शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

अवकाळीने लातूरातील १३ मंडळांना झोडपले; ऊस-ज्वारीस फटका, पिकांवर रोगाची भीती

By हरी मोकाशे | Updated: November 29, 2023 17:55 IST

तूर, हरभरा, फळबागा, भाजीपाल्यावर रोगाच्या प्रादुर्भावाची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

लातूर : जिल्ह्यातील १३ महसूल मंडळांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे ऊसासह ज्वारीच्या पिकास फटका बसला आहे. तसेच तूर, हरभरा, फळबागा, भाजीपाल्यावर रोगाच्या प्रादुर्भावाची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ३१.४ मिमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान विभागानेही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. मंगळवारी पहाटे काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी व रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने ऊसासह ज्वारीचे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच तूर, हरभरा या पिकांसह भाजीपाला, फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील औसा, मुरुड, भादा, भेटा, चापोली, डिगोळ, किनगाव, केळगाव या भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, बुधवारी सकाळी ८ वा. पर्यंत गेल्या २४ तासांत ३१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात लातूर तालुक्यात ३५ मिमी, औसा- ४८.७, अहमदपूर- १०.९, निलंगा - १४.९, उदगीर- ३१.३, चाकूर- ३८.७, रेणापूर- ३२.७, देवणी- ६९.५, शिरुर अनंतपाळ २७.२, जळकोट तालुक्यात १२.८ मिमी पाऊस झाला आहे.

भादा मंडळात सर्वाधिक पाऊस...औसा तालुक्यातील भादा महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला असून ९२.३ मिमी अशी नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ देवणी- ८२.३, पानचिंचोली- ७४, आष्टा- ६७.५, बोरोळ- ७७.३ मिमी पाऊस होत अतिवृष्टी झाली आहे. शिवाय, कासारखेडा मंडळात ५१.८, तांदुळजा- ५४.३, औसा- ६०, किनीथोट- ४९.५, उजनी- ५५.३, नळेगाव- ५२.५, मोघा- ५२.५, झरी मंडळात ५५.५ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

अवकाळीने ऊस तोडणी थांबली...जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या सुरु आहे. शेत- शिवारात ऊस तोडणीच्या मजुरांच्या टोळ्या व हार्वेस्टर दिसून येत आहेत. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने ऊस तोडणीवर परिणाम झाला आहे. वादळी वारा व अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांची तारांबळ उडाली होती.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र