शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

कृषी विभागाच्या पथकाची छुपी गस्त; बेभाव बियाणे विक्रेत्यांना चाप!

By हरी मोकाशे | Updated: May 29, 2024 19:23 IST

बियाणे ज्यादा दराने विक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे

लातूर : खरीप हंगाम पंधरा दिवसांवर आल्याने जिल्ह्यात खरीपाची तयारी सुरु आहे. शेतकरी बी- बियाणे, खतांची चौकशी व खरेदी करीत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि योग्य दराने बी- बियाणे मिळावेत म्हणून कृषी विभागाने छुपी गस्त सुरु केली आहे. ज्यादा दराने विक्री केल्याचे आढळून आल्यास तात्काळ कडक कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात ६ लाख ५० हजार ९६ हेक्टरवर खरीपाचा पेरा अपेक्षित असून त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होईल. सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची कामे आटोपत आहेत. तसेच बी- बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यासही सुरुवात केली आहे. यंदा मुबलक प्रमाणात बी- बियाणे, खते उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये. दरम्यान, कृषी सेवा केंद्र चालकांनी कृत्रिम टंचाई निर्माण करुन ज्यादा दराने बी- बियाणांची विक्री करु नये. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे छुपे पथक गस्त घालत आहे. तसेच बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर पथके नियुक्त करण्यात आली आहे.

कापसाच्या विशिष्ठ वाणाच्या बियाणांचा आग्रह करु नका...जिल्ह्यात अहमदपूर व जळकोट तालुक्यात कापसाची लागवड केली जाते. सर्व कंपन्यांचे कापूस बी.टी. वाण चांगले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही एकाच कंपनीच्या विशिष्ट वाणाची मागणी करु नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे. तसेच कापूस बियाणांच्या विशिष्ट वाणांची जादा दराने विक्री केल्यास कृषि सेवा केंद्रावर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सतत तपासणी सुरुजिल्ह्यातील शेतकरी विविध कंपन्याच्या कापूस बियाणांना पसंती देतात. या बियाणांना मागणी असल्याने त्यांच्या विक्रीत वाढ होऊन टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातून विक्रेत्यांकडून या बियाण्यांची जादा दराने विक्री केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर तालुका कृषि अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कृषि केंद्र स्तरावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या पथकाकडून सतत तपासणी सुरु आहे. कृषि सेवा केंद्रातून वाढीव दरात कापूस बियाणे विक्री केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जाधव व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी चोले यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीlaturलातूर