाळीने ऊस तोडणी थांबली...जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या सुरु आहे. शेत- शिवारात ऊस तोडणीच्या मजुरांच्या टोळ्या व हार्वेस्टर दिसून येत आहेत. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने ऊस तोडणीवर परिणाम झाला आहे. वादळी वारा व अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांची तारांबळ उडाली होती.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र