शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

धक्कादायक! सीबीएसई शाळेत शिक्षण घेता येत नसल्याने आईची मुलीसह विहिरीत उडी

By हरी मोकाशे | Updated: June 19, 2024 20:29 IST

नैराश्यातून उचलले पाऊल : मायलेकीचा मृत्यू

लातूर : आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीच्या कमरेला धरुन विहिरीत उडी मारली. त्यात मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील माळेगाव (क.) येथे घडली. याप्रकरणी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात बुधवारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भाग्यश्री व्यंकट हालसे (२६) व समिक्षा व्यंकट हालसे (५, रा. माळेगाव कल्याणी, ता. निलंगा) असे मयत मायलेकीचे नाव आहे. माळेगाव (क.) येथील व्यंकट हालसे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगा सार्थक व मुलगी समिक्षा आहेत. त्यांना दीड एकर शेती आहे. मात्र, ती आई- वडिलांकडे आहे. शेळ्या राखून कुटुंबाची उपजिविका करीत असल्याने हालसे यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. दोन्ही मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न वडील व्यंकट करीत होते. दरम्यान, आपली दोन्ही लेकरं सीबीएसई इंग्रजी शाळेत शिकावेत अशी इच्छा त्यांची पत्नी भाग्यश्री यांना होती. त्यामुळे त्या पतीकडे वारंवार चौकशी करीत मुलांना सीबीएसई शाळेत पाठवू असे म्हणत होत्या. तेव्हा पती समजूत काढून शाळेत पाठवू असे म्हणत असत. मात्र, त्यास उशीर होत असल्याने त्या नैराश्यग्रस्त झाल्या आणि मंगळवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घरातील मुलीला सोबत घेऊन गावाबाहेर पडल्या. त्यांनी गावाजवळील शेतकरी केदार पाटील यांची विहीर गाठली आणि पतीला फोन करुन आपल्या दीदीचं शेवटचं तोंड पहा म्हणत विहिरीत उडी घेतली.

पाण्यात बुडून मायलेकीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघींचाही मृतदेह पाण्याबाहेर काढला. बुधवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन सायंकाळी माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मयताचे वडील अरुण बोडके (रा. धनगरवाडी, ता. देवणी) यांच्या माहितीवरुन औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि विठ्ठल दुरपडे हे करीत आहेत.

खेळण्यासाठी निसटला अन् जीव बचावला...भाग्यश्री हालसे ह्या नैराश्यातून मंगळवारी सायंकाळी मुलीला घेऊन विहिरीकडे जात असताना रस्त्यात मुलगा समर्थ खेळत असताना दिसला. त्यामुळे आईने त्याच्याही हाताला धरून चल माझ्यासोबत असे म्हणत घेऊन चालल्या होत्या. तेव्हा खेळण्यासाठी तो आईच्या हातून निसटून पळाला. त्यामुळे तो बचावल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

पप्पा, आईसोबत आले...भाग्यश्री ह्या मुलीसह गावाजवळील विहिरीजवळ पोहोचल्यानंतर पतीस व्हिडिओ कॉल केला. परंतु, इंटरनेट बंद असल्याने समजले नाही. त्यानंतर पुन्हा फोन आला आणि आईसोबत आले पप्पा असे मुलगी म्हणाली. ते शेवटचेच बोलणे झाल्याचे वडील व्यंकट यांनी सांगितले.

आईची सतत आठवण...भाग्यश्री यांच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले. तेव्हापासून त्या सतत रडत बसत असत. नेहमी त्यांना आईची आठवण होत असे. त्यामुळेही त्यांना नैराश्य आले होते, असे पती व भाग्यश्री यांचा भाऊ बालाजी बोडके यांनी सांगितले. 

टॅग्स :Educationशिक्षण