शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

कृषी विभागाच्या पथकाची छुपी गस्त; बेभाव बियाणे विक्रेत्यांना चाप!

By हरी मोकाशे | Updated: May 29, 2024 19:23 IST

बियाणे ज्यादा दराने विक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे

लातूर : खरीप हंगाम पंधरा दिवसांवर आल्याने जिल्ह्यात खरीपाची तयारी सुरु आहे. शेतकरी बी- बियाणे, खतांची चौकशी व खरेदी करीत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि योग्य दराने बी- बियाणे मिळावेत म्हणून कृषी विभागाने छुपी गस्त सुरु केली आहे. ज्यादा दराने विक्री केल्याचे आढळून आल्यास तात्काळ कडक कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात ६ लाख ५० हजार ९६ हेक्टरवर खरीपाचा पेरा अपेक्षित असून त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होईल. सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची कामे आटोपत आहेत. तसेच बी- बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यासही सुरुवात केली आहे. यंदा मुबलक प्रमाणात बी- बियाणे, खते उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये. दरम्यान, कृषी सेवा केंद्र चालकांनी कृत्रिम टंचाई निर्माण करुन ज्यादा दराने बी- बियाणांची विक्री करु नये. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे छुपे पथक गस्त घालत आहे. तसेच बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर पथके नियुक्त करण्यात आली आहे.

कापसाच्या विशिष्ठ वाणाच्या बियाणांचा आग्रह करु नका...जिल्ह्यात अहमदपूर व जळकोट तालुक्यात कापसाची लागवड केली जाते. सर्व कंपन्यांचे कापूस बी.टी. वाण चांगले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही एकाच कंपनीच्या विशिष्ट वाणाची मागणी करु नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे. तसेच कापूस बियाणांच्या विशिष्ट वाणांची जादा दराने विक्री केल्यास कृषि सेवा केंद्रावर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सतत तपासणी सुरुजिल्ह्यातील शेतकरी विविध कंपन्याच्या कापूस बियाणांना पसंती देतात. या बियाणांना मागणी असल्याने त्यांच्या विक्रीत वाढ होऊन टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातून विक्रेत्यांकडून या बियाण्यांची जादा दराने विक्री केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर तालुका कृषि अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कृषि केंद्र स्तरावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या पथकाकडून सतत तपासणी सुरु आहे. कृषि सेवा केंद्रातून वाढीव दरात कापूस बियाणे विक्री केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जाधव व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी चोले यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीlaturलातूर