शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

धक्कादायक! सीबीएसई शाळेत शिक्षण घेता येत नसल्याने आईची मुलीसह विहिरीत उडी

By हरी मोकाशे | Updated: June 19, 2024 20:29 IST

नैराश्यातून उचलले पाऊल : मायलेकीचा मृत्यू

लातूर : आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीच्या कमरेला धरुन विहिरीत उडी मारली. त्यात मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील माळेगाव (क.) येथे घडली. याप्रकरणी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात बुधवारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भाग्यश्री व्यंकट हालसे (२६) व समिक्षा व्यंकट हालसे (५, रा. माळेगाव कल्याणी, ता. निलंगा) असे मयत मायलेकीचे नाव आहे. माळेगाव (क.) येथील व्यंकट हालसे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगा सार्थक व मुलगी समिक्षा आहेत. त्यांना दीड एकर शेती आहे. मात्र, ती आई- वडिलांकडे आहे. शेळ्या राखून कुटुंबाची उपजिविका करीत असल्याने हालसे यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. दोन्ही मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न वडील व्यंकट करीत होते. दरम्यान, आपली दोन्ही लेकरं सीबीएसई इंग्रजी शाळेत शिकावेत अशी इच्छा त्यांची पत्नी भाग्यश्री यांना होती. त्यामुळे त्या पतीकडे वारंवार चौकशी करीत मुलांना सीबीएसई शाळेत पाठवू असे म्हणत होत्या. तेव्हा पती समजूत काढून शाळेत पाठवू असे म्हणत असत. मात्र, त्यास उशीर होत असल्याने त्या नैराश्यग्रस्त झाल्या आणि मंगळवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घरातील मुलीला सोबत घेऊन गावाबाहेर पडल्या. त्यांनी गावाजवळील शेतकरी केदार पाटील यांची विहीर गाठली आणि पतीला फोन करुन आपल्या दीदीचं शेवटचं तोंड पहा म्हणत विहिरीत उडी घेतली.

पाण्यात बुडून मायलेकीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघींचाही मृतदेह पाण्याबाहेर काढला. बुधवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन सायंकाळी माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मयताचे वडील अरुण बोडके (रा. धनगरवाडी, ता. देवणी) यांच्या माहितीवरुन औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि विठ्ठल दुरपडे हे करीत आहेत.

खेळण्यासाठी निसटला अन् जीव बचावला...भाग्यश्री हालसे ह्या नैराश्यातून मंगळवारी सायंकाळी मुलीला घेऊन विहिरीकडे जात असताना रस्त्यात मुलगा समर्थ खेळत असताना दिसला. त्यामुळे आईने त्याच्याही हाताला धरून चल माझ्यासोबत असे म्हणत घेऊन चालल्या होत्या. तेव्हा खेळण्यासाठी तो आईच्या हातून निसटून पळाला. त्यामुळे तो बचावल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

पप्पा, आईसोबत आले...भाग्यश्री ह्या मुलीसह गावाजवळील विहिरीजवळ पोहोचल्यानंतर पतीस व्हिडिओ कॉल केला. परंतु, इंटरनेट बंद असल्याने समजले नाही. त्यानंतर पुन्हा फोन आला आणि आईसोबत आले पप्पा असे मुलगी म्हणाली. ते शेवटचेच बोलणे झाल्याचे वडील व्यंकट यांनी सांगितले.

आईची सतत आठवण...भाग्यश्री यांच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले. तेव्हापासून त्या सतत रडत बसत असत. नेहमी त्यांना आईची आठवण होत असे. त्यामुळेही त्यांना नैराश्य आले होते, असे पती व भाग्यश्री यांचा भाऊ बालाजी बोडके यांनी सांगितले. 

टॅग्स :Educationशिक्षण